शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

श्रमदान करूनच ते चढले बोहल्यावर

By admin | Updated: May 19, 2017 01:55 IST

पाणी फाऊंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या गावागावात जलसंधारणाचे काम करीत आहे.

जलसंधारणाचा ध्यास : आदिवासी नवदाम्पत्याने ठेवला समाजापुढे आदर्श ढाणकी : पाणी फाऊंडेशन व सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सध्या गावागावात जलसंधारणाचे काम करीत आहे. जलसंधारणाच्या कामानिमित्त समाजात आश्चर्य वाटावे असे सकारात्मक बदल दिसून येत आहे. उभ्या महाराष्ट्राला पे्ररणादायी ठरावी अशी घटना उमरखेड तालुक्यातील एकंबा येथे घडली. आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्नाचा येथील आदिवासी नवदाम्पत्याने हा अविस्मरणीय सोहळा प्रथम श्रमदान करून साजरा केला आणि नंतरच आयुष्यभराच्या मनसंधारणासाठी बोहल्यावर चढले. एकंबा हे उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील एक दुर्गम छोटेसे गाव. १८० घरे व ८२० लोकसंख्येचे हे गाव आहे. गावातील सर्व कुटुंब आदिवासी असून, आजुबाजुला माळरान आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे तेंदूपत्ता संकलन, रानमेवा विकणे, पशुपालन अशा प्रकारचा आहे. अशा या गावाकडे जगाचे लक्ष जावे असे काम याठिकाणी झाले. वॉटर कप स्पर्धेच्यानिमित्ताने हे गाव चर्चेत आले. गावातील दोन विधवा महिलांनी जलसंधारणाचे काम उभे केले. गावाला पाण्यासाठी एकत्र आणले आणि संपूर्ण गाव कामाला लागले. २६ एप्रिलला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी येथील महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यानंतर एकंबा येथील नवरदेव उत्तम दिलीप भुरके व नवरी मनीषा साहेबराव खराटे यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी श्रमाची महती जोपासून आधी श्रमदान केले. वऱ्हाडी मंडळींनीही श्रमदानात सहभाग नोंदविला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.