शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

‘नेट’अभावी रखडले आॅनलाईन कामकाज

By admin | Updated: March 18, 2015 02:22 IST

पंचायतराज अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व साधनसामुग्री पुरविण्यात आली.

पुसद : पंचायतराज अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व साधनसामुग्री पुरविण्यात आली. मात्र पुसद तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत इंटरनेटचा अभाव असल्याने आॅनलाईन प्रणालीचा बोजवारा उडाला आहे.निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई-गव्हर्नमेंट कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत हा मिशनमोड प्रोग्रॅम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प संग्राम प्रकल्प या नावाने राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांचे संगणकीकरण करण्यात आले असून त्यांचा कारभार आॅनलाईन करण्यात आलेला आहे. परंतु जिल्ह्यासह पुसद तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे इंटरनेट कनेक्शन नाही. तर ज्या ग्रामपंचायतीकडे इंटरनेट कनेक्शन आहे. त्यांच्याकडे कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवा केंद्रातून नागरिकांना जन्म नोंदणी व प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसल्याचे प्रमाणपत्र, रहिवासीचा दाखला, शौचालय दाखला, जातीचा दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला तसेच यासह वीज बिल, टेलिफोन बिल रेल्वे आरक्षण, एसटी आरक्षण करण्याच्या सुविधा देखील उपलब्ध करून देणे गरजेचे होते.ग्रामपंचायतीने कार्यक्षेत्रातील जनतेस द्यावयाच्या सेवा सुविधा सुलभतेने व एकत्रितरीत्या एकाच ठिकाणावरून जनतेस देण्याकरिता व प्रशासकीय पातळीवर माहितीचा देवाण-घेवाण करण्यासाठी वेळ व पैशाची बचत व्हावी याकरिता शासनाने १३ व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक पुरविण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील १२०५ ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले आहे. परंतु या संगणकांना आॅनलाईन सुविधाकरिता लागणारे इंटरनेट कनेक्शन अजूनपर्यंत काही ग्रामपंचायतींना पुरविण्यात आले नाही. तसेच तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण असलेले मनुष्यबळ ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज कागदावरच राहिले आहे. (तालुका प्रतिनिधी)