शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

अधिकारी वाळूमाफियांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:03 IST

अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांची चांदी : शासकीय बांधकामांना लागला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ब्रेक लागला आहे.एकीकडे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी फौजदारी कारवाया करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले असले तरी वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे. वरिष्ठांचे समाधान करण्यासाठी लहान-सहान कारवाया होत असल्या तरी मोठे मासे मात्र महसूल यंत्रणेच्या जाळ्यातून सहीसलामत बाहेर पडत आहे. सध्या या तस्करांनी वर्धा नदीला आपले टार्गेट केले असून ही नदी यवतमाळ व चंद्रपूर या दोनही जिल्ह्याच्या सिमेवर आहे. त्यामुळे वणी व चंद्रपूर भागातील रेतीमाफीये या नदीवर अक्षरश: तुटून पडले आहेत. या तस्करांवर कुणाचेही नियंत्रण नसून ही तस्करी शासकीय पातळीवर ‘मॅनेज’ असल्याचे सांगितले जाते. वाळूची वाहतूक करण्याच्या वेळा ठरल्या असून या वेळांमध्ये त्या मार्गावर संबंधित यंत्रणा फिरणार नाही, असा छुपा करारच रेती तस्कर व अधिकाºयांमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे वाळू उपस्यावर बंदी असताना दुसरीकडे खासगी बांधकाम व्यावसायिकांकडे रेती येते कुठून, याची साधी चौकशीही महसूल यंत्रणेमार्फत केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ वणीच नाही, तर मारेगाव, झरी तालुक्यातदेखिल खासगी बांधकाम व्यावसायिकांची कामे जोरात सुरू आहे. ज्या शासकीय कंत्राटदाराकडे अल्प प्रमाणात रेती आहे, तो कंत्राटदार ही कामे थातुरमातूर पद्धतीने करून बिले उचलण्याच्या तयारीत आहे. यामुळे कामाचा दर्जा घसरत आहे.रेतीअभावी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तथा वेकोलिची विकासकामे ठप्प झाली आहे. दुसरीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला कोट्यवधी रूपयांच्या महसूलाला मुकावे लागत आहे. शासनस्तरावरील काही कामे आचारसंहितेपूर्वी करण्याचे आदेश असले तरी रेतीअभावी ही कामे होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.रेती घाटांच्या लिलावाला बसणार आचारसंहितेचा फटकानागपूर विभागात रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली असून ६ मार्चपर्यंत निविदा पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील रेती घाटांच्या निविदा निघण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी या काळात जर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली, तर ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास रेती घाटाचे लिलाव पुन्हा एकदा लांबणार आहेत.

टॅग्स :sandवाळू