शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

राज्यात केवळ २४ टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:06 IST

राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या वादळाने गणित बिघडविलेकृत्रिम पावसासाठी आता ढगांचा शोध

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरातच्या वादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित बिघडवले. मुंबई, पुणे, नाशिक भागावरच कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे इतर भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. याकरिता लागणारे ढग यंत्रणा सज्ज असलेल्या भागात दिसत नाही. यामुळे तूर्त कृत्रिम पावसाचा प्रयोगही थांबला आहे.संपूर्ण राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. यावर्षीच्या खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत राज्यात ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. या ठिकाणी लागवड क्षेत्राच्या ६९ टक्के भागात पेरणी आटोपली आहे.इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा ३१ टक्के, वाशिम सात टक्के, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा दोन टक्के, चंद्रपूर २५, गडचिरोली चार टक्के, गोंदिया एक टक्का, लातूर नऊ टक्के, उसमानाबाद १२ टक्के, नांदेड २५ टक्के, परभणी ३१ टक्के, हिंगोली ११ टक्के इतकी पेरणीची नोंद झाली आहे.काही भागात जोरदार पाऊस सतत कोसळला. यामुळे या क्षेत्रातही पेरण्या करता आल्या नाही. यातून संपूर्ण लागवडक्षेत्र धोक्यात आले. राज्यात ज्या क्षेत्रात पेरणी झाली, त्यातील निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तृणधान्य चार लाख ५४ हजार ९४ हेक्टर, कडधान्य तीन लाख ८१ हजार ४८० हेक्टर, तेलबिया आठ लाख सात हजार ११६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सात हजार ९०८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे.कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोधराज्यातील ७१ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. त्याकरिता ३० कोटींची तरतूद करण्यात आली. यंत्रणाही सज्ज आहे. मात्र मराठवाड्यातील या भागावरून पावसासाठी पोषक ढगच जात नाही. यामुळे कृत्रिम पवसाचा प्रयोग थांबला आहे. या प्रयोगासाठी औरंगाबादमध्ये सिबँड टॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यापूर्वी २००३ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यात करण्यात आला होता.विभागनिहाय पेरणी क्षेत्रसर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभागातही अशीच स्थिती आहे. २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभाग चार टक्के, कोल्हापूर विभाग २४, औरंगाबाद विभाग ३३, लातूर विभाग १९, अमरावती विभाग ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.राज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारे ढग या ठिकाणावरून जात नाही. पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा यंत्रणेला शोध आहे. ही परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे.- डॉ.अनिल बोंडेकृषिमंत्री

टॅग्स :agricultureशेती