शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अधिकाऱ्यांनो, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा

By admin | Updated: October 5, 2015 02:33 IST

चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

बळीराजा चेतना अभियान : पशु व मत्स्य पालनास प्रोत्साहन देण्याची पालकमंत्र्यांची सूचनायवतमाळ : चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते.कृषी, पशु, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय विभागांनी शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्या लवकरात लवकर स्थापन करून समित्यांचे काम सुरु झाले पाहिजे. कमी खर्चात आणि कोरडवाहू शेती चांगल्या पध्दतीने करता यावी म्हणून कृषी विभागाने या पध्दतीबाबत प्रचार व प्रसार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ दिला जावा. अन्नसुरक्षा योजनेसह प्राधान्य कुटुंबातील योजनेसाठी पात्र शेतमजूर, भूमिहीनांचा यादीत समावेश करण्यात यावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार यांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची तसेच अभियानाच्या प्रगतीची माहिती सादर केली. शेवटी खवले यांनी मान्यवरांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)