शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार क्विंटल तूर उघड्यावर

By admin | Updated: March 6, 2017 01:17 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली.

चार लाख बारदान्याची गरज : जयपूर, कोलकाता येथून ट्रक पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली. मात्र जयपूर आणि कोलकातावरून बारदाना घेऊन निघालेले ट्रक अजूनही पोहोचले नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा १५ दिवसांपासून मुक्काम आहे. बारदान्याअभावी सहा केंद्रांवर तुरीचा काटा झाला नाही. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ३० हजार क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. सोमवारपर्यंत बारदाना न आल्यास स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.आर्णी, राळेगाव, पुसद, कळंब, वणी आणि घाटंजी हे सहा केंद्र अजूनही बंद आहेत. या केंद्राबाहेर शेकडो क्विंटल तुरीचे ढीग पडून आहेत, तर इतर ९ केंद्रांवरही तुफान गर्दी आहे. बारदाना आणि जागा नसल्यामुळे सहा केंद्रावरची खरेदी थांबली आहे. २८ फेब्रुवारीपासून बारदाना घेऊन निघालेला ट्रक अजूनही जिल्ह्यात पोहोचला नाही. यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रावरच्या अडचणी वाढल्या आहेत.आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने केली आहे. तर या १५ केंद्रांवर अजूनही ३० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये दररोज वाढ होत आहे. अशा स्थितीतही बारदाना न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्याला १५ मार्चपर्यंतच्या खरेदीसाठी दोन लाख पोत्यांचा बारदाना लागणार होता. १५ एप्रिलपर्यंतच्या खरेदीसाठी चार लाख पोते बारदान्याची गरज आहे. यानंतरही खरेदी सुरू राहिल्यास सहा लाख पोते बारदाना लागणार आहे. तरी राज्य शासनाने नाफेडच्या केंद्रावर अजूनही बारदाना पोहचविला नाही. यातून सर्वत्र मोठा गोंधळ उडाला आहे. मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांना जयपूर आणि कोलकाता येथून बारदाना निघाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात पाच ते सहा दिवस झाल्यानंतरही बारदाना आला नाही. जिल्ह्याला आतापर्यंत केवळ एक लाख पोत्याचा बारदाना मिळाला आहे. तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनने तोडगा काढण्यासाठी सेंट्रल वेअर हाउसकडून तात्पुरता बारदाना उचलला. आता तो संपला आहे. यामुळे सोमवारपर्यंत बारदाना न पोहोचल्यास शासकीय तूर खरेदी केंद्रावर स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.सहा कोटींचे चुकारे थांबलेजिल्ह्यातील केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. तुरीच्या खरेदीनंतर १५ ते २० दिवसानंतर पैसे मिळत आहेत. यानुसार आतापर्यंत ३० कोटींच्या चुकाऱ्यांचे पैसे जिल्ह्याकडे वळते झाले आहेत. तर सहा क ोटींच्या चुकाऱ्याचे पैसे बाकी आहेत.पावसाच्या अंदाजाने तुरीला धोकाकेंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. शेडच्या बाहेर पोते पडले आहेत. ३० हजार क्विंटल बाहेर आहे. अशात हवामान खात्याने सोमवार ते बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उघड्यावरील तूर भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्याला लागणारा बारदाना तत्काळ मिळावा म्हणून ८ ते १० दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. जयपूर आणि कोलकतावरून बारदाना निघाला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तसा संदेशही मिळाला आहे. लवकरच बारदाना पोहचेल आणि तूर खरेदीतील अडचणी दूर होतील.- बजरंग ठाकरे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, यवतमाळ