शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची खुलेआम लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:38 IST

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांसाठी मात्र पायघड्याग्रेडर्सची मनमानी, मुजोरीही कायम, संरक्षण कुणाचे ?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे. यातून प्रति क्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांची ‘मार्जीन’ राहत असून कोट्यवधींची ‘उलाढाल’ सुरू आहे.सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी (जिनिंग-प्रेसिंग) असे म्हणण्याची वेळ आली आहे. या केंद्रावरील ग्रेडर्सच्या मनमानी व मुजोरीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हे ग्रेडर्स शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचेच हित अधिक जोपासत आहेत. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेला कापूस ओला आहे, चांगला दर्जा नाही, कमी प्रतिचा आहे, अशी कारणे सांगून सर्रास नाकारला जात आहे. मग शेतकऱ्यांना नाईलाजाने हा कापूस खासगी बाजारात पडलेल्या भावात विकावा लागत आहे. व्यापारी अवघ्या तीन ते साडेतीन हजार रूपये क्विंटल दराने शेतकऱ्यांच्या या कापसाची खरेदी करतो. नंतर हाच कापूस कुण्यातरी शेतकऱ्यांचा सातबारा वापरुन सीसीआयला विकला जातो. सीसीआयचे ग्रेडर्स हा कापूस व्यापाऱ्याने आणल्याने डोळे लावून स्वीकारतात. या कापसाला भावही पाच हजारांपेक्षा अधिक दिला जातो.

मार्जीनचे ‘वाटेकरी’ही अनेकअशा पद्धतीने प्रत्येक क्विंटल मागे व्यापारी व ग्रेडर्सच्या संगनमताने दोन ते अडीच हजारांची ‘मार्जीन’ राहते. आतापर्यंत हजारो क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय व पणन महासंघाने केली आहे. त्यातील केवळ ‘मार्जीन’ कोट्यवधी रुपयांची झाली आहे. या मार्जीनचे ‘वाटेकरी’ही अनेक आहेत. त्यामुळेच सीसीआयच्या अकोला, औरंगाबाद व मुंबई कार्यालयांमधून ग्रेडर्सला साधा जाब विचारण्याची तसदी घेतली जात नाही.

राजकीय आवाज मुंबईपर्यंत पोहोचत नाहीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या या गोंधळाबाबत अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आवाज उठविला जातो. परंतु त्यांचा आवाज सीसीआयच्या मुंबई मुख्यालयापर्यंत पोहोचत नाही. पर्यायाने सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रांवर सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट कायम आहे.रूईगाठीतही ग्रेडर्स-व्यापाऱ्यांचे साटेलोटेसीसीआयने खरेदी केलेल्या कापसापासून रूईगाठी बनविल्या जातात. परंतु त्यातही व्यापारी व ग्रेडर्सचे साटेलोटे असून सीसीआयला अर्थात शासनाला कोट्यवधींचा चुना लावला जात आहे. उच्च दर्जाच्या कापसापासून बनलेल्या गाठी व्यापाऱ्यांना दिल्या जातात. तर व्यापाऱ्यांकडील कमी दर्जाच्या कापसापासून बनलेल्या गाठी सीसीआयच्या गाठींमध्ये अ‍ॅडजेस्ट केल्या जातात. यातही ग्रेडर्ससाठी मोठी मार्जीन ठेवली जाते. व्यापारी व ग्रेडर्सची साखळी शेतकरीच नव्हे तर सीसीआयला पर्यायाने शासनाचीसुद्धा लूट व फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cottonकापूस