शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘प्रहार’ची जीवन प्राधिकरणावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:42 IST

शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.

ठळक मुद्देवाघापूरवासी त्रस्त : भूमिगत गटारच्या दिशाहीन कामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा या मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी दुपारी धडक दिली.पाण्याची टंचाई सर्वत्र भासत आहे. अशातच भूमिगत गटार योजनेच्या खोदकामामुळे वाघापूर परिसरातील नळ योजनेचे कनेक्शन ठिकठिकाणी तुटले आहे. यामुळे नळ येऊनही पाण्याचा अपव्यय होतो. खोदकामामुळे रस्त्यावर अक्षरश: चिखल झाला आहे व दैनंदिन वापरासाठी, पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एक ना अनेक समस्या या कामामुळे निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदार कंपनीकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नाही. किमान काम करताना दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित आहे. त्याचीही तसदी घेण्यात येत नाही. मनमानी पद्धतीने वाटेल तसे खोदकाम केले जात आहे. विकास कामे शहरासाठी आवश्यक आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन व तंत्रशुद्ध पद्धतीने कामे होणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रहारच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.या मागणीचे निवेदन जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे, शहर अध्यक्ष तुषार भोयर, शहर संघटक स्वप्नील उजवणे, गौरव गावंडे, हंसराज सोमवंशी, आकाश चिंचोळकर, अनिकेत कापसे, सुनील राऊत, उदय सरताबे, सौरभ पेलणे, सागर किनगावकर, अभिषेक शेंडे, प्रशिक मिसाळ, गौरव ढोणे आदी उपस्थित होते.