शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कपाशीवर नांगर फिरवा, तरच बोंडअळीतून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:12 IST

राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले.

ठळक मुद्देशेतकरी परिषद : फेलोमन ट्रॅप अन ट्रायकोकार्ड वापरा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात गुलाबी बोंडअळीने कहर केला. यामुळे कापूस उत्पादक गारद झाले. या संकटातून सुटका करवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आता फरदडच्या मागे न लागता कपाशीवर नांगर फिरवून शेत साफ करावे, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. यामुळे किमान पुढील हंगामात किडींवर नियंत्रण मिळविता येईल असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.बळीराजा चेतना अभियान आणि कृषी विभागातर्फे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात गुरूवारी शेतकरी परिषद घेण्यात आली. त्यात कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन परिसंवाद आणि जलयुक्त शिवार अभियानावर विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कापसावर संशोधन करणारी मंडळी आणि शेतकऱ्यांनी आपले मत मांडले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कापूस कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत नेमाडे यांनी गुलाबी बोंडअळीच्या समूळ उच्चाटनासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सांगितल्या. बीटी तंत्रज्ञानाने विकसीत बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी काही संकेत पाळले नाही. त्यामुळे गुलाबी बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढल्याचे त्यांनी सांगितले.गुलाबी बोंडअळीला नियंत्रित करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना गरजेच्या असून नुकसानीचे प्रमाण अधिक असल्यास डिसेंबर अखेरपर्यंत कपाशी उपटून फेकावी. त्याचा अंशही शेतात राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी कपाशी जाळावी. नंतर नांगरणी करून जमिनीची उलथापालथ करावी. यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा हल्ला होणार नाही, असे डॉ. नेमाडे यांनी स्पष्ट केले.शेतकºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच या नुकसानीपासून बचाव करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. असाच सल्ला कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक टी. एच. राठोड, सीआयसीआरचे किटकशास्त्रज्ञ डॉ. नगराळे यांनीही दिला. या परिषदेला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विश्लेष नगराळे, अ‍ॅड. रामकृष्ण पाटील, विनोद जिल्हेवार, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कैलास वानखेडे, डॉ. प्रमोद यादगिरवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.शास्त्रज्ञ म्हणतात ...गुलाबी बोंडअळीचे माहेरघर भारत आहे. येथूनच या अळीने जगभर उद्रेक केला. इतर ठिकाणी त्याचा उद्रेक थांबला. मात्र भारतात त्याचा उद्रेक कायम आहे.गत तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला झाला. गुजरातमध्ये त्यावर नियंत्रण करण्यात आले. त्याच पद्धतीने नियंत्रण केले, तर गुलाबी बोंडअळीवर मात शक्य आहे.शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सून पूर्व पेरणी टाळावीशेतकऱ्यांनी शक्यतो अर्ली व्हेरायटीचा अवलंब करावाफरदडचे उत्पादन घेण्याचा मोह टाळावाशेतात फेलोमेन ट्रॅप लावावा, नुकसानाची पातळी ओळखावीडोमकळ्या दिसताच त्यांचा कुचकरा करावाट्रायकोकार्डचा जादा वापर करावालाईट ट्रॅपचा वापर करावा, यामुळे गुलाबी बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.बोंडअळीचे व्यवस्थापन गरजेचे