शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

By admin | Updated: March 22, 2017 00:11 IST

शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे.

वणी नगरपालिका : नवरगाव धरणात ३२.३६ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे सावट आसिफ शेख  वणी शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे. तालुक्यात कोळसा खाणीची संख्या वाढल्याने पाण्याचे अनेक नैैसर्गिक झरे तुटले आहेत. २००४ पासून या नदीला जीवदान देण्याकरिता नवरगाव धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. या धरणातून पाणी घेण्यासाठी वणी नगरपालिकेने पाण्यासाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल एक कोटी रुपये खर्च केलेत. आता या धरणात केवळ ३२.३६ टक्के जलासाठा शिल्लक असून चार महिने नगरपरिषदेने योग्य नियोजन केले, तरच पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. वणी शहराची लोकसंख्या ६२ हजार असून हे शहर ‘ब’ गटात मोडते. शहराची पाणी पुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून निर्गुडा नदीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. २००५ पूर्वीसुद्धा भर उन्हाळ्यात या नदीने दगा दिला नव्हता. मात्र कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सुरू झाल्याने या नदीचा कृत्रिम पाणी पुरवठा बंद झाला. डिसेंंबर ते जानेवारी महिन्यापासून या नदीचा पाणी प्रवाह बंद पडतो. त्यामुळे शहराला पाणी टंचाई जाणवते. शहरात सहा लाख ७५ हजार लिटर व ११ लाख २५ हजार ३०० लीटर मर्यादा असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच २५ ट्युबवेल असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु निगुर्डा नदीचा प्रवाह मध्येच बंद पडल्याने धरणातून पाणी आरक्षित करून वणीकरांची तहान भागविली जात आहे. वणी नगरपरिषदेने २.०० दलघमी, मारेगाव ०.६० दलघमी व जीवन प्राधिकरण ग्रामीण विभागाने ०.५० दलघमी पाणी पुरवठा आरक्षित केला आहे. वणी नगरपरिषदेने मागील वर्षी ४.७० दलघमी जलसाठा आरक्षित केला होता. त्यासाठी १० लाख ८० हजार रूपये पाण्याचे जमा केले होते. नगरपरिषदेकडे थकबाकी नसल्यामुळे पाण्याची मागणी वाढल्यास यावर्षीसुद्धा पुन्हा जास्त पाणी आरक्षित करू शकतात. नगरपरिषदेने २००४ पासून नवरगाव धरणाला एक कोटी रूपये दिले आहे. मागीलवर्षी ५८ तासांत पाणी नवरगाव धरणातून वणीपर्यंत पोहोचत होते. परंतु यावर्षी वातावरणात ओलावा असल्याने ३० तासात पाणी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे समजते. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान जादा भडकल्यास प्रकल्पातील पाण्याचे ७५ टक्के एम.एम.म्हणजे तीन दशलक्ष घनमीटर एवढे बाष्पीभवन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. नवरगाव धरण बनले वणी शहराची गरज नवरगाव धरण हे मारेगावची तहान भागविण्याकरिता प्रकल्प उभारला आहे. परंतु तो वणी शहराची गरज बनला आहे. नगरपरिषदेने कायमस्वरूपी पाणी योजनेसंदर्भात काय धोरण आहे, हे अद्यापही स्पष्ट केले नाही. नवरगाव धरणाचे पाणी आरक्षीत करून आपले काम तात्पूरते चालविण्यात येत आहे. नवरगाव धरणातून पाणी सोडले, तर वणीपर्यंत पाणी येताना मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते. त्यासाठी २५ किलोमीटरची पाईपलाईन योजना टाकणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वणीकरांची अपेक्षा आहे.