शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:45 IST

जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गतवर्षी होता ६० टक्के : १५ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी, धरणे तहानलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी यावेळीपर्यंत ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत १५ हजार हेक्टरमधील पेरण्या उलटल्या असून सर्वच प्रकारची धरणेही कोरडी आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाली. दमदार पाऊस नसल्याने १२ लघुु प्रकल्प आणि २५० सिंचन तलावही कोरडे असून इतर जलाशयात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे पुनरागमन झाल्याने हवामान खात्याने १८, १९ आणि २० जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: खोटा ठरला. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुुलैच्या मध्यापर्यंत तब्बल ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी हा पाऊस केवळ ३२ टक्केच्या घरात आहे. गतवर्षीच्या तुुलनेत निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद होती. यावर्षी केवळ २५३ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी तब्बल २२६ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड आहे. त्याचा परिणाम पिकांवर झाला. अपुऱ्या पावसाने मूग, उडीद, ज्वारी आणि तुरीचे क्षेत्र घटले, तर कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. आजपर्यंत चार लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र अपुऱ्या पावसाने तब्बल १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. येथे वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस बरसला. सर्वाधिक ६९ टक्के पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली आहे. जलाशयात १६ टक्केच पाणी जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहे. यात उमर्डा, सिंगणडोह, लोहतवाडी, नेर, रूई, खरद, घाटाना, दुधाना, पहूर (ई.) बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी प्रकल्पांचा समावेश आहे. इतर ६२ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या पूस प्रकल्पात १६, तर गोकीत १०.१८, वाघाडी १६.९१, सायखेडा ३५.३६, लोअरपूस ४६.०७ आणि बोरगाव प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.