शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दीड लाख शेतकरी लाभापासून वंचित

By admin | Updated: July 8, 2014 23:40 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक

पीक विमा : ९७ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटीयवतमाळ : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभास मुकले आहेत. केवळ ९७ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटींची मदत दिली जाणार आहे.खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये दोन लाख ९७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. दोन लाख ५४ हजार ३३० हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. यासाठी शेतकरी आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे १९ कोटी ८९ लाख ९७ हजारांचा हप्ता भरला होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा होती. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांची निराशा केली. केवळ ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले. यात सर्वाधिक मदत उमरखेड तालुक्याला नऊ कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहे. तर वणी तालुक्याच्या वाट्याला सर्वात कमी मदत आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि तूर या पिकांचा विमा काढला होता. कंपनीने ६० टक्के जोखीमस्तर स्वीकारला होता. यामध्ये कापसाला केवळ तीन तालुक्यातील चार मंडळाला मदत मिळाली. तर १४ तालुक्यातील एक लाख शेतकरी अपात्र ठरले. जिल्ह्यातील १०१ मंडळात तुरीला एक छदामही मिळाला नाही. ७३ हजार ४३८ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लाख ९३ हजार १३८ रुपयांची मदत जाहीर झाली आहे. (शहर वार्ताहर)