शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
6
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
7
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
8
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
9
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
10
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
11
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
12
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
13
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
14
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
15
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
16
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
17
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
18
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
19
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
20
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न

आठ तास विजेचा केवळ गवगवा

By admin | Updated: August 31, 2015 02:22 IST

उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे.

नेर : उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र पाच-पाच मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होतो. एकंदर तीन तासांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात नाही. अशा गंभीर अवस्थेत रात्री जागरण करून ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना वीज कंपनीला दिसत नाही का, असा संतप्त सवाल उदापूरवासीयांनी पत्रकार परिषदेत केला.नेर तालुक्यातील उदापूर क्षेत्रात १५ गावांचा समावेश होतो. उदापूर येथे गेल्या दहा दिवसांपासून पाच-पाच मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. विद्युत कंपनीने शेतकऱ्यांच्या तीन फेजसाठी आठ तास पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यात एकाच आठवड्यात १५ ते १६ तास वीज पुरवठा वीज कंपनीने दिला. येथील नागरिकांनी या बाबत वीज कंपनीकडे तक्रारीही केल्या. मात्र शेतकऱ्यांच्या परिस्थितीची कुणीही दखल घेतली नाही. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना ओलित करावे लागत आहे. त्यातही सुरळीत नसलेला वीज पुरवठा शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहे. शेतकऱ्याला वारंवार विद्युत पंप चालू आणि बंद करावा लागत आहे. अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या वीज कंपनीला शेतकऱ्यांच्या यातना कधीच दिसत नाही. शेतकऱ्यांचे रोहित्र जरी जळाले तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच उकळले जात आहे. कोणताही वायरमन मुख्यालयी हजर राहात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या केबलला झाडाच्या फांद्या जरी लागल्या तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. खासगी वायरमनकडून कामे करून घेतल्या जात आहे. एवढे सगळे असतानाही तकलादू वीज पुरवठा करून शेतकऱ्यांवर बिले लादली जात आहे. संपूर्ण नेर तालुक्यात शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. सध्या पावसाने दडी मारलेली आहे. या अवस्थेत बळीराजा शेतात रात्री-बेरात्री ओलित करण्यासाठी जात आहे. मात्र अकार्यक्षम वीज कंपनी आठ तास वीज पुरवठा देण्यासाठीही तयार नाहीत. या बाबत सुरळीत पुरवठा द्या, तसेच उच्च दाबाचा पुरवठा द्यावा या संदर्भात शनिवारी रात्री ७ वाजता उदापूर येथील नागरिक गेले होते. मात्र वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय पाटणे यांनी शेतकऱ्यांना वाईट शब्दात उत्तर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होवून मारहाण झाली. वीज पुरवठ्यातील अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास टाळण्यासाठी वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने अजय भोयर यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)