शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राज्यातील केवळ अडीचशे गुरुजींनी दिली क्षमता चाचणी; हजारोंनी टाकला बहिष्कार

By अविनाश साबापुरे | Updated: September 18, 2023 19:55 IST

आश्रमशाळा शिक्षकांनी उडविला परीक्षेचा फज्जा ; आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षकांसाठी क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.

यवतमाळ : गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणून राज्यभरातील आश्रमशाळा शिक्षकांसाठी शासनाने क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने रविवारी या परीक्षेचा राज्यात फज्जा उडाला. राज्यात केवळ २६१ शिक्षकांनी परीक्षा दिल्याचा अहवाल प्रशासनाने आयुक्तांकडे पाठविला आहे.

आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षकांसाठी क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, हा शिक्षकांवर अन्यायकारक निर्णय लादला जात आहे, अशी भूमिका घेत आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला. आदिवासी विकास आयुक्त कार्यालय अंतर्गत राज्यात चार विभाग असून ३० प्रकल्प कार्यालये आहेत. त्या अंतर्गत हजारो आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रमशाळांमधील सुविधांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. केवळ शिक्षकांची परीक्षा घेऊन या शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत यांनी केला आहे. संघटनेने घोषित केलेल्या बहिष्कार आंदोलनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे अमरावती विभागातील अडीच हजार शिक्षकांपैकी केवळ १५ जणांनीच परीक्षेला हजेरी लावली. नागपूर विभागात २४, ठाणे विभागात ६५ आणि नाशिक विभागात केवळ १५७ अशा २६१ शिक्षकांनी ही चाचणी दिली. तर हजारो शिक्षकांनी बहिष्कार टाकला.

कुठे किती होती हजेरी?

- अमरावती विभाग : धारणी ०, पांढरकवडा ६, किनवट ३, अकोला ०, छत्रपती संभाजीनगर ५, पुसद १ अशा १५ शिक्षकांनी परीक्षा दिली. 

- नागपूर विभाग : भामरागड ४, अहेरी १०, गडचिरोली ०, देवरी १, भंडारा २, वर्धा ०, चिमूर ६, चंद्रपूर ०, नागपूर १ अशा २४ शिक्षकांनी परीक्षा दिली.

- ठाणे विभाग : शहापूर ०, सोलापूर ०, जव्हार ७, घोडेगाव ५, डहाणू ३, पेण ५० अशा फक्त ६५ शिक्षकांनी परीक्षा दिली.

- नाशिक विभाग : कळवण ०, राजूर ०, यावल १, तळोदा ८, नाशिक १६, नंदूरबार ४६, धुळे ८६ अशा १५७ शिक्षकांनी परीक्षा दिली.