शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

श्रमदान करूनच ते चढले बोहल्यावर

By admin | Updated: May 19, 2017 01:55 IST

पाणी फाऊंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या गावागावात जलसंधारणाचे काम करीत आहे.

जलसंधारणाचा ध्यास : आदिवासी नवदाम्पत्याने ठेवला समाजापुढे आदर्श ढाणकी : पाणी फाऊंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या गावागावात जलसंधारणाचे काम करीत आहे. जलसंधारणाच्या कामानिमित्त समाजात आश्चर्य वाटावे असे सकारात्मक बदल दिसून येत आहे. उभ्या महाराष्ट्राला पे्ररणादायी ठरावी अशी घटना उमरखेड तालुक्यातील एकंबा येथे घडली. आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्नाचा येथील आदिवासी नवदाम्पत्याने हा अविस्मरणीय सोहळा प्रथम श्रमदान करून साजरा केला आणि नंतरच आयुष्यभराच्या मनसंधारणासाठी बोहल्यावर चढले. एकंबा हे उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील एक दुर्गम छोटेसे गाव. १८० घरे व ८२० लोकसंख्येचे हे गाव आहे. गावातील सर्व कुटुंब आदिवासी असून, आजुबाजुला माळरान आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे तेंदूपत्ता संकलन, रानमेवा विकणे, पशुपालन अशा प्रकारचा आहे. अशा या गावाकडे जगाचे लक्ष जावे असे काम याठिकाणी झाले. वॉटर कप स्पर्धेच्यानिमित्ताने हे गाव चर्चेत आले. गावातील दोन विधवा महिलांनी जलसंधारणाचे काम उभे केले. गावाला पाण्यासाठी एकत्र आणले आणि संपूर्ण गाव कामाला लागले. २६ एप्रिलला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी येथील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर एकंबा येथील नवरदेव उत्तम दिलीप भुरके व नवरी मनीषा साहेबराव खराटे यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमाची महती जोपासून आधी श्रमदान केले. वऱ्हाडी मंडळींनीही श्रमदानात सहभाग नोंदविला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.