शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात केवळ २४ टक्के खरिपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 13:06 IST

राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या वादळाने गणित बिघडविलेकृत्रिम पावसासाठी आता ढगांचा शोध

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरातच्या वादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित बिघडवले. मुंबई, पुणे, नाशिक भागावरच कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे इतर भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. याकरिता लागणारे ढग यंत्रणा सज्ज असलेल्या भागात दिसत नाही. यामुळे तूर्त कृत्रिम पावसाचा प्रयोगही थांबला आहे.संपूर्ण राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. यावर्षीच्या खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत राज्यात ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. या ठिकाणी लागवड क्षेत्राच्या ६९ टक्के भागात पेरणी आटोपली आहे.इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा ३१ टक्के, वाशिम सात टक्के, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा दोन टक्के, चंद्रपूर २५, गडचिरोली चार टक्के, गोंदिया एक टक्का, लातूर नऊ टक्के, उसमानाबाद १२ टक्के, नांदेड २५ टक्के, परभणी ३१ टक्के, हिंगोली ११ टक्के इतकी पेरणीची नोंद झाली आहे.काही भागात जोरदार पाऊस सतत कोसळला. यामुळे या क्षेत्रातही पेरण्या करता आल्या नाही. यातून संपूर्ण लागवडक्षेत्र धोक्यात आले. राज्यात ज्या क्षेत्रात पेरणी झाली, त्यातील निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तृणधान्य चार लाख ५४ हजार ९४ हेक्टर, कडधान्य तीन लाख ८१ हजार ४८० हेक्टर, तेलबिया आठ लाख सात हजार ११६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सात हजार ९०८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे.कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोधराज्यातील ७१ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. त्याकरिता ३० कोटींची तरतूद करण्यात आली. यंत्रणाही सज्ज आहे. मात्र मराठवाड्यातील या भागावरून पावसासाठी पोषक ढगच जात नाही. यामुळे कृत्रिम पवसाचा प्रयोग थांबला आहे. या प्रयोगासाठी औरंगाबादमध्ये सिबँड टॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यापूर्वी २००३ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यात करण्यात आला होता.विभागनिहाय पेरणी क्षेत्रसर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभागातही अशीच स्थिती आहे. २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभाग चार टक्के, कोल्हापूर विभाग २४, औरंगाबाद विभाग ३३, लातूर विभाग १९, अमरावती विभाग ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.राज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारे ढग या ठिकाणावरून जात नाही. पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा यंत्रणेला शोध आहे. ही परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे.- डॉ.अनिल बोंडेकृषिमंत्री

टॅग्स :agricultureशेती