शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी ...

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी बळीराजाने परिश्रम घेतले; मात्र आता बळीराजाच्या अपेक्षेवर करपा रोगाने पाणी फिरविले आहे.

इतिहासात यंदा पहिल्यांदाच उन्हाळी ज्वारीवरसुद्धा रोग आला आहे. त्यामुळे निसर्गचक्र खरेच बदलले का, असा प्रश्न बळीराजाच्या मनात घर करून बसला आहे. तालुक्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, वैशाखी मूग, तीळ, ऊस, पपई आदी पिके घेतली जातात. या सर्व उन्हाळी पिकांवर करपा समान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाताशी आलेली पिके आपोआप करपून जात आहेत.

सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, तीळ या पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले तर चांगला भाव मिळाला असता. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकांवर दरवेळी रोगांचे आक्रमण होत आहे. बळीराजाची स्वप्नं प्रत्येकवेळी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, विंधन विहिरींना समाधानकारक पाणी आहे. तसेच धरण १०० टक्के भरल्यामुळे कालव्यालादेखील नियमित पाणी येत आहे. त्यामुळे बळीराजाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकाची लागवड केली; मात्र हे पीक डोळ्यादेखत करपून जात आहे.

येत्या हंगामात सोयाबीन बियाणाचा पुरवठा कंपन्यांकडून होणार नसल्याची चर्चा झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. घरचेच बियाणे खरिपासाठी तयार होईल, या उद्देशाने प्रयत्न केले,परंतु त्याच्यावर अचानक आलेल्या रोगामुळे सोयाबीन पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले. उसावरसुद्धा यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात जास्त आहे.

बॉक्स

कृषी विभाग बसला मूग गिळून

पांढऱ्या हत्तीची भूमिका बजावणाऱ्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन होताना दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरते कोलमडले आहेत. त्यांना रोगाचा नायनाट कसा करावा, असा प्रश्न सतावत आहे.

कोट

उन्हाळी भुईमुगावरील फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फाॅस २५ टक्के प्रवाही १४०० मिली प्रतिहेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तीळ पिकासाठी २० मिली क्विनाॅल फॉस किंवा कार्बारील १० टक्के भुकटी पाण्यात मिसळून फवारावी.

श्रीरंग लिंबाळकर,

तालुका कृषी अधिकारी, उमरखेड