शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बालगृहातील अनाथ मुले जगताहेत उपेक्षेचे जीणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनने प्रश्न वाढले, अन्न, वस्त्र उधारीवर, दोन हजारात खर्चाची मोठी यादी, दीड वर्षांपासून अनुदान नाही

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुणाचे मातृ-पितृ छत्र हरविलेले, कुणाच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, तर कुणाला मायबापांनी सोडून दिलेले, अशा अनाथांना मागील दीड वर्षांपासून उपेक्षेचे जीणे जगावे लागत आहे. वटफळीतील अशोका बालगृहातील अनाथांच्या वाट्याला सतत दु:खच आले आहे.महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावतीद्वारा संचालित अशोक बालगृहात ४० अनाथांचे संगोपन केले जाते. शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या अनाथांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो हे सदर बालगृह चालवितात. प्रत्येक मुलामागे दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. यातून इमारत भाडे, मुलांचे कपडे, औषधोपचार, कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च संस्थेला भागवावा लागतो. पूर्वी या बालगृहाला मिळत असलेले धान्यही शासनाने बंद केले आहे. आता तर अनुदानही मागील दीड वर्षांपासून थांबले. उधारीवर किराणा, कपडे आणून या बालकांचे पालनपोषण केले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या मुलांना बालगृहात मायेची ऊब मिळाली. मात्र आता प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. संस्थेकडून शक्य तितके प्रयत्न होत असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे हेच त्यावर औषध आहे.बालगृहातील या मुलांवर चांगले संस्कार होत आहे. अनेक कलागुण आणि शिक्षणाची आवड त्यांच्यात आहे. अशावेळी त्यांना शासनाकडून प्रोत्साहन आणि बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नातेवाईकही नेण्यास तयार नाहीबालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बालगृहातील अनेक मुले लहानाची मोठी झाली. त्यांच्यासाठीचा खर्च वाढत गेला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडते, कसेतरी भागवावे लागते, अशी खंत प्राचार्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.स्मरणपत्राला केराची टोपलीबालगृहातील मुलांच्या संगोपनासाठी उधार, उसणवार करावी लागत आहे. हा प्रश्न महिला बाल कल्याण विभागाकडे वारंवार मांडण्यात आला. तरीही गेली दीड वर्षांपासून अनुदान दिलेले नाही. शासनस्तरावर अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला जावा, असे अशोक बालगृहाचे अध्यक्ष प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार