शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पोषण आहाराला ब्रँडेड कंपनीचे पॅकिंग

By admin | Updated: March 22, 2015 02:02 IST

शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो.

यवतमाळ : शालेय पोषण आहाराचा तांदूळ असलेल्या पोत्याला कोणताही धक्का न लावता पद्धतशीर तांदूळ काढला जातो. दुसऱ्या पोत्यात तांदूळ भरून काळ््या बाजारात विक्री होते, यावर विश्वास बसत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. यवतमाळात एका धान्य गोदामावर पोलिसांनी धाड मारली, तेव्हा पोत्यातून तांदूळ काढण्याची पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले. चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविणारे आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यासाठी शासनाच्यावतीने तांदूळ आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठ्याचे कंत्राट यवतमाळातील हर्षद बेग यांना देण्यात आला आहे. त्यांनी धान्य माल साठविण्यासाठी पांढरकवडा मार्गावर गोदाम भाड्याने घेतले आहे. याच गोदामातून तांदूळाला पाय फुटत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. घाटंजीला विक्रीसाठी जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला. वाहनचालक आणि व्यापाऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गोदामाची झडती घेतली, आणि या गोदामात सुरू असलेला प्रकार पाहून पोलीसही स्तब्ध झाले. तांदूळाच्या पोत्याचे सील न तोडता प्लास्टिकच्या एका जम्बो नळीने त्यातून तांदूळ काढले जाते. तासाभरात ५० किलोच्या पोत्यातून १५ किलो तांदूळ बाहेर येतात. मात्र याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही. शासनाकडून आलेल्या विशिष्ट पोत्यातील तांदूळ साध्या पोत्यांमध्ये भरले जाते आणि ते सरळ काळ््या बाजारात विकले जाते. तर शाळेला १० ते १५ किलो धान्य काढलेले पोते पुरविले जाते. सुतळीपासून बनविलेल्या पोत्यावर तांदूळाचे वजन लिहिलेले असते. ५० किलो नेट वजनाचे हे पोते असते. मात्र शाळेत उतरविताना त्याचे वजन ३५ ते ४० किलो भरते परंतु पोते सीलबंद असल्याने कुणीही संशय घेत नाही. मुख्याध्यापकही ५० किलो वजनाचे पोते मिळाले असे लिहून देतात. तसेच शाळेत पोते उतरविताना पुरवठादाराचे खास माणसे घाईगडबडीत पोते उतरवून घेतात. मात्र या पोत्यात किती किलो धान्य आहे याचा थांगपत्ता लागत नाही. चिमुकल्यांच्या तोंडचा घास पळविण्यात एकटा कंत्राटदारच गुंतला असेल असे नाही. यात मोठी साखळीही असू शकते. या साखळीचा शोध घेतल्यास बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर) यंत्रणा बेसावधजिल्हाभरातील विद्यार्थ्यांना वितरित होणोर पोषण आहाराचे धान्य कोणत्या गोदामात आहे, ते सुरक्षित आहे का, धान्य घेऊन जाणारे वाहन किती किलो धान्य घेऊन जाते. नोंदी प्रमाणे धान्य भरले जाते का याची गत चार वर्षात कधीही तपासणी झाली नाही. आणि याच बाबीचा फायदा पुरवठादाराने घेतला. गावाबाहेर गोदामशालेय पोषण आहाराचा तांदूळ ठेवण्यासाठी पुरवठादाराने खास गावाबाहेरचे गोदाम निवडले आहे. येथील पांढरकवडा परिसरात विरळ वस्तीत असलेल्या गोदामात धान्याची रिफिलिंग गेली जाते. मात्र कुणालाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. तसेच गोदामातून साठा रजिस्टरच बेपत्ता आहे. सर्वच अनभिज्ञ विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे धान्य शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत उतरवून घेणे आवश्यक असते. परंतु या बाबीपासूनच शाळा व्यवस्थापन समिती अनभिज्ञ आहे. नेमके किती धान्य आले, पोते वजनाप्रमाणे होते काय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसते.