शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महिलांचे दीड लाख राेखपालाने लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  बॅंकेतील व्यवहार हा विश्वासावर चालताे. प्रत्येकच बॅंकेतील राेखपालाकडे पैसे देऊन त्याची पाेचपावती घेतली जाते. मात्र, याच विश्वासाला रुंझा येथील विदर्भ काेकण ग्रामीण बॅंकेच्या राेखपालाने तडा दिला. त्याने चार बचत गटांच्या महिलांकडून राेख रक्कम घेतली. त्यांना पाेचपावती दिली. मात्र, रक्कम खात्यात जमाच केली नाही. त्यामुळे बॅंक पैसे देण्यास तयार नाही. पेरणीचा हंगाम ताेंडावर असल्याने हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून या महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या केळापूर तालुक्यातील रुंझा शाखेत महालक्ष्मी बचत गटाच्या अनिता संतोष शिवरकर, सुरेखा गजानन मुल्लेमवार यांचे खाते आहे.  महालक्ष्मी बचत गटाच्या खाते क्रमांकमध्ये ६ नाेव्हेंबर २०२१ रोजी ११ हजार ५०० रुपये आणि २ नाेव्हेंबरला  ४८  हजार रुपये जमा केले. त्याची त्यांनी राेखपालाकडून रितसर  पावती घेतली आहे.  त्याचप्रमाणे अनिता संतोष शिवरकर यांचे खाते क्रमांकमध्ये १५ नाेव्हेंबरला २९ हजार रुपये जमा केले.  सुरेखा गजानन मुल्लेमवार यांनीही ६  ऑगस्ट २०२१ ला बचत खात्यात ४९ हजार रुपये  जमा केले. त्यावेळी या महिलांना राेखपालाने पैसे जमा केल्याची पावती दिली.  मात्र, रोखपालाने महिलांच्या खात्यात पैसे भरलेच नाहीत. याविषयीचे निवेदन देताना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती निमीष मानकर उपस्थित हाेते.

आठ महिन्यांपासून चौकशीच सुरू - हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॅंकेने राेखपालाची चाैकशी सुरू केली आहे. आता याला जवळपास आठ महिने पूर्ण हाेत आले आहेत. मात्र, बॅंकेने पैसे भरणाऱ्या महिलांना एकही रुपया परत केलेला नाही. बॅंकेच्या शाखेत जाऊन नियमाप्रमाणे पैसे भरल्यानंतर बॅंकेने आमचे पैसे वेळेत परत करावेत, अशी  मागणी या महिलांनी केली आहे. 

पैशाअभावी शेती पडिक ठेवण्याची वेळ - बचत गटाचा हा व्यवहार असून, हे पैसे शेतातील बी-बियाणे, खते खरेदीकरिता ठेवले हाेते. आता बॅंक पैसे देत नसल्याने शेती पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँक व्यवस्थापकांना याविषयी अर्ज दिला. मात्र, त्या अर्जावर अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झालेली नसल्याचेही या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजी