शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

अत्यावश्यक असेल तरच रूग्णाला रेफर करा

By admin | Updated: June 27, 2015 00:37 IST

ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर ...

सचिंद्र प्रताप सिंह : आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश, गुणवत्तेवर भर यवतमाळ : ग्रामीण भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध असतांना अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हास्तरावर रेफर करण्याची पध्दत त्वरित थांबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रेफर केल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करण्यासोबतच त्यांना आर्थिकदृष्ट्या फटका बसतो. गरज नसतांना रुग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावर रेफर केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागाच्या अडीअडचणी व राज्यस्तरावर त्यांच्या प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, बांधकामचे अधीक्षक अभियंता सोनटक्के यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांची पॉवर पॉईंट प्रेजनटेशनद्वारे माहिती जाणून घेतली. ज्या विभागांचे प्रस्ताव राज्यस्तरावर प्रलंबित आहे अशा प्रस्तावांचा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा घेण्याची सूचना त्यांनी केली. बैठकीत आरोग्य विभागाची माहिती घेतांना आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातून आवश्यकता नसताना अनेक रुग्ण तालुका व जिल्हास्तरावर रेफर केले जात असल्याची बाब निदर्शनास आली. उपकेंद्रात प्रसूतीची सुविधा उपलब्ध असतांना यासाठी अनेक महिलांना वरील दवाखान्यात पाठविण्यात येते. यापुढे आवश्यकता नसतांना रुग्ण रेफर करू नये, तसे केल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करू, असे जिल्हाधिकारी म्हणाले.विश्रामगृहात मद्यप्राशन आढळता कामा नये. तसेच अनावश्यक व्यक्तींना बैठका किंवा अन्य कार्यक्रम घेता येऊ नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:चा जिल्हा समजून या जिल्ह्यात पूर्ण कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. कामाबाबत आत्मीयता बाळगा म्हणजे कामात आनंद वाटेल. प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम राज्यात सर्वात चांगले असले पाहिजे. या भावनेतून करावे, अशी सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. गेल्या पाच वर्षात शासनाच्या विहित विभागाने जिल्ह्यात केलेल्या वेगवेगळ्या विकास कामांची माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)बांधकामात गुणवत्ता जपावीबांधकाम विभाग विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे खाते आहे. रस्ते, इमारती, पुलांची कामे केली जात असतांना ती गुणवत्तापूर्वकच असावी. या कामातील गैरप्रकार खपवून घेण्यात येणार नाही. जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहांमध्ये चांगल्या सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने कामे करण्यासोबतच प्रत्येक विश्रामगृहामध्ये सीसीटीव्ही लावण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.