शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

नगरपंचायत अध्यक्षपदासाठी पाच ठिकाणी काँग्रेसला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 10:51 IST

नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.

ठळक मुद्दे१४ फेब्रुवारी रोजी निवड शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस गेम चेंजच्या तयारीत

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वतंत्र ताकद आजमावली. त्यामध्ये काँग्रेसला राळेगाव येथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उर्वरित पाच ठिकाणी मात्र मित्र पक्षांची गरज भासणार आहे. तरच चार नगरपंचायतीत काँग्रेसचा नगराध्यक्ष बसण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येत आपल्या पदरात सत्तेचा वाटा अधिकचा कसा मिळेल याची वाटाघाटी करीत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गेम चेंजची व्यूहरचना शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आखली जात आहे.

नगरपंचायतीच्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त १४ फेब्रुवारीचा आहे. नगराध्यक्ष निवड सभा होणार आहे. तत्पूर्वी ९ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. राळेगाव येथे ११ सदस्य असल्याने स्पष्टपणे काँग्रेसची सत्ता येणार आहे. आता तेथे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत भागीदारी देते का याकडे लक्ष लागले आहे. कळंब येथे शिवसेनेच्या मदतीशिवाय काँग्रेसचे गणित पूर्ण होत नाही. अशीच स्थिती महागाव येथील आहे.

मारेगाव, झरीमध्येही काँग्रेसला शिवसेना-राष्ट्रवादीची साथ लाभणार आहे. तर ,बाभूळगाव येथे शिवसेना मोठा पक्ष असून तेथे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय शिवसेनेला स्थिर सत्ता स्थापन करता येणार नाही. सर्वच ठिकाणी जोडतोडचे गणित आहे. मात्र तरीही जिल्ह्यात नगरपंचायतीमध्ये मोठे संख्याबळ असलेला पक्ष काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसचा वरचष्मा या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत राहणार हे निश्चित मानले जात आहे. वाटाघाटी करताना शिवसेना, राष्ट्रवादीला थेट काँग्रेस सोबतच बोलणी करावी लागणार आहे. यात प्रत्येक नगरपंचायतनिहाय समीकरणावरून आपले पारडे कसे जड राहील याचा प्रयत्न शिवसेना, राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

मुत्सद्देगिरीत राष्ट्रवादी नेहमीच वरचढ

स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठल्याही सत्ता स्थापनेच्या समीकरणात राष्ट्रवादी नेहमीच आक्रमक राहिली आहे. संख्याबळ कमी असले तरी महत्त्वाची पदे पदरात पाडण्याचा कायम प्रयत्न केला जातो. असे प्रयोग यापूर्वी नगरपरिषद, जिल्हा परिषदेत यशस्वी झाले आहे. आताही नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला पुरेसे संख्याबळ नाही. पूर्ण जिल्ह्यात चारच सदस्य आहे. या चारवरही शेवटच्या क्षणापर्यंत पद मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून संधान साधण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस