शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

बळीराजा चेतना अभियानात प्रत्येकी एक लाखांची तरतूद

By admin | Updated: December 2, 2015 02:42 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविल्या जात आहे.

दारव्हा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याकरिता बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींना थेट एक लाख रुपयांचा निधी दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आला आहे. या अभियानाव्दारे प्रथम ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात सरपंच या समितीचे अध्यक्ष राहणार आहे. समितीत गावातील चार प्रतिष्ठीत व्यक्ती, तीन महिला, गावात असल्यास माजी सैनिक, वकील, डॉक्टर, दोन शेतकरी, महिला बचत गटांची अध्यक्षा, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहे. ही समिती नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक संकट आदीने त्रस्त कुटुंबे ओळखून त्यांची यादी तयार करेल. ही यादी बनविण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची राहील. यात जिल्हा किंवा राज्य पातळीवरून हस्तक्षेपही होणार नाही. निवड केलेल्या त्रस्त कुटुंबाची कुवत नसल्यास गावातील लोकांच्या सहभागातून पेरणी करून घेणे, समुपदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करणे, सणासुदीच्या वेळी शासनमान्य शाहीर, लोककला मंच, कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करणे, तणावमुक्ती व व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आयोजित करणे आदी कार्यकक्षा ठरविण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी गावाच्या समितीस एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)असा करावा लागणार खर्चगावात मोफत वाचनालय सुरू करून त्यात प्रमुख वृत्तपत्रे, शेतीविषयक मासिके उपलब्ध करून देणे यासाठी पाच हजार रुपये. गावातील त्रस्त कुटुंबियांच्या सर्वेक्षणाकरिता व प्रशासनिक बाबीसाठी पाच हजार रुपये.सार्वजनिक उत्सव साजरे करण्याकरिता १० हजार रुपये.त्रस्त कुटुंबास पेरणी, बियाण्याकरिता ३० हजार रुपये. एखाद्या गरीब कुटुंबावरील अकस्मात खर्चासाठी ३० हजार रुपये.२-३ महिन्यांकरिता बिनव्याजी कर्ज देणे यासाठी २० हजार रुपये अशी खर्चाची कमाल वार्षिक मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.