शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

साथीच्या रोगांचे थैमान

By admin | Updated: October 11, 2014 23:14 IST

सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी

वणी : सध्या तालुक्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यात गर्दी सतत वाढत आहे.तालुक्यातील नांदेपेरा, मंदर परिसरात डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले आहे. नांदेपेरा येथे डेंग्यूसदृश तापाने मधुकर अंड्रस्कर, शीतल बोधे या दोघांना बंडवून सोडले आहे. मात्र आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागली आहे. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. नांदेपेरा येथे गावातील घाणीमुळे डासांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी या गावात मलेरिया, डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.सुरुवातीला आरोग्य विभागाच्या कर्मचारऱ्यांनी नांदेपेरा येथे पोहोचून रुग्णांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांनी गावात घाण निर्माण करणाऱ्याची नावेही नोंदविली होती. तथापि, अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तेथील ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे ही कारवाई रखडली, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. प्रशासक मात्र अत्यंत सुस्तच आहे. त्यांना गावाशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. गावातील किमान घाण स्वच्छ करण्याबाबतही ते प्रचंड उदासीन दिसत आहे. अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील मंदर येथे निर्माण झाली आहे. नुकतीच या परिसरातील एक महिला डेंग्यूसदृश आजाराने दगावली आहे. संबंधित महिलेवर प्रथम वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र नंतर त्या खासगी डॉक्टरने त्या महिलेला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. तेथे उपचारादरम्यानच त्या महिलेचा मृत्यू झाला. परिणामी संबंधित कुटुंबाला आर्थिक भुर्दंडासोबतच जीवित हानीला सामोरे जावे लागले. मंदर येथेही डेंग्यूसदृश तापाने ग्रामस्थ वैतागले आहेत. मलेरिया, टायफाईड आदी तापांनी जनता हैराण आहे. गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र ग्रामपंचायत उदासीन आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या गावातही साथ रोग बळकावत आहे. अनेक रूग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र शासकीय आरोग्य विभाग दिसेनासा झाला आहे. आरोग्य यंत्रणेचे या गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या गावात कोणत्याही प्रभावी उपाययोजना आरोग्य विभागाने राबविल्या नाहीत. ग्रामपंचायतीने साधी नाली सफाई केली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)