शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार शेतकऱ्यांना मिळाली सहा कोटी रुपयांची व्याजमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 05:00 IST

बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ओटीएस योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत दीड हजार शेतकऱ्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची व्याज सवलत मिळाली आहे. ३१ मार्चपर्यंत ही व्याज सवलत आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे खातेधारक अडचणीतून बाहेर पडतील. बँकेला वर्षभरात झालेल्या एकूण नफ्यापैकी काही ठराविक रक्कम ओटीएस योजनेसाठी राखीव ठेवली जाते. या रकमेतून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जातो. सहा वर्षाच्या आत कर्ज भरता न आलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. त्यासाठी शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमध्ये अर्ज दाखल करायचा असतो. यात सहा वर्षापर्यंत एकूण व्याजाच्या ५० टक्के व्याजमाफी दिली जाते. उर्वरित मुद्दल आणि ५० टक्के व्याज शेतकऱ्यांना भरायचे असते. याशिवाय सहा वर्षापेक्षा जास्त काळापासून कर्ज थकलेले असेल तर या योजनेत मुद्दल आणि व्याज रकमेतून २५ टक्के रक्कम कपात करून उर्वरित सर्व रक्कम ठराविक काळात भरली तर शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. ओटीएस योजनेमध्ये एकाच वेळेस काही रक्कम माफ होते, उर्वरित रक्कम भरल्यानंतर शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरतो. यामुळे ओटीएस योजना प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणारी आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. तरच त्याचा लाभ दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १४३१ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांकडे २७ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज होते. ते ओटीएस योजनेला पात्र ठरल्याने त्यांना सहा कोटी १५ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामुळे हे शेतकरी उर्वरित कर्ज रक्कम भरुन नील झाले आहे. आता पुढील हंगामामध्ये असे शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार आहे. यातून पुढील खरिपाचा हंगाम करताना कर्ज वितरणाच्या प्रक्रियेत बँक त्यांना सामावून घेणार आहे.  याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कर्ज खाते सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न आहे. 

 जुन्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. ही कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी दुरुस्त करता करता सरकार बदलले आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जुन्या सरकारमधील कर्जमाफीवर आर्थिक तरतूद झालीच नाही. परिणामी कर्जमाफीला पात्र असलेले जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही थकीत आहे. त्यांना ना जुनी ना नवी अशी कुठलीच कर्जमाफी मिळाली नाही.

जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ओटीएस योजनेमधून लाभ मिळाला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा अपघात विमाही बँकेने काढला आहे. पूर्वी ही विम्याची रक्कम एक लाख होती. यावर्षी विमा सुरक्षा कवच दोन लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  पुढे ही रक्कम तीन लाखापर्यंत नेण्याचा मानस आहे. - टिकाराम कोंगरेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज