शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:45 IST

जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गतवर्षी होता ६० टक्के : १५ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी, धरणे तहानलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी यावेळीपर्यंत ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत १५ हजार हेक्टरमधील पेरण्या उलटल्या असून सर्वच प्रकारची धरणेही कोरडी आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाली. दमदार पाऊस नसल्याने १२ लघुु प्रकल्प आणि २५० सिंचन तलावही कोरडे असून इतर जलाशयात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे पुनरागमन झाल्याने हवामान खात्याने १८, १९ आणि २० जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: खोटा ठरला. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुुलैच्या मध्यापर्यंत तब्बल ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी हा पाऊस केवळ ३२ टक्केच्या घरात आहे. गतवर्षीच्या तुुलनेत निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद होती. यावर्षी केवळ २५३ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी तब्बल २२६ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड आहे. त्याचा परिणाम पिकांवर झाला. अपुऱ्या पावसाने मूग, उडीद, ज्वारी आणि तुरीचे क्षेत्र घटले, तर कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. आजपर्यंत चार लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र अपुऱ्या पावसाने तब्बल १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. येथे वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस बरसला. सर्वाधिक ६९ टक्के पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली आहे. जलाशयात १६ टक्केच पाणी जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहे. यात उमर्डा, सिंगणडोह, लोहतवाडी, नेर, रूई, खरद, घाटाना, दुधाना, पहूर (ई.) बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी प्रकल्पांचा समावेश आहे. इतर ६२ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या पूस प्रकल्पात १६, तर गोकीत १०.१८, वाघाडी १६.९१, सायखेडा ३५.३६, लोअरपूस ४६.०७ आणि बोरगाव प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.