शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनो, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा

By admin | Updated: October 5, 2015 02:33 IST

चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

बळीराजा चेतना अभियान : पशु व मत्स्य पालनास प्रोत्साहन देण्याची पालकमंत्र्यांची सूचनायवतमाळ : चेतना अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.बचत भवन येथे बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते.कृषी, पशु, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय विभागांनी शेतकऱ्यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्या लवकरात लवकर स्थापन करून समित्यांचे काम सुरु झाले पाहिजे. कमी खर्चात आणि कोरडवाहू शेती चांगल्या पध्दतीने करता यावी म्हणून कृषी विभागाने या पध्दतीबाबत प्रचार व प्रसार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी शोधून त्यांना लाभ दिला जावा. अन्नसुरक्षा योजनेसह प्राधान्य कुटुंबातील योजनेसाठी पात्र शेतमजूर, भूमिहीनांचा यादीत समावेश करण्यात यावा. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे, खासदार भावना गवळी, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मदन येरावार यांनीही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची तसेच अभियानाच्या प्रगतीची माहिती सादर केली. शेवटी खवले यांनी मान्यवरांचे आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)