शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्ह्यात केवळ ३२ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:45 IST

जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

गतवर्षी होता ६० टक्के : १५ हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणी, धरणे तहानलेलीच लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जुलैचा तिसरा आठवडा संपायला आला तरी जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी यावेळीपर्यंत ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत २८ टक्के पाऊस कमी झाला आहे. दरम्यान पावसाच्या प्रतीक्षेत १५ हजार हेक्टरमधील पेरण्या उलटल्या असून सर्वच प्रकारची धरणेही कोरडी आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी झाली. दमदार पाऊस नसल्याने १२ लघुु प्रकल्प आणि २५० सिंचन तलावही कोरडे असून इतर जलाशयात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मान्सूनचे पुनरागमन झाल्याने हवामान खात्याने १८, १९ आणि २० जुलैला जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा इशारा यवतमाळ जिल्ह्यात पूर्णत: खोटा ठरला. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ३२ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी जुुलैच्या मध्यापर्यंत तब्बल ६० टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी हा पाऊस केवळ ३२ टक्केच्या घरात आहे. गतवर्षीच्या तुुलनेत निम्माच पाऊस झाला. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ४७९ मिमी पावसाची नोंद होती. यावर्षी केवळ २५३ मिमी पाऊस झाला आहे. यावर्षी तब्बल २२६ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात पावसामध्ये मोठा खंड आहे. त्याचा परिणाम पिकांवर झाला. अपुऱ्या पावसाने मूग, उडीद, ज्वारी आणि तुरीचे क्षेत्र घटले, तर कापसाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. आजपर्यंत चार लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली. मात्र अपुऱ्या पावसाने तब्बल १५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. यात त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. यवतमाळ तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. येथे वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस बरसला. सर्वाधिक ६९ टक्के पावसाची नोंद पुसद तालुक्यात करण्यात आली आहे. जलाशयात १६ टक्केच पाणी जिल्ह्यातील १२ लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहे. यात उमर्डा, सिंगणडोह, लोहतवाडी, नेर, रूई, खरद, घाटाना, दुधाना, पहूर (ई.) बोर्डा, मुडाणा आणि पोफाळी प्रकल्पांचा समावेश आहे. इतर ६२ लघु प्रकल्पात केवळ १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मोठ्या पूस प्रकल्पात १६, तर गोकीत १०.१८, वाघाडी १६.९१, सायखेडा ३५.३६, लोअरपूस ४६.०७ आणि बोरगाव प्रकल्पात १.३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.