शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

बळीराजा चेतना अभियानात प्रत्येकी एक लाखांची तरतूद

By admin | Updated: December 2, 2015 02:42 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविल्या जात आहे.

दारव्हा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम शासनामार्फत राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करण्याकरिता बळीराजा चेतना अभियानांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतींना थेट एक लाख रुपयांचा निधी दारव्हा तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात आला आहे. या अभियानाव्दारे प्रथम ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात सरपंच या समितीचे अध्यक्ष राहणार आहे. समितीत गावातील चार प्रतिष्ठीत व्यक्ती, तीन महिला, गावात असल्यास माजी सैनिक, वकील, डॉक्टर, दोन शेतकरी, महिला बचत गटांची अध्यक्षा, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहे. ही समिती नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक संकट आदीने त्रस्त कुटुंबे ओळखून त्यांची यादी तयार करेल. ही यादी बनविण्याची पूर्ण जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची राहील. यात जिल्हा किंवा राज्य पातळीवरून हस्तक्षेपही होणार नाही. निवड केलेल्या त्रस्त कुटुंबाची कुवत नसल्यास गावातील लोकांच्या सहभागातून पेरणी करून घेणे, समुपदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त करणे, सणासुदीच्या वेळी शासनमान्य शाहीर, लोककला मंच, कलापथकाच्या माध्यमातून प्रबोधन करणे, तणावमुक्ती व व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आयोजित करणे आदी कार्यकक्षा ठरविण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी गावाच्या समितीस एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)असा करावा लागणार खर्चगावात मोफत वाचनालय सुरू करून त्यात प्रमुख वृत्तपत्रे, शेतीविषयक मासिके उपलब्ध करून देणे यासाठी पाच हजार रुपये. गावातील त्रस्त कुटुंबियांच्या सर्वेक्षणाकरिता व प्रशासनिक बाबीसाठी पाच हजार रुपये.सार्वजनिक उत्सव साजरे करण्याकरिता १० हजार रुपये.त्रस्त कुटुंबास पेरणी, बियाण्याकरिता ३० हजार रुपये. एखाद्या गरीब कुटुंबावरील अकस्मात खर्चासाठी ३० हजार रुपये.२-३ महिन्यांकरिता बिनव्याजी कर्ज देणे यासाठी २० हजार रुपये अशी खर्चाची कमाल वार्षिक मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.