शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणात केवळ चार टक्के जलसाठा

By admin | Updated: April 27, 2016 02:41 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात सध्या केवळ चार टक्के जलसाठा असून भविष्यात पुसद शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे.

नियोजनाचा अभाव : धरणातून होतोय अवैध पाणी उपसा पुसद : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पूस धरणात सध्या केवळ चार टक्के जलसाठा असून भविष्यात पुसद शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. अशी परिस्थिती असतानाही पूस धरणाच्या पात्रातून अवैध पाण्याचा उपसा सुरू आहे. पुसद शहराला सध्या दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. तोही अपुरा होत आहे. यामुळे शहरात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. शहरातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर दुसरीकडे इसापूर धरणात असलेल्या साठ्यावर परिसरातील शेतकरी सिंचन करीत आहे. आधीच दुष्काळी स्थिती त्यात पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणा भोवत आहे. गव्हासाठी निर्धारित केलेले पाणी वाटप वेळापत्रका व्यतिरिक्त आवश्यक नसताना सोडून देण्यात आले. त्यामुळे पूस धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. सहा टक्के जलसाठा असताना नगर परिषद प्रशासनाने एक दिवसाआड शहराचा पाणी पुरवठा केला होता. त्यानंतर पाच टक्के जलसाठा असताना दोन दिवस पाणी पुरवठा केला जात आहे. मंगळवार २६ एप्रिल रोजी पूस धरणात चार टक्के जलसाठा आहे. तेव्हा पुसद शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागण्याची वेळ नगर परिषदेवर येण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातच ही स्थिती आहे. तापमान ४४ अंशाच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे मे महिन्यात नागरिकांना पाणी मिळेल की नाही, अशी शंका व्यक्त केली जाता आहे.पुसदपासून १८ किलोमीटरवर अंतरावर पूस धरण आहे. या धरणात अत्यल्प पावसाने अपुरा जलसाठा झाला. नदी-नाले, विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने संपूर्ण शहराची भिस्त याच धरणावर आहे. अशा परिस्थितीत पूस धरणातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. परंतु पाटबंधारे विभागाने कोणतेच नियोजन केले नाही. पूस धरण ते पुसद शहर पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे पुसदवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुसदला उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न समूळ निकाली काढू असे आश्वासन अनेकदा देण्यात आले. परंतु आजपर्यंत या प्रश्नाचे निराकरण झाले नाही. पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असते तर पुसद येथे मुबलक पाणी उपलब्ध झाले असते. पूस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाण्याचा अवैध उपसा चालविला आहे. त्यासाठी वीजही चोरीची वापरली जात आहे. या प्रकारामुळे धरणाच्या जलसाठ्यात घट येत आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे अभियंता याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाही तर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल. (तालुका प्रतिनिधी)