शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

सोसायटीचे ८६ कोटींपैकी केवळ २५ लाख कर्ज वसूल

By admin | Updated: December 30, 2016 00:16 IST

तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून वितरित केलेल्या ८६ कोटी रुपयांच्या कर्जापैकी केवळ २५ लाख रुपयेच वसुली झाली आहे.

नोटबंदीचा परिणाम : महागावातील २८ सोसायट्यांचे भविष्य अंधकारमय संजय भगत   महागाव तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या माध्यमातून वितरित केलेल्या ८६ कोटी रुपयांच्या कर्जापैकी केवळ २५ लाख रुपयेच वसुली झाली आहे. वसुलीचा हा निच्चांक केवळ नोटबंदीमुळे असल्याचे सांगितले जात आहे. आता वसुलीच नसल्याने आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना नवीन कर्ज कसे द्यावे, असा प्रश्न सोसायट्यांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे तालुक्यातील २८ सोसायट्यांचे भविष्यही अंधकारमय होणार आहे. महागाव तालुक्यात २८ विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून चालू हंगामात १२ कोटी ११ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. त्यापैकी केवळ ३५ सभासदांनी चालू कर्जाचे १९ लाख ५३ हजार आणि थकित म्हणून पाच लाख ४७ हजार असे २५ लाख ५४ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. वसुली उद्दीष्ट येत्या मार्चपर्यंत गाठता आला नाही तर येणाऱ्या खरीप हंगामावर त्याचा परिणाम पडणार आहे. चालू कर्जाला सहा तर थकित कर्जाच्या रकमेला १३ टक्के व्याजाचा भुर्दंड एप्रिल महिन्यापासून पडणार आहे. साधारणत: २० हजार शेतकऱ्यांना नोटबंदीचा फटका बसला असून, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहे. जुन्या नोटांच्या चलनबंदीचा परिणाम आता सर्वत्र जाणवू लागला आहे. जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची बंदी आहे. त्यामुळे आता वसुलीसुद्धा होत नाही. वसुली थकल्यामुळे त्याचा थेट परिणाम येत्या खरीप हंगामात बसणार असून, तोपर्यंत सोसायट्यांची आर्थिक नाकेबंदी झालेली आहे. हा तिढा कसा आणि केव्हा सुटणार याची काहीच शाश्वती दिसत नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे संपूर्ण आर्थिक चक्र थांबले आहे. सोसायट्यांची समस्या आणि भविष्यातील शेतकऱ्यांना बसणारी झळ याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवार होणार आहे. (शहर प्रतिनिधी) बँकेतून निघतात केवळ दोन हजार रुपये नोटाबंदीचा निर्णय सुरूवातीला चांगाला वाटत होता. आता पन्नास दिवस उलटल्यानंतरही काहीच सुधारणा झालेली दिसत नाही. शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचे पैसे थेट बँकेत जमा होतात. बँकेतून दोन हजार रुपयांच्यावर पैसे निघत नाहीत. ही वस्तुस्थिती आता शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहे. जिल्हा बँकेत ऊस व कापसाचे पैसे जमा होत असून, जिल्हा बँकेतून आरटीजीएस करून नॅशनलाईज बँकेत जमा करून घेतल्या जात आहेत. परंतु दोन-चार हजार रुपयाचे वर पैसे दिल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे घरी लग्न कार्य किंवा ओलितासाठी खरेदी करणाऱ्याच्या शेती उपयोगी साहित्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली.