शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत सशक्तीकरण अभियान रखडले

By admin | Updated: July 8, 2015 00:06 IST

सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण विकासावर भर देण्याऐवजी नवीन सरकारने अनेक योजना कायमस्वरूपी बंद करण्याचा सपाटा लावला आहे.

३० कंत्राटी अभियंते काढले : पंचायत भवनचा निधी गोठविलायवतमाळ : सत्ता बदल झाल्यानंतर ग्रामीण विकासावर भर देण्याऐवजी नवीन सरकारने अनेक योजना कायमस्वरूपी बंद करण्याचा सपाटा लावला आहे. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानही याच पद्धतीने गुंडाळण्यात आले आहे. तब्बल ३० कंत्राटी अभियंते कमी करण्यात आले असून, कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार आॅगस्टमध्ये संपुष्टात येत असल्याने त्यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतींना अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी २०११ पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले. सुरूवातील प्राथमिक अवस्थेत असलेल्या गती मिळण्यासाठी बराच कालावधी लागला. २०१४ मध्ये येथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी इमारतही जिल्हास्तरावर घेण्यात आली. संगणक, दूरध्वनी यासह कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या सर्वच सोयीसुविधा येथे पुरविण्यात आल्या. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे गावांच्या विकासाचे नियोजन करण्यासाठी कंत्राटी अभियंते नियुक्त करण्यात आले. पाच हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायतींसाठी अभियंता नियुक्त करण्यात आला. जिल्ह्यात तब्बल ३० कंत्राटी अभियंते ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यासह तेथील कामकाजाचे नियोजन करत होते. गुणवत्तापूर्ण कामे व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले. आता तर काम सुरू नसलेल्या तीन भवनाचे पैसेही शासनाने परत मागितले आहे. याशिवाय नियुक्त केलेल्या ३० अभियंत्यांना थेट कामावरून कमी केले आहे. जिल्हास्तरावर असलेले स्वतंत्र कार्यालयही गुंडाळण्यात आले आहे. आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत विभागात सोयीप्रमाणे कामाला लावले जात आहे. त्यांचीही कंत्राटाची मुदत आॅगस्ट महिन्यात संपुष्टात येत असल्याने त्यांना नव्याने आदेश मिळतो की नाही याची शाश्वती नाही. सध्या तरी इतर सेवेत कंत्राटी म्हणून सामावून घेतले जाईल असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून काम करुन घेण्यात येत आहे. अतिशय महत्वपूर्ण योजना शासनाने कोणताही विचार न करता गुंडाळली आहे. आता याला पर्यायी योजना कधी येणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)