शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:15 IST

नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे.

ठळक मुद्देवेचणीलाही परवडेना कापूस : ४० हजार रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरविला आहे. जामणी येथील शेतकऱ्यानेही वेचणीलाही कापूस परवडत नसल्याने शेतात गुरे सोडलीत.जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी तथा बोंडअळीने हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण बोंडेच किडली आहेत. यात फुटलेला कापूस वेचण्यासही शेतमजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना कापूस न वेचताच उलंगवाडी करावी लागत आहे. वर्धा तथा देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव तसेच परिसरातील कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रकोप दिसून येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाला तोंड देत अहोरात्र श्रम करून कपाशी पीक जपले; पण बोंडअळीच्या प्रकोपामुळे हातचे पीक गेले आहे. बोंडअळीचा फटका देवळी तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी अतुल राऊत याला बसला. अतुलने २८ मे रोजी प्री मान्सून बिटी कपाशीची दोन एकरात लागवड केली. यावर याने ४० हजार रुपये खर्च केला. कपाशीचे पीक चांगले बहरले. चांगले उत्पन्न होईल, अशी आशा होती. बोंड भरत असताना बोंडअळीचा हल्ला झाला. यात कपाशीची बोंडे किडली. कापूसही किडक निघत आहे. यंदा केवळ दोन क्विंटल कापूस निघाला. याच शेतात मागील वर्षी ३२ क्विंटल कापूस झाला होता. मजूरही कापूस वेचण्यास तयार नाही. यामुळे नाईलाज म्हणून पिकातच गुरे सोडावी लागली. यात खर्चही व्यर्थ गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.स्वत: शेताची पाहणी केली. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे बोंडे किडली असल्याने कापूस निघणार नाही. अर्ज भरण्यास सांगितले आहे. शासनाकडून किती मदत होईल, हे सांगणे कठीण नाही. शेतकऱ्यांना बीटी कपाशीची लागवड करताना काही अंतरावर नॉन बिटी लावावी. यामुळे बीटी कपाशीच्या बोंडावर हल्ला झाला नसता.- व्ही.एस. खैरकार, कृषी सहायक, मंडळ सोनेगाव (आ.).अळ्यांमुळे भीतीचे वातावरणहिंगणी - गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहे. येथील युवा शेतकरी स्रेहल पोकळे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कष्टाने जपलेल्या पिकांवर महागडी फवारणी केली; पण कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते. यामुळे शेतकरी फसतात. बोंडअळी, पाने कातरणारी अळी, लाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी भरपाईची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :cottonकापूस