शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पंचायत समिती आणि नगरपरिषदही प्रभारावर

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

येथील नगरपरिषद आणि पंचायत समिती या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था वार्‍यावर आहेत. परिणामी शहर आणि तालुक्यातील विकास कामांना चांगलाच ‘ब्रेक’ बसला आहे.

वणी : येथील नगरपरिषद आणि पंचायत समिती या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था वार्‍यावर आहेत. परिणामी शहर आणि तालुक्यातील विकास कामांना चांगलाच ‘ब्रेक’ बसला आहे.येथील नगरपरिषद तर जिल्हय़ात सतत चर्चेत असते. या नगरपरिषदेवर मनसे वगळता सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी ‘युती’ करून सत्ता स्थापन केली आहे. सर्वपक्षीय सत्ता असतानाही मात्र सत्ताधार्‍यांना अद्यापही नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळविता आला नाही. तत्कालीन मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या बदलीनंतर ही नगरपरिषद सतत प्रभारावर हाकली जात आहे. कधी नायब तहसीलदारांकडे, तर कधी दुसर्‍याच मुख्याधिकार्‍यांकडे प्रभार सोपविण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकार्‍यांच्या भरवशावर चालविली जात आहे. सध्या पांढरकवडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांकडे येथील प्रभार आहे. ते आठवड्यातून दोन दिवस येथील नगरपरिषदेला देतात. उर्वरित दिवस ते पांढरकवडा येथे असतात. आठवड्यातील चार दिवस ते येथे नसल्याने सर्वसामान्य जनतेची कामे मात्र खोळंबते. त्याचे कुणालाच काही वाटत नाही. सत्ताधारी पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळविण्यासाठी प्रयत्न करतानाही दिसत नाही. नगरपरिषदेसारखीच गत येथील पंचायत समितीची झाली आहे. पंचायत समितीही प्रभारावरच चालविली जात आहे. वर्षभरानंतर कसे तरी येथे राजेश गायनर गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांनी कामाला गती देताच आता त्यांची बदली झाली आहे. प्रथम त्यांची बदली पांढरकवडा येथे करण्यात आली. नंतर त्यात सुधारणा करून आता त्यांना बुलडाणा जिल्हय़ात नियुक्ती देण्यात आली आहे. अद्याप त्यांनी पदभार सोडला नाही. मात्र लवकरच ते नवीन ठिकाणी रुजू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचायत समिती प्रभारीच्या ताब्यात जाणार आहे.तत्कालीन गटविकास अधिकारी विजय लोखंडे यांच्यानंतर पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारीच लाभले नव्हते. तीन महिन्यांपूर्वी गायनार आले अन् आता तेही बदलून जात आहे. त्यामुळे पुन्हा ही स्थानिक स्वराज्य संस्था पोरकी होणार आहे. पंचायत समितीशी तालुक्याचा ग्रामीण भाग पूर्णत: जुळलेला असतो. शासनाच्या विविध योजना याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. मात्र पूर्णवेळ अधिकारी नसल्याने या योजना रखडतात.नगरपरिषद आणि पंचायत समिती, या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था प्रभारी अधिकार्‍यांमुळे संथ झाल्या आहेत. प्रभारी अधिकारी महत्वाचे आणि धोरणात्मक निर्णय घेताना कचरतात, असा सामान्य जनतेचा अनुभव आहे. पूर्णवेळ अधिकारी त्यांच्या अखत्यारीतील निर्णय घेण्यास मागेपुढे पाहात नाही. प्रभारी अधिकारी सत्ताधिकार्‍यांच्या दबावात येण्याची कायम शक्यता असते. प्रभारी अधिकारी मनाप्रमाणे काम करण्यासही अडखळतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्णवेळ अधिकारीच मिळणे गरजेचे आहे. (कार्यालय प्रतिनिधी)