शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

अत्यावश्यक असेल तरच रूग्णाला रेफर करा

By admin | Updated: June 27, 2015 00:37 IST

ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर ...

सचिंद्र प्रताप सिंह : आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश, गुणवत्तेवर भर यवतमाळ : ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर रेफर करण्याची पध्दत त्वरित थांबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रेफर केल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसतो. गरज नसतांना रुग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावर रेफर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अडीअडचणी व राज्यस्तरावर त्यांच्या प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, बांधकामचे अधीक्षक अभियंता सोनटक्के यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पॉवर पॉईंट प्रेजनटेशनद्वारे माहिती जाणून घेतली. ज्या विभागांचे प्रस्ताव राज्यस्तरावर प्रलंबित आहे अशा प्रस्तावांचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा घेण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीत आरोग्य विभागाची माहिती घेतांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातून आवश्यकता नसताना अनेक रुग्ण तालुका व जिल्हास्तरावर रेफर केले जात असल्याची बाब निदर्शनास आली. उपकेंद्रात प्रसूतीची सुविधा उपलब्ध असतांना यासाठी अनेक महिलांना वरील दवाखान्यात पाठविण्यात येते. यापुढे आवश्यकता नसतांना रुग्ण रेफर करू नये, तसे केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.विश्रामगृहात मद्यप्राशन आढळता कामा नये. तसेच अनावश्यक व्यक्तींना बैठका किंवा अन्य कार्यक्रम घेता येऊ नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:चा जिल्हा समजून या जिल्ह्यात पूर्ण कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. कामाबाबत आत्मीयता बाळगा म्हणजे कामात आनंद वाटेल. प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम राज्यात सर्वात चांगले असले पाहिजे. या भावनेतून करावे, अशी सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. गेल्या पाच वर्षात शासनाच्या विहित विभागाने जिल्ह्यात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)बांधकामात गुणवत्ता जपावीबांधकाम विभाग विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे खाते आहे. रस्ते, इमारती, पुलांची कामे केली जात असतांना ती गुणवत्तापूर्वकच असावी. या कामातील गैरप्रकार खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहांमध्ये चांगल्या सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने कामे करण्यासोबतच प्रत्येक विश्रामगृहामध्ये सीसीटीव्ही लावण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.