शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या क्षणिक अविचाराने लेकरं झाली अनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:30 IST

तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली.

ठळक मुद्देलाठी येथील खूनप्रकरण : मायाला मिळाली न्यायालयीन कोठडी, तुरूंगात रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली. बाप संपला, आई कैदेत राहणार, तर ही मुले कोणाच्या आधाराने दिवस काढतील, हा हृदयद्रावक प्रश्न लाठीवासीयांच्या मनाला छळत आहे.मोतीराम धोबे यांचे मुळ गाव चंद्रपूर तालुक्यातील हडस्ती. १९९८ साली वढा येथील मायाचे मोतीरामसोबत लग्न झाले. संसाराच्या वेलीवर दोन फुलेही उमलली. २००९ मध्ये मोतीरामला भालर वसाहतीत एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे त्यांचे कुटुंब भालर जवळील लाठी येथे स्थायिक झाले. लाठीतच स्वत:चे घर उभारले. मात्र मागीलवर्षी सुरक्षा रक्षकांची कंपनी बंद पडल्याने त्याचे काम सुटले. तेव्हापासून दोेघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवित होते. मोठी मुलगी मिनल ही चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाला शिकत आहे. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातच राहते, तर मुलगा भालर येथील विद्यालयात नववीला शिकत आहे. मोतीराम हा सुरूवातीपासूनच मायाकडे संशयाच्या नजरेनं पाहत असल्याचे मायाने सांगितले. दरम्यान त्याला दारूचे व्यसनही लागल्याने त्याने दारू पिऊन मायाला त्रास देणे सुरू केले. पतीच्या त्रासापायी मायाने दोन वर्षापूर्वी घरात फाशी लावून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारच्या लोकांनी तिला त्यावेळी वाचविले. संशयाच्या भूताने पछाडलेला मोतीराम मायाला माहेरीदेखील जाऊ देत नसे. जर ती माहेरी गेली तर तेथे जाऊन धिंगाणा घालायचा, असे माया सांगते. गुरूवारी रात्री घरी स्वयंपाक शिजला नाही. तिघेही जण उपाशीच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे ५ वाजता मोतीरामने मायाच्या अंगावर फ्रिजमधील थंड पाणी टाकून उठविले व तुझी फोनवरील आॅडिओ क्लीप मी ऐकली आहे. तु रिपोर्ट द्यायला ठाण्यात चल, असा तगादा लावला. मात्र मायाजवळ याचा काही पुरावा नसल्याने तिने नकार दिला. त्यावरून मोतीरामने तिला काठीने मारणे सुरू केले. तेव्हाच मायाने तिचा चंद्रपूर येथील दीर संदीप धोबे याला फोन करून माहिती दिली. आज तुझा भाऊ किंवा मी तरी मरणार, असेही सांगितले.त्यानंतर तिने मोतीरामच्या हातातील काठी हिसकावून त्या काठीने मारणे सुरू केले. तेव्हा मोतीरामने पायाच्या कैचित मायाची मान पकडून दाबण्याचा प्रयत्न केला. त्यातून मायाने सुटका करून स्वत:च्या ओढणीने गळा आवळून मोतीरामला ठार केले.त्यानंतर तिने पुन्हा दिराला फोन करून मोतीरामचा मी खून केल्याचे सांगितले. तेवढ्यात मुलगा यशही झोपेतून उठला. त्यानेही आरडाओरड केल्याने गावकरी जमले. ही माहिती शिरपूर ठाण्याला दिली. त्यावरून ठाणेदार दीपक पवार तातडीने लाठीला पोहोचले. मायाला अटक केली. न्यायालयाने तिला एक दिवसाची कोठडी सुनावली. मायाने गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केली.निराधार झालेल्या मुलाच्या शिक्षणाचे काय?आता माया जामीन मिळेपर्यंत तुरूंगात राहणार. त्यामुळे तिची मुलगी मिनल व मुलगा यश यांच्या शिक्षणात अडथळा तर येणार नाही ना, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या मिनल व यशही हडस्ती येथे आजीआजोबांकडे आहे. तेथेच मोतीरामवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. कुटुंबियांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पाडू नये, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Murderखून