शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. 

ठळक मुद्देसमग्र शिक्षा : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी समग्र शिक्षातून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मात्र मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला साडेचार कोटी रुपयांचा निधीही मिळाला असून शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दीड लाख विद्यार्थ्यांसाठी गणवेश घेण्याची धावपळ सुरू होणार आहे.जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ्यातच निधी मंजूर करून जून महिन्यापूर्वीच शाळांना दिला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे जून महिन्यात शाळा सुरू होऊ शकल्या नाही. शिवाय मार्चपासूनच लॉकडाऊन झाल्याने मंजूर झालेला निधीही प्राप्त होऊ शकला नाही. नंतरच्या काळात शासनाने दोन गणवेशाऐवजी एकच गणवेश देण्याचा निर्णय घेऊन प्रती विद्यार्थी ६०० ऐवजी ३०० रुपयांचा निधी आता मंजूर केला आहे. तर दुसरीकडे शाळेचेही अर्धे सत्र संपून गेले आहे. त्यामुळे किमान एक गणवेश तरी विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.यात एससी, एसटी व बीपीएल प्रवर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी पात्र आहेत. तसेच जिल्हा परिषद, नगरपरिषद, आणि शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. यात विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी पात्र ठरत नाही. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेने तसेच नगरपरिषदेने स्वत:चा निधी वापरावा, अशी मागणी दरवर्षी केली जात आहे. मात्र याबाबत अद्यापही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली दिसून येत नाही. 

गणेवश विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहचविणार सध्या प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी काही शिक्षक मात्र शाळेत जात आहेत. तर गणवेशाचा निधीही शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शिवून घेतलेला गणवेश शिक्षक विद्यार्थ्यांना घरपोच नेऊन देणार आहेत. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेला   मिळाले साडेचार कोटी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यवतमाळ जिल्ह्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेशासाठी चार कोटी ६४ लाख ३५ हजार २०० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा निधी जिल्हास्तरावर पोहोचलेला असून तो तालुका व गटस्तरावरून शाळांपर्यंत पोहोचविला जात आहे. आता यातून कोणता कापड खरेदी करावा, कोणत्या रंगाचा गणवेश असावा याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती घेणार असून समितीच गणवेश शिवून घेइल किंवा तयार गणवेश विकत घेऊन वाटप करणार आहे. मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यातच विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे घेऊन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता ऐनवेळी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची मापे घेण्याची वेळ शाळांवर आली आहे. 

शाळांमध्ये दररोज ५० टक्के शिक्षक उपस्थित राहत आहेत. ते विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश देतील. शिवाय नुकत्याच झालेल्या व्हीसीनुसार प्राथमिक शाळाही येत्या महिनाभरात सुरू होण्याचे संकेत आहेत. आमची व शिक्षकांची त्यादृष्टीने तयारी आहे. फक्त शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत.- प्रमोद सूर्यवंशी,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Schoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा