शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एकमार्गी रस्ता सोडला मोकाट

By admin | Updated: December 4, 2015 02:39 IST

वणी उपविभागासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा आहे. शहरात केवळ दोन रस्ते एकमार्गी ठरवून देण्यात आले.

वाहतुकीची कोंडी : वादावादीच्या घटनांना मिळतो वाववणी : वणी उपविभागासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा आहे. शहरात केवळ दोन रस्ते एकमार्गी ठरवून देण्यात आले. मात्र या दोन रस्त्यावरील एकेरी वाहतूक कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे सवड नाही. हे दोन्ही रस्ते बराच वेळ पोलिसांविना मोकाटच असतात. पोलीस मात्र शहराबाहेर एखाद्या रस्त्यावर आडवे होऊन केवळ वसुलीच्या कामात गुंतलेले आढळून येतात. त्यामुळे स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन होऊनही वणीकरांचा लाभ काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यात वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. चार चाकी, दुचाकी वाहनांपासून अवजड वाहनांची रस्त्यावरून नेहमी मुंग्या-माकोड्याप्रमाणे रांग दिसते. मात्र रस्त्यांची रूंदी ५० वर्षांपूर्वीच्या वाहतूक व्यवस्थेवरून ठरविण्यात आल्याने, आता हे रस्ते सध्याच्या वाहतुकीस तोकडे पडत आहे. त्यामुळे किमान शहरातील वाहतूक व्यवस्था तरी सुधारली जावी, या हेतूने शहरात प्रवेश करणारे दोन मार्ग एकमार्गी केले जावे, अशी वणीकरांची मागणी होती.या मागणीचा विचार करून येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी एक अध्यादेश काढून टिळक चौक-सर्वोदय चौक-गाडगेबाबा चौक हा मार्ग येण्यासाठी व टिळक चौक-खाती चौक-गांधी चौक-गाडगेबाबा चौक हा मार्ग जाण्यासाठी ठरवून दिला. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपरिषद व पोलिसांवर सोपविण्यात आली. नगरपरिषदेने या दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याच्या हद्दीवर पिवळे पट्टे मारून दिले. मार्गाच्या आरंभस्थळी सूचना फलक लावून दिले. रस्त्यावरील पार्किंगची सोय नगरपरिषद खुले रंगमंच व जुन्या दवाखान्यात करून दिली. ज्यावेळी हा अध्यादेश निघाला, त्यावेळी येथे वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा नव्हती. दोन वर्षांपूर्वी सुयोगाने तिचीही स्थापना झाली. वाहतूक शाखेला एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस उपनिरीक्षक व पुरेसे मनुष्यबळ व स्वतंत्र वाहन मिळाले. चौकात लावण्यासाठी पोलीस चौक्या मिळाल्या. तरीही वाहतूक पोलिसांकडून एकेरी वाहतुकीची काटेकोर अंमलबजावणी केली जात नाही. कधी-कधी वाहतूक पोलीस या रस्त्यावर दिसतात. तेसुद्धा चौकीत न थांबता रस्त्याच्या कडेला कोठेतरी दडी मारून बसतात व उलट्या मार्गाने वाहन येताच त्याला अडवून दंड वसूल केला जातो. पोलिसांचे वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वसुलीकडेच जादा लक्ष असल्याचे दिसून येते. सकाळी ९ ते १० वाजतापर्यंत व सायंकाळी ६ वाजतानंतर या मार्गावरून पोलीस दिसेनासे होतात. कित्येक दिवस तर दिवसभरही एकेरी रस्ते मोकाटच दिसतात. त्यामुळे या मार्गावर जाणारी व येणारी वाहने धावत असल्याने वाहनांची गर्दी होऊन कोंडी होते. परिणामी वाहनधारकांमध्ये वादावादी होऊन शाब्दीक चकमकीही घडतात. अनेकांचा वेळ वाया गेल्याने त्यांना नियोजित ठिकाणी जाण्यास उशीरही होतो. अर्धा रस्ता पार्किंगने व्यापलेला असतो. याकडेही पोलिसांचे लक्ष जात नाही. गांधी चौकात रस्त्याच्या मधोमध हातगाड्यांची रांग लागलेली दिसते. सणासुदीच्या काळात हे चित्र बघायला मिळते. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे व अरूंद रस्त्यामुळे वारंवार रस्ते जाम होण्याचे प्रकार घडतात. मात्र याकडे लक्ष द्यायला वाहतूक शाखेकडे सवड नाही, असेच दिसून येते. त्यामुळे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यादेशाची अवहेलना होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलिसांनी सकाळी ७ ते सायंकाळी ९ वाजतापर्यंत तरी किमान एकेरी वाहतुकीची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)