शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुसदमध्ये जमावबंदीला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.

ठळक मुद्देमुक्त संचार : वाहनांची गर्दी वाढली, चौकाचौकात नागरिकांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोरोना प्रतिबंधासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा सतर्क आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहे. मात्र शहरात नागरिकांनी जमावबंदी आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण्यात आला. मात्र येथील नागरिकांनी या आदेशाला अक्षरश: धाब्यावर बसविल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर मुक्तसंचार करीत होते.शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने बिनबोभाटपणे धावत होती. महात्मा गांधी चौक, महात्मा फुले चौक, बसस्थानक परिसर, श्रीरामपूर व इटावा वॉर्ड परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हाधिकाºयांनी ही गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केले. त्याचे नागरिकांनी सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.जिल्हाधिकाºयांनी ३१ मार्चपर्यंत गरज नसेल तर घरातच बसून राहण्याचे आवाहन केले. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जनजागृती करीत आहे. मात्र नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे सोमवारी दिसून आले. अनेकांनी घरातच राहण्याऐवजी रस्त्यांवर फेरफटका मारला. वाहनांचीही गर्दी झाली होती.कठोर कारवाईची ठाणेदारांची तंबीजिल्ह्यात कलम १४४ लागू आहे. त्यानुसार नागरिकांना एकत्र येण्यासह वाहनांची गर्दी करण्यावर पूर्णत: बंदी आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी तंबी शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी दिली. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाºयावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आत्राम यांनी दिला. तथापि, ग्रामीण भागात अद्यापही व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही नागरिकांना कोरोनाबाबत आवश्यक तेवढी माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यामुळे गावागावात याबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या