शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

By admin | Updated: March 22, 2017 00:11 IST

शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे.

वणी नगरपालिका : नवरगाव धरणात ३२.३६ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे सावट आसिफ शेख  वणी शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे. तालुक्यात कोळसा खाणीची संख्या वाढल्याने पाण्याचे अनेक नैैसर्गिक झरे तुटले आहेत. २००४ पासून या नदीला जीवदान देण्याकरिता नवरगाव धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. या धरणातून पाणी घेण्यासाठी वणी नगरपालिकेने पाण्यासाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल एक कोटी रुपये खर्च केलेत. आता या धरणात केवळ ३२.३६ टक्के जलासाठा शिल्लक असून चार महिने नगरपरिषदेने योग्य नियोजन केले, तरच पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. वणी शहराची लोकसंख्या ६२ हजार असून हे शहर ‘ब’ गटात मोडते. शहराची पाणी पुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून निर्गुडा नदीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. २००५ पूर्वीसुद्धा भर उन्हाळ्यात या नदीने दगा दिला नव्हता. मात्र कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सुरू झाल्याने या नदीचा कृत्रिम पाणी पुरवठा बंद झाला. डिसेंंबर ते जानेवारी महिन्यापासून या नदीचा पाणी प्रवाह बंद पडतो. त्यामुळे शहराला पाणी टंचाई जाणवते. शहरात सहा लाख ७५ हजार लिटर व ११ लाख २५ हजार ३०० लीटर मर्यादा असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच २५ ट्युबवेल असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु निगुर्डा नदीचा प्रवाह मध्येच बंद पडल्याने धरणातून पाणी आरक्षित करून वणीकरांची तहान भागविली जात आहे. वणी नगरपरिषदेने २.०० दलघमी, मारेगाव ०.६० दलघमी व जीवन प्राधिकरण ग्रामीण विभागाने ०.५० दलघमी पाणी पुरवठा आरक्षित केला आहे. वणी नगरपरिषदेने मागील वर्षी ४.७० दलघमी जलसाठा आरक्षित केला होता. त्यासाठी १० लाख ८० हजार रूपये पाण्याचे जमा केले होते. नगरपरिषदेकडे थकबाकी नसल्यामुळे पाण्याची मागणी वाढल्यास यावर्षीसुद्धा पुन्हा जास्त पाणी आरक्षित करू शकतात. नगरपरिषदेने २००४ पासून नवरगाव धरणाला एक कोटी रूपये दिले आहे. मागीलवर्षी ५८ तासांत पाणी नवरगाव धरणातून वणीपर्यंत पोहोचत होते. परंतु यावर्षी वातावरणात ओलावा असल्याने ३० तासात पाणी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे समजते. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान जादा भडकल्यास प्रकल्पातील पाण्याचे ७५ टक्के एम.एम.म्हणजे तीन दशलक्ष घनमीटर एवढे बाष्पीभवन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. नवरगाव धरण बनले वणी शहराची गरज नवरगाव धरण हे मारेगावची तहान भागविण्याकरिता प्रकल्प उभारला आहे. परंतु तो वणी शहराची गरज बनला आहे. नगरपरिषदेने कायमस्वरूपी पाणी योजनेसंदर्भात काय धोरण आहे, हे अद्यापही स्पष्ट केले नाही. नवरगाव धरणाचे पाणी आरक्षीत करून आपले काम तात्पूरते चालविण्यात येत आहे. नवरगाव धरणातून पाणी सोडले, तर वणीपर्यंत पाणी येताना मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते. त्यासाठी २५ किलोमीटरची पाईपलाईन योजना टाकणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वणीकरांची अपेक्षा आहे.