शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

लोकसहभागातून एक कोटी

By admin | Updated: August 15, 2016 01:19 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक

बळीराजा चेतना अभियान : नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या शेतकऱ्यांना मदत रूपेश उत्तरवार यवतमाळ आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक कोटी रूपयांची मदत बळीराजा चेतना अभियानात गोळा झाली आहे. जिल्हा प्रशासनाने हा निधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वळता केला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत न मोडणाऱ्या बाबीसाठीही शेतकरी कुटुंबाला मदत मिळणार आहे. यासोबतच कॅन्सरसारख्या दुर्धर आजार आणि शिक्षणासाठी ही मदत दिली जात आहे. आर्थिक विवंचनेने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात शासनच नव्हेतर लोकसहभागातूनही निधी मिळत आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाने तितक्याच पारदर्शकतेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे. कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यांना या अभियानातून १० हजार रूपयांचा निधी दिला जात आहे. आतापर्यंत ३६ शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली. यासोबतच संकटावर मात करण्यासाठी ४२ नवीन प्रस्ताव पुढे आले आहेत. एमबीबीएस अथवा अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता आर्थिक अडसर निर्माण होताच प्रत्येक विद्यार्थ्याला ३० हजारा याप्रमाणे आठ कुटुंबांना ही मदत वितरित करण्यात आली. वीजतारांच्या स्पर्शाने अथवा विहिरीत पडून जनावराचा नैसर्गिक मृत्यू झाला, फुटवे खावून जनावरे मेली, तर अशा प्रकरणात शासनाकडून कुठलीही मदत शेतकरी कुटुंबाला मिळत नाही. यावर मात करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानातून प्रत्येकी १० हजाराप्रमाणे मदत देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लोकसहभागातून मिळालेल्या रकमेपैकी आतापर्यंत ६५ लाख रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेत प्री-परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना पाच हजार रूपयांची मदत दिली जात आहे. यातून विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करता येणार आहे. या योजनेसाठी शेकतऱ्यांची अनेक मुले पुढे आली आहेत. या माध्यमातून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, हा मुख्य उद्देश आहे.