शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुसदमध्ये जमावबंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.

ठळक मुद्देमुक्त संचार : वाहनांची गर्दी वाढली, चौकाचौकात नागरिकांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. मात्र शहरात नागरिकांनी जमावबंदी आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने बिनबोभाटपणे धावत होती. महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, श्रीरामपूर व इटावा वॉर्ड परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकाºयांनी ही गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केले. त्याचे नागरिकांनी सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.जिल्हाधिकाºयांनी ३१ मार्चपर्यंत गरज नसेल तर घरातच बसून राहण्याचे आवाहन केले. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. मात्र नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे सोमवारी दिसून आले. अनेकांनी घरातच राहण्याऐवजी रस्त्यांवर फेरफटका मारला. वाहनांचीही गर्दी झाली होती.कठोर कारवाईची ठाणेदारांची तंबीजिल्ह्यात कलम १४४ लागू आहे. त्यानुसार नागरिकांना एकत्र येण्यासह वाहनांची गर्दी करण्यावर पूर्णत: बंदी आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी दिली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आत्राम यांनी दिला. तथापि, ग्रामीण भागात अद्यापही व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांना कोरोनाबाबत आवश्यक तेवढी माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे गावागावात याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या