शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये जमावबंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.

ठळक मुद्देमुक्त संचार : वाहनांची गर्दी वाढली, चौकाचौकात नागरिकांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. मात्र शहरात नागरिकांनी जमावबंदी आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने बिनबोभाटपणे धावत होती. महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, श्रीरामपूर व इटावा वॉर्ड परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकाºयांनी ही गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केले. त्याचे नागरिकांनी सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.जिल्हाधिकाºयांनी ३१ मार्चपर्यंत गरज नसेल तर घरातच बसून राहण्याचे आवाहन केले. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. मात्र नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे सोमवारी दिसून आले. अनेकांनी घरातच राहण्याऐवजी रस्त्यांवर फेरफटका मारला. वाहनांचीही गर्दी झाली होती.कठोर कारवाईची ठाणेदारांची तंबीजिल्ह्यात कलम १४४ लागू आहे. त्यानुसार नागरिकांना एकत्र येण्यासह वाहनांची गर्दी करण्यावर पूर्णत: बंदी आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी दिली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आत्राम यांनी दिला. तथापि, ग्रामीण भागात अद्यापही व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांना कोरोनाबाबत आवश्यक तेवढी माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे गावागावात याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या