शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

अधिकारी वाळूमाफियांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 22:03 IST

अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांची चांदी : शासकीय बांधकामांना लागला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : अद्याप रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दावणीला बांधून वणी उपविभागात वाळू तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. हे तस्कर दामदुपटीने रेती खासगी बांधकाम व्यावसायिकांना विकत असून अधिकृतपणे रेती मिळत नसल्याने शासकीय बांधकामांना ब्रेक लागला आहे.एकीकडे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी फौजदारी कारवाया करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले असले तरी वणी, झरी व मारेगाव या तीन तालुक्यात या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे. वरिष्ठांचे समाधान करण्यासाठी लहान-सहान कारवाया होत असल्या तरी मोठे मासे मात्र महसूल यंत्रणेच्या जाळ्यातून सहीसलामत बाहेर पडत आहे. सध्या या तस्करांनी वर्धा नदीला आपले टार्गेट केले असून ही नदी यवतमाळ व चंद्रपूर या दोनही जिल्ह्याच्या सिमेवर आहे. त्यामुळे वणी व चंद्रपूर भागातील रेतीमाफीये या नदीवर अक्षरश: तुटून पडले आहेत. या तस्करांवर कुणाचेही नियंत्रण नसून ही तस्करी शासकीय पातळीवर ‘मॅनेज’ असल्याचे सांगितले जाते. वाळूची वाहतूक करण्याच्या वेळा ठरल्या असून या वेळांमध्ये त्या मार्गावर संबंधित यंत्रणा फिरणार नाही, असा छुपा करारच रेती तस्कर व अधिकाºयांमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे वाळू उपस्यावर बंदी असताना दुसरीकडे खासगी बांधकाम व्यावसायिकांकडे रेती येते कुठून, याची साधी चौकशीही महसूल यंत्रणेमार्फत केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ वणीच नाही, तर मारेगाव, झरी तालुक्यातदेखिल खासगी बांधकाम व्यावसायिकांची कामे जोरात सुरू आहे. ज्या शासकीय कंत्राटदाराकडे अल्प प्रमाणात रेती आहे, तो कंत्राटदार ही कामे थातुरमातूर पद्धतीने करून बिले उचलण्याच्या तयारीत आहे. यामुळे कामाचा दर्जा घसरत आहे.रेतीअभावी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तथा वेकोलिची विकासकामे ठप्प झाली आहे. दुसरीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने शासनाला कोट्यवधी रूपयांच्या महसूलाला मुकावे लागत आहे. शासनस्तरावरील काही कामे आचारसंहितेपूर्वी करण्याचे आदेश असले तरी रेतीअभावी ही कामे होतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.रेती घाटांच्या लिलावाला बसणार आचारसंहितेचा फटकानागपूर विभागात रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली असून ६ मार्चपर्यंत निविदा पाठविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील रेती घाटांच्या निविदा निघण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी या काळात जर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली, तर ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास रेती घाटाचे लिलाव पुन्हा एकदा लांबणार आहेत.

टॅग्स :sandवाळू