शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

दीड लाख शेतकरी लाभापासून वंचित

By admin | Updated: July 8, 2014 23:40 IST

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक

पीक विमा : ९७ हजार शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटीयवतमाळ : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तशी नोंदही शासन दरबारी आहे. मात्र विमा कंपन्यांना हा अहवाल मान्य नाही. त्यामुळे दीड लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभास मुकले आहेत. केवळ ९७ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटींची मदत दिली जाणार आहे.खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये दोन लाख ९७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. दोन लाख ५४ हजार ३३० हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. यासाठी शेतकरी आणि राज्य शासनाने विमा कंपनीकडे १९ कोटी ८९ लाख ९७ हजारांचा हप्ता भरला होता. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा होती. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांची निराशा केली. केवळ ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले. यात सर्वाधिक मदत उमरखेड तालुक्याला नऊ कोटी ५२ लाख रुपये मिळणार आहे. तर वणी तालुक्याच्या वाट्याला सर्वात कमी मदत आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आणि तूर या पिकांचा विमा काढला होता. कंपनीने ६० टक्के जोखीमस्तर स्वीकारला होता. यामध्ये कापसाला केवळ तीन तालुक्यातील चार मंडळाला मदत मिळाली. तर १४ तालुक्यातील एक लाख शेतकरी अपात्र ठरले. जिल्ह्यातील १०१ मंडळात तुरीला एक छदामही मिळाला नाही. ७३ हजार ४३८ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २९ कोटी ६४ लाख ९३ हजार १३८ रुपयांची मदत जाहीर झाली आहे. (शहर वार्ताहर)