जलयुक्त शिवार : कामांची गती वाढणार यवतमाळ : दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबविली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावनीसाठी सिध्दीविनायक ट्रस्टने यवतमाळ जिल्ह्यासाठी एक कोटींचा निधी शनिवारी दिला असून यामुळे या योजनेला गती मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावनीसाठी मुख्यमंत्र्यांनी सिध्दी विनायक ट्रस्टशी बोलणी केली होती. राज्यासाठी निधी मागितला होता. त्याला ट्रस्टने होकार दिला. यवतमाळ जिल्ह्यापासून निधी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यवतमाळचे कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांना मुंबईत एक कोटी रूपयांचा धनादेश बहाल करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, सचिव मंगेश शिंदे, रवी जाधव यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. यामुळे जिल्ह्यात ही मोहीम धडाक्याने राबविण्यास मोलाचा हातभार लाभणार आहे. (शहर वार्ताहर)जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. शासकीय स्तरावरुन ही योजना राबविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्याला चांगला प्रतिसाद आहे.
सिध्दीविनायक ट्रस्टने दिले एक कोटी
By admin | Updated: April 4, 2015 23:57 IST