शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘प्रहार’ची जीवन प्राधिकरणावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:42 IST

शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

ठळक मुद्देवाघापूरवासी त्रस्त : भूमिगत गटारच्या दिशाहीन कामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा या मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी दुपारी धडक दिली.पाण्याची टंचाई सर्वत्र भासत आहे. अशातच भूमिगत गटार योजनेच्या खोदकामामुळे वाघापूर परिसरातील नळ योजनेचे कनेक्शन ठिकठिकाणी तुटले आहे. यामुळे नळ येऊनही पाण्याचा अपव्यय होतो. खोदकामामुळे रस्त्यावर अक्षरश: चिखल झाला आहे व दैनंदिन वापरासाठी, पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एक ना अनेक समस्या या कामामुळे निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदार कंपनीकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नाही. किमान काम करताना दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित आहे. त्याचीही तसदी घेण्यात येत नाही. मनमानी पद्धतीने वाटेल तसे खोदकाम केले जात आहे. विकास कामे शहरासाठी आवश्यक आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन व तंत्रशुद्ध पद्धतीने कामे होणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रहारच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.या मागणीचे निवेदन जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे, शहर अध्यक्ष तुषार भोयर, शहर संघटक स्वप्नील उजवणे, गौरव गावंडे, हंसराज सोमवंशी, आकाश चिंचोळकर, अनिकेत कापसे, सुनील राऊत, उदय सरताबे, सौरभ पेलणे, सागर किनगावकर, अभिषेक शेंडे, प्रशिक मिसाळ, गौरव ढोणे आदी उपस्थित होते.