शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

१३ वर्षांत पाण्यासाठी मोजले एक कोटी

By admin | Updated: March 22, 2017 00:11 IST

शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे.

वणी नगरपालिका : नवरगाव धरणात ३२.३६ टक्के जलसाठा, पाणी टंचाईचे सावट आसिफ शेख  वणी शहरापासून वाहणारी जीवनदायीनी निर्गुडा नदी ही संपूर्ण वणी शहराची तहान भागवत आहे. तालुक्यात कोळसा खाणीची संख्या वाढल्याने पाण्याचे अनेक नैैसर्गिक झरे तुटले आहेत. २००४ पासून या नदीला जीवदान देण्याकरिता नवरगाव धरणावर अवलंबून राहावे लागत आहे. या धरणातून पाणी घेण्यासाठी वणी नगरपालिकेने पाण्यासाठी गेल्या १३ वर्षांत तब्बल एक कोटी रुपये खर्च केलेत. आता या धरणात केवळ ३२.३६ टक्के जलासाठा शिल्लक असून चार महिने नगरपरिषदेने योग्य नियोजन केले, तरच पाणी टंचाईवर मात करता येणार आहे. वणी शहराची लोकसंख्या ६२ हजार असून हे शहर ‘ब’ गटात मोडते. शहराची पाणी पुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हापासून निर्गुडा नदीच्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. २००५ पूर्वीसुद्धा भर उन्हाळ्यात या नदीने दगा दिला नव्हता. मात्र कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण सुरू झाल्याने या नदीचा कृत्रिम पाणी पुरवठा बंद झाला. डिसेंंबर ते जानेवारी महिन्यापासून या नदीचा पाणी प्रवाह बंद पडतो. त्यामुळे शहराला पाणी टंचाई जाणवते. शहरात सहा लाख ७५ हजार लिटर व ११ लाख २५ हजार ३०० लीटर मर्यादा असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच २५ ट्युबवेल असून त्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु निगुर्डा नदीचा प्रवाह मध्येच बंद पडल्याने धरणातून पाणी आरक्षित करून वणीकरांची तहान भागविली जात आहे. वणी नगरपरिषदेने २.०० दलघमी, मारेगाव ०.६० दलघमी व जीवन प्राधिकरण ग्रामीण विभागाने ०.५० दलघमी पाणी पुरवठा आरक्षित केला आहे. वणी नगरपरिषदेने मागील वर्षी ४.७० दलघमी जलसाठा आरक्षित केला होता. त्यासाठी १० लाख ८० हजार रूपये पाण्याचे जमा केले होते. नगरपरिषदेकडे थकबाकी नसल्यामुळे पाण्याची मागणी वाढल्यास यावर्षीसुद्धा पुन्हा जास्त पाणी आरक्षित करू शकतात. नगरपरिषदेने २००४ पासून नवरगाव धरणाला एक कोटी रूपये दिले आहे. मागीलवर्षी ५८ तासांत पाणी नवरगाव धरणातून वणीपर्यंत पोहोचत होते. परंतु यावर्षी वातावरणात ओलावा असल्याने ३० तासात पाणी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे समजते. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान जादा भडकल्यास प्रकल्पातील पाण्याचे ७५ टक्के एम.एम.म्हणजे तीन दशलक्ष घनमीटर एवढे बाष्पीभवन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जलसाठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. नवरगाव धरण बनले वणी शहराची गरज नवरगाव धरण हे मारेगावची तहान भागविण्याकरिता प्रकल्प उभारला आहे. परंतु तो वणी शहराची गरज बनला आहे. नगरपरिषदेने कायमस्वरूपी पाणी योजनेसंदर्भात काय धोरण आहे, हे अद्यापही स्पष्ट केले नाही. नवरगाव धरणाचे पाणी आरक्षीत करून आपले काम तात्पूरते चालविण्यात येत आहे. नवरगाव धरणातून पाणी सोडले, तर वणीपर्यंत पाणी येताना मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होते. त्यासाठी २५ किलोमीटरची पाईपलाईन योजना टाकणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वणीकरांची अपेक्षा आहे.