शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

उन्हाळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी ...

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी बळीराजाने परिश्रम घेतले; मात्र आता बळीराजाच्या अपेक्षेवर करपा रोगाने पाणी फिरविले आहे.

इतिहासात यंदा पहिल्यांदाच उन्हाळी ज्वारीवरसुद्धा रोग आला आहे. त्यामुळे निसर्गचक्र खरेच बदलले का, असा प्रश्न बळीराजाच्या मनात घर करून बसला आहे. तालुक्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, वैशाखी मूग, तीळ, ऊस, पपई आदी पिके घेतली जातात. या सर्व उन्हाळी पिकांवर करपा समान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाताशी आलेली पिके आपोआप करपून जात आहेत.

सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, तीळ या पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले तर चांगला भाव मिळाला असता. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकांवर दरवेळी रोगांचे आक्रमण होत आहे. बळीराजाची स्वप्नं प्रत्येकवेळी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, विंधन विहिरींना समाधानकारक पाणी आहे. तसेच धरण १०० टक्के भरल्यामुळे कालव्यालादेखील नियमित पाणी येत आहे. त्यामुळे बळीराजाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकाची लागवड केली; मात्र हे पीक डोळ्यादेखत करपून जात आहे.

येत्या हंगामात सोयाबीन बियाणाचा पुरवठा कंपन्यांकडून होणार नसल्याची चर्चा झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. घरचेच बियाणे खरिपासाठी तयार होईल, या उद्देशाने प्रयत्न केले,परंतु त्याच्यावर अचानक आलेल्या रोगामुळे सोयाबीन पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले. उसावरसुद्धा यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात जास्त आहे.

बॉक्स

कृषी विभाग बसला मूग गिळून

पांढऱ्या हत्तीची भूमिका बजावणाऱ्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन होताना दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरते कोलमडले आहेत. त्यांना रोगाचा नायनाट कसा करावा, असा प्रश्न सतावत आहे.

कोट

उन्हाळी भुईमुगावरील फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फाॅस २५ टक्के प्रवाही १४०० मिली प्रतिहेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तीळ पिकासाठी २० मिली क्विनाॅल फॉस किंवा कार्बारील १० टक्के भुकटी पाण्यात मिसळून फवारावी.

श्रीरंग लिंबाळकर,

तालुका कृषी अधिकारी, उमरखेड