शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीमधील ऑनलाईन भरतीप्रक्रिया ऑफलाईनपेक्षाही धिमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:22 IST

शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे.

ठळक मुद्देजाहिराती पहा आणि थंड बसा भावी शिक्षकांची थट्टा 

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षक भरतीमधील आर्थिक देवाणघेवाण थांबवून पारदर्शक आणि त्वरेने भरतीप्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन पद्धती अवलंबण्यात आली. मात्र ऑनलाईन प्रक्रिया तब्बल दीड वर्षांपासून रेंगाळलेली आहे. पवित्र पोर्टलवर केवळ रिक्त पदांच्या जाहिराती पहा आणि थंड बसा अशा अवस्थेत शासनाने बेरोजगारांना अधांतरी सोडले आहे.तब्बल आठ वर्षांपासून राज्यात शिक्षक भरतीच झाली नाही. त्यामुळे लाखो डीएड, बीएडधारक बेरोजगार आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसच्या काळात शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण होते, असे सांगत युती शासनाने ऑनलाईन शिक्षक भरतीचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१७ मध्ये त्यासाठी अभियोग्यता चाचणी घेतली. दोन लाख बेरोजगारांनी या चाचणीमध्ये स्वत:ची पात्रता सिद्ध केली. मात्र आता दीड वर्ष लोटल्यावरही युती शासनाला भरतीप्रक्रिया पूर्णत्वास नेता आलेली नाही.शिक्षण संस्था चालक कोर्टात गेल्यामुळे प्रक्रियेला विलंब झाल्याचे तुणतुणे अनेक दिवस शिक्षण मंत्र्यांनी वाजविले. मात्र कोर्टाचा निकाल लागून दोन महिने लोटले तरीही शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल पुढे सरकायला तयार नाही. शासनाने मोठा गाजावाजा करुन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दहा हजार जागा भरण्याची घोषणा केली. आता पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिरातीही प्रदर्शित केल्या. मात्र दोन महिन्यांपासून बेरोजगार तरुण केवळ या जाहिराती बघणे आणि डाऊनलोड करणे एवढेच काम करीत आहे. प्रत्यक्षात रिक्त पदांचा प्राधान्यक्रम भरणे, नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करणे या प्रक्रिया शासनाने अद्यापही सुरू केलेल्या नाही. आता तर औरंगाबाद खंडपीठात याचिका प्रलंबित असल्याचा बहाणा पुढे करून प्रक्रिया आणखी लांबविण्याचे संकेत शासनाने दिले आहे.रिक्त पदांची सरकारलाच माहिती नाहीशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या दहा हजार रिक्त जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात पोर्टलवर आज रोजी सुमारे १२ हजार रिक्त जागा अपलोड झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षण संस्थांमध्ये किती जागा रिक्त आहेत, याची मंत्र्यांनाच माहिती नसल्याचे स्पष्ट होते. प्रारंभी शिक्षण संस्थांमध्येही अभियोग्यता चाचणीतील गुणानुसारच शिक्षक भरती जाहीर करण्यात आली. नंतर संस्था चालकांनी कोर्टातून हा निर्णय बदलून घेतला. तर आता शासनाने मनधरणी करून १३ शिक्षण संस्थांना अभियोग्यता गुणानुसारच भरती करण्यास राजी केले आहे. मग काही संस्थांना एक नियम आणि बहुतांश संस्थांना वेगळा नियम का? असा प्रश्न बेरोजगारांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र