शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

पंचायत सशक्तीकरण अभियान रखडले

By admin | Updated: July 8, 2015 00:06 IST

सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण विकासावर भर देण्याऐवजी नवीन सरकारने अनेक योजना कायमस्वरूपी बंद करण्याचा सपाटा लावला आहे.

३० कंत्राटी अभियंते काढले : पंचायत भवनचा निधी गोठविलायवतमाळ : सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण विकासावर भर देण्याऐवजी नवीन सरकारने अनेक योजना कायमस्वरूपी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानही याच पद्धतीने गुंडाळण्यात आले आहे. तब्बल ३० कंत्राटी अभियंते कमी करण्यात आले असून, कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार आॅगस्टमध्ये संपुष्टात येत असल्याने त्यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींना अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी २०११ पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले. सुरूवातील प्राथमिक अवस्थेत असलेल्या गती मिळण्यासाठी बराच कालावधी लागला. २०१४ मध्ये येथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी इमारतही जिल्हास्तरावर घेण्यात आली. संगणक, दूरध्वनी यासह कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या सर्वच सोयीसुविधा येथे पुरविण्यात आल्या. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे गावांच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी कंत्राटी अभियंते नियुक्त करण्यात आले. पाच हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायतींसाठी अभियंता नियुक्त करण्यात आला. जिल्ह्यात तब्बल ३० कंत्राटी अभियंते ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यासह तेथील कामकाजाचे नियोजन करत होते. गुणवत्तापूर्ण कामे व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले. आता तर काम सुरू नसलेल्या तीन भवनाचे पैसेही शासनाने परत मागितले आहे. याशिवाय नियुक्त केलेल्या ३० अभियंत्यांना थेट कामावरून कमी केले आहे. जिल्हास्तरावर असलेले स्वतंत्र कार्यालयही गुंडाळण्यात आले आहे. आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत विभागात सोयीप्रमाणे कामाला लावले जात आहे. त्यांचीही कंत्राटाची मुदत आॅगस्ट महिन्यात संपुष्टात येत असल्याने त्यांना नव्याने आदेश मिळतो की नाही याची शाश्वती नाही. सध्या तरी इतर सेवेत कंत्राटी म्हणून सामावून घेतले जाईल असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात येत आहे. अतिशय महत्वपूर्ण योजना शासनाने कोणताही विचार न करता गुंडाळली आहे. आता याला पर्यायी योजना कधी येणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)