शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

कपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:12 IST

राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले.

ठळक मुद्देशेतकरी परिषद : फेलोमन ट्रॅप अन ट्रायकोकार्ड वापरा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले. या संकटातून सुटका करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता फरदडच्या मागे न लागता कपाशीवर नांगर फिरवून शेत साफ करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. यामुळे किमान पुढील हंगामात किडींवर नियंत्रण मिळविता येईल असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.बळीराजा चेतना अभियान आणि कृषी विभागातर्फे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात गुरूवारी शेतकरी परिषद घेण्यात आली. त्यात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन परिसंवाद आणि जलयुक्त शिवार अभियानावर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कापसावर संशोधन करणारी मंडळी आणि शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी गुलाबी बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या. बीटी तंत्रज्ञानाने विकसीत बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी काही संकेत पाळले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले.गुलाबी बोंडअळीला नियंत्रित करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना गरजेच्या असून नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी उपटून फेकावी. त्याचा अंशही शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी कपाशी जाळावी. नंतर नांगरणी करून जमिनीची उलथापालथ करावी. यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा हल्ला होणार नाही, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.शेतकºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच या नुकसानीपासून बचाव करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच सल्ला कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक टी. एच. राठोड, सीआयसीआरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. नगराळे यांनीही दिला. या परिषदेला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्लेष नगराळे, अ‍ॅड. रामकृष्ण पाटील, विनोद जिल्हेवार, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कैलास वानखेडे, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.शास्त्रज्ञ म्हणतात ...गुलाबी बोंडअळीचे माहेरघर भारत आहे. येथूनच या अळीने जगभर उद्रेक केला. इतर ठिकाणी त्याचा उद्रेक थांबला. मात्र भारतात त्याचा उद्रेक कायम आहे.गत तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. गुजरातमध्ये त्यावर नियंत्रण करण्यात आले. त्याच पद्धतीने नियंत्रण केले, तर गुलाबी बोंडअळीवर मात शक्य आहे.शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सून पूर्व पेरणी टाळावीशेतकऱ्यांनी शक्यतो अर्ली व्हेरायटीचा अवलंब करावाफरदडचे उत्पादन घेण्याचा मोह टाळावाशेतात फेलोमेन ट्रॅप लावावा, नुकसानाची पातळी ओळखावीडोमकळ्या दिसताच त्यांचा कुचकरा करावाट्रायकोकार्डचा जादा वापर करावालाईट ट्रॅपचा वापर करावा, यामुळे गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे