शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

महिलांचे दीड लाख राेखपालाने लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  बॅंकेतील व्यवहार हा विश्वासावर चालताे. प्रत्येकच बॅंकेतील राेखपालाकडे पैसे देऊन त्याची पाेचपावती घेतली जाते. मात्र, याच विश्वासाला रुंझा येथील विदर्भ काेकण ग्रामीण बॅंकेच्या राेखपालाने तडा दिला. त्याने चार बचत गटांच्या महिलांकडून राेख रक्कम घेतली. त्यांना पाेचपावती दिली. मात्र, रक्कम खात्यात जमाच केली नाही. त्यामुळे बॅंक पैसे देण्यास तयार नाही. पेरणीचा हंगाम ताेंडावर असल्याने हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून या महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या केळापूर तालुक्यातील रुंझा शाखेत महालक्ष्मी बचत गटाच्या अनिता संतोष शिवरकर, सुरेखा गजानन मुल्लेमवार यांचे खाते आहे.  महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत. याविषयीचे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती निमीष मानकर उपस्थित हाेते.

आठ महिन्यांपासून चौकशीच सुरू - हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅंकेने राेखपालाची चाैकशी सुरू केली आहे. आता याला जवळपास आठ महिने पूर्ण हाेत आले आहेत. मात्र, बॅंकेने पैसे भरणाऱ्या महिलांना एकही रुपया परत केलेला नाही. बॅंकेच्या शाखेत जाऊन नियमाप्रमाणे पैसे भरल्यानंतर बॅंकेने आमचे पैसे वेळेत परत करावेत, अशी  मागणी या महिलांनी केली आहे. 

पैशाअभावी शेती पडिक ठेवण्याची वेळ - बचत गटाचा हा व्यवहार असून, हे पैसे शेतातील बी-बियाणे, खते खरेदीकरिता ठेवले हाेते. आता बॅंक पैसे देत नसल्याने शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापकांना याविषयी अर्ज दिला. मात्र, त्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नसल्याचेही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजी