शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

आठ तास विजेचा केवळ गवगवा

By admin | Updated: August 31, 2015 02:22 IST

उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे.

नेर : उदापूर येथे शनिवारी सायंकाळी वीज अभियंत्याला शेतकऱ्यांनी मारहाण केली. मात्र शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा करण्याचा वीज कंपनीकडून केवळ गवगवाच केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र पाच-पाच मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होतो. एकंदर तीन तासांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात नाही. अशा गंभीर अवस्थेत रात्री जागरण करून ओलित करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना वीज कंपनीला दिसत नाही का, असा संतप्त सवाल उदापूरवासीयांनी पत्रकार परिषदेत केला.नेर तालुक्यातील उदापूर क्षेत्रात १५ गावांचा समावेश होतो. उदापूर येथे गेल्या दहा दिवसांपासून पाच-पाच मिनिटांनी विद्युत पुरवठा खंडित होत आहे. विद्युत कंपनीने शेतकऱ्यांच्या तीन फेजसाठी आठ तास पुरवठा करण्याचे धोरण अवलंबले आहे. यात एकाच आठवड्यात १५ ते १६ तास वीज पुरवठा वीज कंपनीने दिला. येथील नागरिकांनी या बाबत वीज कंपनीकडे तक्रारीही केल्या. मात्र शेतकऱ्यांच्या परिस्थितीची कुणीही दखल घेतली नाही. रात्रीच्या अंधारात शेतकऱ्यांना ओलित करावे लागत आहे. त्यातही सुरळीत नसलेला वीज पुरवठा शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत आहे. शेतकऱ्याला वारंवार विद्युत पंप चालू आणि बंद करावा लागत आहे. अव्वाच्या सव्वा बिले देणाऱ्या वीज कंपनीला शेतकऱ्यांच्या यातना कधीच दिसत नाही. शेतकऱ्यांचे रोहित्र जरी जळाले तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच उकळले जात आहे. कोणताही वायरमन मुख्यालयी हजर राहात नाही. शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या केबलला झाडाच्या फांद्या जरी लागल्या तरी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडूनच वसूल केले जातात. खासगी वायरमनकडून कामे करून घेतल्या जात आहे. एवढे सगळे असतानाही तकलादू वीज पुरवठा करून शेतकऱ्यांवर बिले लादली जात आहे. संपूर्ण नेर तालुक्यात शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. सध्या पावसाने दडी मारलेली आहे. या अवस्थेत बळीराजा शेतात रात्री-बेरात्री ओलित करण्यासाठी जात आहे. मात्र अकार्यक्षम वीज कंपनी आठ तास वीज पुरवठा देण्यासाठीही तयार नाहीत. या बाबत सुरळीत पुरवठा द्या, तसेच उच्च दाबाचा पुरवठा द्यावा या संदर्भात शनिवारी रात्री ७ वाजता उदापूर येथील नागरिक गेले होते. मात्र वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संजय पाटणे यांनी शेतकऱ्यांना वाईट शब्दात उत्तर दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होवून मारहाण झाली. वीज पुरवठ्यातील अनियमितपणामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रास टाळण्यासाठी वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने अजय भोयर यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)