शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगांचे थैमान

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी

वणी : सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी सतत वाढत आहे.तालुक्यातील नांदेपेरा, मंदर परिसरात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. नांदेपेरा येथे डेंग्यूसदृश तापाने मधुकर अंड्रस्कर, शीतल बोधे या दोघांना बंडवून सोडले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. नांदेपेरा येथे गावातील घाणीमुळे डासांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी या गावात मलेरिया, डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कर्मचारऱ्यांनी नांदेपेरा येथे पोहोचून रुग्णांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांनी गावात घाण निर्माण करणाऱ्याची नावेही नोंदविली होती. तथापि, अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तेथील ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे ही कारवाई रखडली, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. प्रशासक मात्र अत्यंत सुस्तच आहे. त्यांना गावाशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. गावातील किमान घाण स्वच्छ करण्याबाबतही ते प्रचंड उदासीन दिसत आहे. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील मंदर येथे निर्माण झाली आहे. नुकतीच या परिसरातील एक महिला डेंग्यूसदृश आजाराने दगावली आहे. संबंधित महिलेवर प्रथम वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र नंतर त्या खासगी डॉक्टरने त्या महिलेला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यानच त्या महिलेचा मृत्यू झाला. परिणामी संबंधित कुटुंबाला आर्थिक भुर्दंडासोबतच जीवित हानीला सामोरे जावे लागले. मंदर येथेही डेंग्यूसदृश तापाने ग्रामस्थ वैतागले आहेत. मलेरिया, टायफाईड आदी तापांनी जनता हैराण आहे. गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र ग्रामपंचायत उदासीन आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या गावातही साथ रोग बळकावत आहे. अनेक रूग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र शासकीय आरोग्य विभाग दिसेनासा झाला आहे. आरोग्य यंत्रणेचे या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या गावात कोणत्याही प्रभावी उपाययोजना आरोग्य विभागाने राबविल्या नाहीत. ग्रामपंचायतीने साधी नाली सफाई केली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)