शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बालगृहातील अनाथ मुले जगताहेत उपेक्षेचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनने प्रश्न वाढले, अन्न, वस्त्र उधारीवर, दोन हजारात खर्चाची मोठी यादी, दीड वर्षांपासून अनुदान नाही

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुणाचे मातृ-पितृ छत्र हरविलेले, कुणाच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, तर कुणाला मायबापांनी सोडून दिलेले, अशा अनाथांना मागील दीड वर्षांपासून उपेक्षेचे जीणे जगावे लागत आहे. वटफळीतील अशोका बालगृहातील अनाथांच्या वाट्याला सतत दु:खच आले आहे.महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावतीद्वारा संचालित अशोक बालगृहात ४० अनाथांचे संगोपन केले जाते. शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या अनाथांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो हे सदर बालगृह चालवितात. प्रत्येक मुलामागे दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. यातून इमारत भाडे, मुलांचे कपडे, औषधोपचार, कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च संस्थेला भागवावा लागतो. पूर्वी या बालगृहाला मिळत असलेले धान्यही शासनाने बंद केले आहे. आता तर अनुदानही मागील दीड वर्षांपासून थांबले. उधारीवर किराणा, कपडे आणून या बालकांचे पालनपोषण केले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या मुलांना बालगृहात मायेची ऊब मिळाली. मात्र आता प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. संस्थेकडून शक्य तितके प्रयत्न होत असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे हेच त्यावर औषध आहे.बालगृहातील या मुलांवर चांगले संस्कार होत आहे. अनेक कलागुण आणि शिक्षणाची आवड त्यांच्यात आहे. अशावेळी त्यांना शासनाकडून प्रोत्साहन आणि बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नातेवाईकही नेण्यास तयार नाहीबालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बालगृहातील अनेक मुले लहानाची मोठी झाली. त्यांच्यासाठीचा खर्च वाढत गेला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडते, कसेतरी भागवावे लागते, अशी खंत प्राचार्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.स्मरणपत्राला केराची टोपलीबालगृहातील मुलांच्या संगोपनासाठी उधार, उसणवार करावी लागत आहे. हा प्रश्न महिला बाल कल्याण विभागाकडे वारंवार मांडण्यात आला. तरीही गेली दीड वर्षांपासून अनुदान दिलेले नाही. शासनस्तरावर अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला जावा, असे अशोक बालगृहाचे अध्यक्ष प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार