शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वणी सेतूत आॅनलाईनऐवजी आॅफलाईन

By admin | Updated: June 26, 2015 02:27 IST

शासनाने मोठा गाजावाजा करून सर्व सेतूचा कारभार आॅनलाईन केला.

वणी : शासनाने मोठा गाजावाजा करून सर्व सेतूचा कारभार आॅनलाईन केला. मात्र येथील सेतूमध्ये सध्या आॅफलाईन कारभार सुरू आहे. दररोज हजारो रूपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमाच होत नाही. सेतूमध्ये प्रमाणपत्रांसाठी दररोज लांबच लांब रांग लागत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. त्याचबरोबर अनेक केसेस गहाळसुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या दहावी व बारावीचा निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तहसीलच्या सेतूमध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दररोज प्रचंड गर्दी होत आहे. सेतूमधील गर्दी बघून अनेक नागरिक तोंडावर बोट ठेवत आहे. मात्र येथील सेतूमधील आॅनलाईनचा कारभार सध्या आॅफलाईनवर आला आहे. या आॅफलाईनमुळे सेतूमधील कर्मचाऱ्यांना चांगलाच लाभ होत आहे. सेतूमधून कोणतेही प्रमाणपत्र आॅनलाईन काढले, तर त्याचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो. मात्र आॅफलाईन कागदपत्रे काढली, तर त्याला कोणतेही शुल्क लागत नाही. तथापि विद्यार्थी, पालकांकडून सेतूतील कर्मचारी संपूर्ण रक्कम वसूल करीत आहे. पालक, विद्यार्थ्यांना हे कर्मचारी शिक्का मारलेली पावती देत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी शासकीय तिजोरीला चुना लावत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे जेथे टिनाचे शेड आहे, तेथे विद्यार्थ्यांना उभे न करता दुसऱ्या बाजूकडील खिडकीजवळ विद्यार्थ्यांना रांग लावण्यास कर्मचारी सांगत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अधूनमधून पाऊस हजेरीही लावत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात महत्वाची कागदपत्रे असल्याने पावसाचे शिंतोडे लागताच ते रांग सोडून छताच्या शोधात भटकत आहे. त्यांची धावाधाव होताना दिसत आहे. मात्र टिनाच्या शेडमधून त्यांचे कागदपत्रे घेण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी सेतूमधील कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करीत आहे. आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना तातडीने कागदपत्रे मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र पावतीवर दिलेला दिवस निघून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या हातात प्रमाणपत्र पडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सेतूमधून अनेक केसेस गहाळ होत असल्याचेही दिसून येत आहे. काही केसेस शोधल्यानंतर सापडतात, तर काही केसेस मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना अर्जनविसांमार्फत बनवून घ्यावी लागत आहे. परिणामी त्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे. येथील सेतू केंद्रावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने सेतूतील कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. सेतूमधील काही कर्मचारी अल्पशिक्षित असल्याने प्रमाणपत्रे काढण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागतो. पूर्वीच्या काही कर्मचाऱ्यांनी सेतूच्या कारभाराला कंटाळून काम सोडून दिले आहे. त्यामुळे आता सेतूमध्ये अनेक नवीन व अल्पशिक्षीत कर्मचारी दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)