शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:45 IST

जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गतवर्षी होता ६० टक्के : १५ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी, धरणे तहानलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी यावेळीपर्यंत ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत १५ हजार हेक्टरमधील पेरण्या उलटल्या असून सर्वच प्रकारची धरणेही कोरडी आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाली. दमदार पाऊस नसल्याने १२ लघुु प्रकल्प आणि २५० सिंचन तलावही कोरडे असून इतर जलाशयात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे पुनरागमन झाल्याने हवामान खात्याने १८, १९ आणि २० जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: खोटा ठरला. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुुलैच्या मध्यापर्यंत तब्बल ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी हा पाऊस केवळ ३२ टक्केच्या घरात आहे. गतवर्षीच्या तुुलनेत निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद होती. यावर्षी केवळ २५३ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी तब्बल २२६ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड आहे. त्याचा परिणाम पिकांवर झाला. अपुऱ्या पावसाने मूग, उडीद, ज्वारी आणि तुरीचे क्षेत्र घटले, तर कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. आजपर्यंत चार लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र अपुऱ्या पावसाने तब्बल १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. येथे वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस बरसला. सर्वाधिक ६९ टक्के पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली आहे. जलाशयात १६ टक्केच पाणी जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहे. यात उमर्डा, सिंगणडोह, लोहतवाडी, नेर, रूई, खरद, घाटाना, दुधाना, पहूर (ई.) बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी प्रकल्पांचा समावेश आहे. इतर ६२ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या पूस प्रकल्पात १६, तर गोकीत १०.१८, वाघाडी १६.९१, सायखेडा ३५.३६, लोअरपूस ४६.०७ आणि बोरगाव प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.