शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पैनगंगा खाण तस्करी कनेक्शन वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:56 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे.

ठळक मुद्देलालपुलियावर चालतो व्यवहार : चालकासह चार ट्रक पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेली पैनगंगा कोळसा खाण सध्या कोळसा तस्करांच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात काही तस्करांनी या खाणीत सशस्त्र धुडगूस घातला. या प्रकरणाची गडचांदूर पोलीस चौकशी करीत असून याचा मुख्य सूत्रधार वणीत असल्याचे पुढे आहे. दरम्यान, गुरूवारी चंद्रपूर पोलीस दलाच्या पथकाने वणी येथे येऊन चार ट्रक ताब्यात घेतले. तसेच एका चालकालाही अटक करण्यात आली.येथील लालपुलिया परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोरीचा कोळसा उतरविला जातो. या व्यवहारात दररोज लाखोची उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. अलिकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील काही तस्करांनी पैनगंगा कोळसा खाणीत जाऊन सशस्त्र धुमाकूळ घातला. यावेळी कोळसा भरण्यासाठी आलेली वाहने ही यवतमाळ जिल्ह्यातील पासिंग होती. या पार्श्वभूमीवर वेकोलिकडून तक्रार झाल्यानंतर गडचांदूर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. हे आरोपी घुग्गूस येथील असल्याचे सांगण्यात येते. मात्र या टोळीचा मुख्य सूत्रधार हा वणीतील असल्याची चर्चा आहे.हा सूत्रधार चोरीचा कोळसा मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याची चर्चा असून गडचांदूर पोलीस सध्या त्याच्या मागावर आहे. गुरूवारी चंद्रपूर पोलिसांचे पथक वणीत येऊन गेले. मात्र टोळीचा हा म्होरक्या त्यांच्या हाती लागला नाही.काही महिन्यांपूर्वी वेकोलिने कोळसा चोरीवर आळा घालण्यासाठी विशेष सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. त्यामुळे कोळसा चोरीला काही प्रमाणात आळा बसला असला तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे तस्कर शस्त्राच्या धाकावर खाणीत जाऊन कोळसा लंपास करत असल्याच्या घटना अलिकडील सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर घडल्या. वणी परिसरातील बहुतांश कोळसा खाणी बंद पडल्याने या परिसरात कोळसा चोरीला वाव नसल्याने तस्करांनी आपला मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरलगत असलेल्या पैनगंगा कोळसा खाणीकडे वळविला. या खाणीतील सुरक्षा यंत्रणा कमकुवत असल्याने त्याचा फायदा या तस्करांना होत आहे.कोळसा चोरल्यानंतर तो थेट वणी येथील लालपुलियावर आणून उतरविला जातो. लालपुलियावर हा चोरीचा कोळसा खरेदी करणारा एकमेव खरेदीदार आहे. नागपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमधूनदेखिल मोठ्या प्रमाणावर कोळशाची चोरी करून तो कोळसा वणी शहरात आणून विकल्या जात आहे.राडा झाल्यावरच केली जाते वेकोलिकडून तक्रारकोळसा खाणीत राडा झाल्यावरच वेकोलि प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रारी करण्यात येतात. अन्यवेळी मात्र तक्रारी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने वेकोलि प्रशासनाच्या भूमिकेवरदेखिल शंका घेतल्या जात आहे.