शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:15 IST

नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे.

ठळक मुद्देवेचणीलाही परवडेना कापूस : ४० हजार रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरविला आहे. जामणी येथील शेतकऱ्यानेही वेचणीलाही कापूस परवडत नसल्याने शेतात गुरे सोडलीत.जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी तथा बोंडअळीने हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण बोंडेच किडली आहेत. यात फुटलेला कापूस वेचण्यासही शेतमजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना कापूस न वेचताच उलंगवाडी करावी लागत आहे. वर्धा तथा देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव तसेच परिसरातील कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रकोप दिसून येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाला तोंड देत अहोरात्र श्रम करून कपाशी पीक जपले; पण बोंडअळीच्या प्रकोपामुळे हातचे पीक गेले आहे. बोंडअळीचा फटका देवळी तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी अतुल राऊत याला बसला. अतुलने २८ मे रोजी प्री मान्सून बिटी कपाशीची दोन एकरात लागवड केली. यावर याने ४० हजार रुपये खर्च केला. कपाशीचे पीक चांगले बहरले. चांगले उत्पन्न होईल, अशी आशा होती. बोंड भरत असताना बोंडअळीचा हल्ला झाला. यात कपाशीची बोंडे किडली. कापूसही किडक निघत आहे. यंदा केवळ दोन क्विंटल कापूस निघाला. याच शेतात मागील वर्षी ३२ क्विंटल कापूस झाला होता. मजूरही कापूस वेचण्यास तयार नाही. यामुळे नाईलाज म्हणून पिकातच गुरे सोडावी लागली. यात खर्चही व्यर्थ गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.स्वत: शेताची पाहणी केली. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे बोंडे किडली असल्याने कापूस निघणार नाही. अर्ज भरण्यास सांगितले आहे. शासनाकडून किती मदत होईल, हे सांगणे कठीण नाही. शेतकऱ्यांना बीटी कपाशीची लागवड करताना काही अंतरावर नॉन बिटी लावावी. यामुळे बीटी कपाशीच्या बोंडावर हल्ला झाला नसता.- व्ही.एस. खैरकार, कृषी सहायक, मंडळ सोनेगाव (आ.).अळ्यांमुळे भीतीचे वातावरणहिंगणी - गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहे. येथील युवा शेतकरी स्रेहल पोकळे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कष्टाने जपलेल्या पिकांवर महागडी फवारणी केली; पण कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते. यामुळे शेतकरी फसतात. बोंडअळी, पाने कातरणारी अळी, लाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी भरपाईची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :cottonकापूस