शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

दीड हजार शेतकऱ्यांना मिळाली सहा कोटी रुपयांची व्याजमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ओटीएस योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत ही व्याज सवलत आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खातेधारक अडचणीतून बाहेर पडतील. बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते. याशिवाय सहा वर्षापेक्षा जास्त काळापासून कर्ज थकलेले असेल तर या योजनेत मुद्दल आणि व्याज रकमेतून २५ टक्के रक्कम कपात करून उर्वरित सर्व रक्कम ठराविक काळात भरली तर शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. ओटीएस योजनेमध्ये एकाच वेळेस काही रक्कम माफ होते, उर्वरित रक्कम भरल्यानंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतो. यामुळे ओटीएस योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणारी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. तरच त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४३१ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांकडे २७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज होते. ते ओटीएस योजनेला पात्र ठरल्याने त्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामुळे हे शेतकरी उर्वरित कर्ज रक्कम भरुन नील झाले आहे. आता पुढील हंगामामध्ये असे शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार आहे. यातून पुढील खरिपाचा हंगाम करताना कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत बँक त्यांना सामावून घेणार आहे.  याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कर्ज खाते सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न आहे. 

 जुन्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करता करता सरकार बदलले आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जुन्या सरकारमधील कर्जमाफीवर आर्थिक तरतूद झालीच नाही. परिणामी कर्जमाफीला पात्र असलेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही थकीत आहे. त्यांना ना जुनी ना नवी अशी कुठलीच कर्जमाफी मिळाली नाही.

जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमधून लाभ मिळाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा अपघात विमाही बँकेने काढला आहे. पूर्वी ही विम्याची रक्कम एक लाख होती. यावर्षी विमा सुरक्षा कवच दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुढे ही रक्कम तीन लाखापर्यंत नेण्याचा मानस आहे. - टिकाराम कोंगरेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज