शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट’अभावी रखडले आॅनलाईन कामकाज

By admin | Updated: March 18, 2015 02:22 IST

पंचायतराज अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व साधनसामुग्री पुरविण्यात आली.

पुसद : पंचायतराज अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी सर्व साधनसामुग्री पुरविण्यात आली. मात्र पुसद तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत इंटरनेटचा अभाव असल्याने आॅनलाईन प्रणालीचा बोजवारा उडाला आहे.निर्माण कार्यक्रमातील नॅशनल ई-गव्हर्नमेंट कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ई-पंचायत हा मिशनमोड प्रोग्रॅम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प संग्राम प्रकल्प या नावाने राबविण्यात येत असून या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांचे संगणकीकरण करण्यात आले असून त्यांचा कारभार आॅनलाईन करण्यात आलेला आहे. परंतु जिल्ह्यासह पुसद तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे इंटरनेट कनेक्शन नाही. तर ज्या ग्रामपंचायतीकडे इंटरनेट कनेक्शन आहे. त्यांच्याकडे कनेक्टीव्हीटीचा अभाव आहे. ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवा केंद्रातून नागरिकांना जन्म नोंदणी व प्रमाणपत्र, बेरोजगार प्रमाणपत्र, मृत्यूची नोंदणी व प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसल्याचे प्रमाणपत्र, रहिवासीचा दाखला, शौचालय दाखला, जातीचा दाखला, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, चारित्र्याचा दाखला, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला तसेच यासह वीज बिल, टेलिफोन बिल रेल्वे आरक्षण, एसटी आरक्षण करण्याच्या सुविधा देखील उपलब्ध करून देणे गरजेचे होते.ग्रामपंचायतीने कार्यक्षेत्रातील जनतेस द्यावयाच्या सेवा सुविधा सुलभतेने व एकत्रितरीत्या एकाच ठिकाणावरून जनतेस देण्याकरिता व प्रशासकीय पातळीवर माहितीचा देवाण-घेवाण करण्यासाठी वेळ व पैशाची बचत व्हावी याकरिता शासनाने १३ व्या वित्त आयोगातून प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक पुरविण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील १२०५ ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले आहे. परंतु या संगणकांना आॅनलाईन सुविधाकरिता लागणारे इंटरनेट कनेक्शन अजूनपर्यंत काही ग्रामपंचायतींना पुरविण्यात आले नाही. तसेच तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण असलेले मनुष्यबळ ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज कागदावरच राहिले आहे. (तालुका प्रतिनिधी)