शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार क्विंटल तूर उघड्यावर

By admin | Updated: March 6, 2017 01:17 IST

शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली.

चार लाख बारदान्याची गरज : जयपूर, कोलकाता येथून ट्रक पोहोचलेच नाहीरूपेश उत्तरवार यवतमाळ शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आणि पणनमंत्र्यांनी बुलडाण्याच्या बैठकीत त्याचा पुनरुच्चार करीत बारदाना तत्काळ पोहोचेल, अशी माहिती दिली. मात्र जयपूर आणि कोलकातावरून बारदाना घेऊन निघालेले ट्रक अजूनही पोहोचले नाही. यामुळे तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा १५ दिवसांपासून मुक्काम आहे. बारदान्याअभावी सहा केंद्रांवर तुरीचा काटा झाला नाही. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ३० हजार क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. सोमवारपर्यंत बारदाना न आल्यास स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.आर्णी, राळेगाव, पुसद, कळंब, वणी आणि घाटंजी हे सहा केंद्र अजूनही बंद आहेत. या केंद्राबाहेर शेकडो क्विंटल तुरीचे ढीग पडून आहेत, तर इतर ९ केंद्रांवरही तुफान गर्दी आहे. बारदाना आणि जागा नसल्यामुळे सहा केंद्रावरची खरेदी थांबली आहे. २८ फेब्रुवारीपासून बारदाना घेऊन निघालेला ट्रक अजूनही जिल्ह्यात पोहोचला नाही. यामुळे शासकीय तूर खरेदी केंद्रावरच्या अडचणी वाढल्या आहेत.आत्तापर्यंत जिल्ह्यातील १५ केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने केली आहे. तर या १५ केंद्रांवर अजूनही ३० हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये दररोज वाढ होत आहे. अशा स्थितीतही बारदाना न पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.जिल्ह्याला १५ मार्चपर्यंतच्या खरेदीसाठी दोन लाख पोत्यांचा बारदाना लागणार होता. १५ एप्रिलपर्यंतच्या खरेदीसाठी चार लाख पोते बारदान्याची गरज आहे. यानंतरही खरेदी सुरू राहिल्यास सहा लाख पोते बारदाना लागणार आहे. तरी राज्य शासनाने नाफेडच्या केंद्रावर अजूनही बारदाना पोहचविला नाही. यातून सर्वत्र मोठा गोंधळ उडाला आहे. मार्केटिंग फेडरेशन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांना जयपूर आणि कोलकाता येथून बारदाना निघाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात पाच ते सहा दिवस झाल्यानंतरही बारदाना आला नाही. जिल्ह्याला आतापर्यंत केवळ एक लाख पोत्याचा बारदाना मिळाला आहे. तुरीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. यामुळे मार्केटिंग फेडरेशनने तोडगा काढण्यासाठी सेंट्रल वेअर हाउसकडून तात्पुरता बारदाना उचलला. आता तो संपला आहे. यामुळे सोमवारपर्यंत बारदाना न पोहोचल्यास शासकीय तूर खरेदी केंद्रावर स्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.सहा कोटींचे चुकारे थांबलेजिल्ह्यातील केंद्रावर ७३ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. तुरीच्या खरेदीनंतर १५ ते २० दिवसानंतर पैसे मिळत आहेत. यानुसार आतापर्यंत ३० कोटींच्या चुकाऱ्यांचे पैसे जिल्ह्याकडे वळते झाले आहेत. तर सहा क ोटींच्या चुकाऱ्याचे पैसे बाकी आहेत.पावसाच्या अंदाजाने तुरीला धोकाकेंद्रावर मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली. शेडच्या बाहेर पोते पडले आहेत. ३० हजार क्विंटल बाहेर आहे. अशात हवामान खात्याने सोमवार ते बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे उघड्यावरील तूर भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्याला लागणारा बारदाना तत्काळ मिळावा म्हणून ८ ते १० दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. जयपूर आणि कोलकतावरून बारदाना निघाला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून तसा संदेशही मिळाला आहे. लवकरच बारदाना पोहचेल आणि तूर खरेदीतील अडचणी दूर होतील.- बजरंग ठाकरे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, यवतमाळ