शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत अध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी काँग्रेसला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 10:51 IST

नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

ठळक मुद्दे१४ फेब्रुवारी रोजी निवड शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस गेम चेंजच्या तयारीत

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वतंत्र ताकद आजमावली. त्यामध्ये काँग्रेसला राळेगाव येथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उर्वरित पाच ठिकाणी मात्र मित्र पक्षांची गरज भासणार आहे. तरच चार नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येत आपल्या पदरात सत्तेचा वाटा अधिकचा कसा मिळेल याची वाटाघाटी करीत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गेम चेंजची व्यूहरचना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आखली जात आहे.

नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. राळेगाव येथे ११ सदस्य असल्याने स्पष्टपणे काँग्रेसची सत्ता येणार आहे. आता तेथे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत भागीदारी देते का याकडे लक्ष लागले आहे. कळंब येथे शिवसेनेच्या मदतीशिवाय काँग्रेसचे गणित पूर्ण होत नाही. अशीच स्थिती महागाव येथील आहे.

मारेगाव, झरीमध्येही काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादीची साथ लाभणार आहे. तर ,बाभूळगाव येथे शिवसेना मोठा पक्ष असून तेथे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय शिवसेनेला स्थिर सत्ता स्थापन करता येणार नाही. सर्वच ठिकाणी जोडतोडचे गणित आहे. मात्र तरीही जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये मोठे संख्याबळ असलेला पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत राहणार हे निश्चित मानले जात आहे. वाटाघाटी करताना शिवसेना, राष्ट्रवादीला थेट काँग्रेस सोबतच बोलणी करावी लागणार आहे. यात प्रत्येक नगरपंचायतनिहाय समीकरणावरून आपले पारडे कसे जड राहील याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

मुत्सद्देगिरीत राष्ट्रवादी नेहमीच वरचढ

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठल्याही सत्ता स्थापनेच्या समीकरणात राष्ट्रवादी नेहमीच आक्रमक राहिली आहे. संख्याबळ कमी असले तरी महत्त्वाची पदे पदरात पाडण्याचा कायम प्रयत्न केला जातो. असे प्रयोग यापूर्वी नगरपरिषद, जिल्हा परिषदेत यशस्वी झाले आहे. आताही नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ नाही. पूर्ण जिल्ह्यात चारच सदस्य आहे. या चारवरही शेवटच्या क्षणापर्यंत पद मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संधान साधण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस