शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

फटाके फोडण्यासाठी रात्री दोनच तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये सण-उत्सवाच्या काळात होणाऱ्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गरोदर स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होतो. यामुळे न्यायालयाने आतषबाजीची आचारसंहिताच जारी केली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत, अन्यथा कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून याबाबत प्रचार-प्रसिद्धी करावी, असेही सांगण्यात आले आहे. स्थानिक नगर परिषद, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती आवश्यक आहे. न्यायालयाने ग्रीन क्रॅकर्स याच फटाक्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. हे नियम मोडून जो कोणी आतषबाजी करील त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे समजून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदेत दिली. 

पोलीस मित्र म्हणून सतर्क राहावेसण-उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन विविध पद्धतीने गुन्हे करणारे गुन्हेगार सक्रिय होतात. अशा गुन्हेगारांना कोणीही बळी पडू नये यासाठी नागरिकांनी पोलीस मित्र बनून सतर्क राहावे. दागिने चमकवून देतो, पोलीस असल्याचे सांगून अंगझडती घेणे, बँक, एटीएम, धान्य बाजारात पाळत ठेवून नंतर अंगावर घाण असल्याचे सांगणे, वाहन पंक्चर झाल्याचे सांगणे अशा स्वरूपाच्या भूलथापा देऊन पैसे उडविले जातात. महिलांची गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळ काढला जातो. सेल्समन असल्याचे सांगत घरात चोरी केली जाते. कुलूपबंद घरांनाही लक्ष्य केले जाते. या सर्व प्रकारच्या गुन्हेगारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. सण-उत्सवाच्या काळात मालमत्तेसंदर्भातील गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांचे फिक्स पाॅइंट, पेट्रोलिंग, ऑल आउट ऑपरेशन, जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी केल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस दलातील ५०४ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीयवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५०४ जवानांना बढती देण्यात आली आहे. विभागीय पदोन्नती समितीने ही यादी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रविवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पोलीस दलात कार्यरत असलेल्या १०७ जमादारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या १७१ जणांना पोलीस हवालदार म्हणून बढती देण्यात आली. शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या २२६ जणांना पोलीस नाईक शिपाई म्हणून बढती देण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे गिफ्ट मिळाले आहे. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, एलसीबीप्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021