शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

बालगृहातील अनाथ मुले जगताहेत उपेक्षेचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनने प्रश्न वाढले, अन्न, वस्त्र उधारीवर, दोन हजारात खर्चाची मोठी यादी, दीड वर्षांपासून अनुदान नाही

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुणाचे मातृ-पितृ छत्र हरविलेले, कुणाच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, तर कुणाला मायबापांनी सोडून दिलेले, अशा अनाथांना मागील दीड वर्षांपासून उपेक्षेचे जीणे जगावे लागत आहे. वटफळीतील अशोका बालगृहातील अनाथांच्या वाट्याला सतत दु:खच आले आहे.महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावतीद्वारा संचालित अशोक बालगृहात ४० अनाथांचे संगोपन केले जाते. शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या अनाथांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो हे सदर बालगृह चालवितात. प्रत्येक मुलामागे दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. यातून इमारत भाडे, मुलांचे कपडे, औषधोपचार, कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च संस्थेला भागवावा लागतो. पूर्वी या बालगृहाला मिळत असलेले धान्यही शासनाने बंद केले आहे. आता तर अनुदानही मागील दीड वर्षांपासून थांबले. उधारीवर किराणा, कपडे आणून या बालकांचे पालनपोषण केले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या मुलांना बालगृहात मायेची ऊब मिळाली. मात्र आता प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. संस्थेकडून शक्य तितके प्रयत्न होत असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे हेच त्यावर औषध आहे.बालगृहातील या मुलांवर चांगले संस्कार होत आहे. अनेक कलागुण आणि शिक्षणाची आवड त्यांच्यात आहे. अशावेळी त्यांना शासनाकडून प्रोत्साहन आणि बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नातेवाईकही नेण्यास तयार नाहीबालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बालगृहातील अनेक मुले लहानाची मोठी झाली. त्यांच्यासाठीचा खर्च वाढत गेला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडते, कसेतरी भागवावे लागते, अशी खंत प्राचार्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.स्मरणपत्राला केराची टोपलीबालगृहातील मुलांच्या संगोपनासाठी उधार, उसणवार करावी लागत आहे. हा प्रश्न महिला बाल कल्याण विभागाकडे वारंवार मांडण्यात आला. तरीही गेली दीड वर्षांपासून अनुदान दिलेले नाही. शासनस्तरावर अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला जावा, असे अशोक बालगृहाचे अध्यक्ष प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार