शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

वणी उपविभागात बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला.

ठळक मुद्देसोयाबीनची झाली माती : यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय मारक, पीक वाचविण्यासाठी केली जातेय धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच वणी उपविभागातील शेतकरी संकटात सापडला आहे. अती पावसाने सोयाबीनची माती झाली. आता कापसावरही बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी कमालिचा हतबल झाला आहे. यंदा हे दोनही नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.वणी तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात बोंडअळीने दस्तक दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होत आहे. यंदा मात्र त्याचे स्वरूप अतिशय तीव्र आहे. त्यामुळे जो कापूस फुटून आहे, तेवढाच कापूस शेतकऱ्यांच्या हाती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उर्वरित कापसाची बोंडे गुलाबी अळ्या पोखरत आहे. निसर्गाच्या या संकटाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहेत. यावर्षी परतीच्या पावसाने विलंब केला.ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेतात एकरी ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले. कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. कापूस विकून कर्जाची परतफेड करू, अशी स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र बोंडअळीने निराशा केली. परतीच्या पावसाने अनेक शेतातील फुटलेला कापूस ओला झाला. ओला कापूस बाजारात नेऊन विकताना व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची अक्षरश: लुट सुरू केली. शेतकऱ्यांची सध्या तरी केवळ एकच वेचाई झाली आहे. उर्वरित प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळीने शिरकाव केला. ह्या अळ्या आता कापसाची बोंडे पोरखत आहे. या अळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर प्रयत्न करित असले तरी त्यात फार यश येत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीने हल्ला केल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे यंदा कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता आहे.मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याएकीकडे सोयाबीनचे पीक शेतातच सडले. दुसरीकडे कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला. जो कापूस निघाला, तो वेचण्यासाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी वाढल्या आहे. दरवर्षी वणी, झरी व मारेगाव या तालुक्यांमध्ये चंद्रपूर, नांदेड व अन्य जिल्ह्यातून मजूर हंगामासाठी येतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे मजुरांनी या भागात पाठ फिरविली आहे. परिणामी स्थानिक मजुरांचे भाव वधारले असून विनंत्या, आर्जव करूनही स्थानिक मजूर काम करण्यासाठी शेतात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :agricultureशेती