शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

अळ्यांचा प्रकोप; शेतात सोडली गुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:15 IST

नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकºयांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकºयांनी शेतावर नांगर फिरविला आहे.

ठळक मुद्देवेचणीलाही परवडेना कापूस : ४० हजार रुपयांचा खर्च ठरला व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/चिकणी (जामणी) : नगदी पीक म्हणून परिचित असलेल्या कपाशीने यंदा शेतकऱ्यांना धोका दिला आहे. गुलाबी अळी, बोंडअळीने होत्याचे नव्हते केले. यामुळे खर्चही भरून निघणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर नांगर फिरविला आहे. जामणी येथील शेतकऱ्यानेही वेचणीलाही कापूस परवडत नसल्याने शेतात गुरे सोडलीत.जिल्ह्यात कपाशी पिकावर गुलाबी तथा बोंडअळीने हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण बोंडेच किडली आहेत. यात फुटलेला कापूस वेचण्यासही शेतमजूर तयार नसल्याने शेतकऱ्यांना कापूस न वेचताच उलंगवाडी करावी लागत आहे. वर्धा तथा देवळी तालुक्यातील चिकणी, जामणी, पडेगाव, निमगाव तसेच परिसरातील कपाशी पिकांवर बोंड अळीचा प्रकोप दिसून येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाला तोंड देत अहोरात्र श्रम करून कपाशी पीक जपले; पण बोंडअळीच्या प्रकोपामुळे हातचे पीक गेले आहे. बोंडअळीचा फटका देवळी तालुक्यातील जामणी येथील युवा शेतकरी अतुल राऊत याला बसला. अतुलने २८ मे रोजी प्री मान्सून बिटी कपाशीची दोन एकरात लागवड केली. यावर याने ४० हजार रुपये खर्च केला. कपाशीचे पीक चांगले बहरले. चांगले उत्पन्न होईल, अशी आशा होती. बोंड भरत असताना बोंडअळीचा हल्ला झाला. यात कपाशीची बोंडे किडली. कापूसही किडक निघत आहे. यंदा केवळ दोन क्विंटल कापूस निघाला. याच शेतात मागील वर्षी ३२ क्विंटल कापूस झाला होता. मजूरही कापूस वेचण्यास तयार नाही. यामुळे नाईलाज म्हणून पिकातच गुरे सोडावी लागली. यात खर्चही व्यर्थ गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.स्वत: शेताची पाहणी केली. बोंडअळीच्या हल्ल्यामुळे बोंडे किडली असल्याने कापूस निघणार नाही. अर्ज भरण्यास सांगितले आहे. शासनाकडून किती मदत होईल, हे सांगणे कठीण नाही. शेतकऱ्यांना बीटी कपाशीची लागवड करताना काही अंतरावर नॉन बिटी लावावी. यामुळे बीटी कपाशीच्या बोंडावर हल्ला झाला नसता.- व्ही.एस. खैरकार, कृषी सहायक, मंडळ सोनेगाव (आ.).अळ्यांमुळे भीतीचे वातावरणहिंगणी - गुलाबी व अमेरिकन बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त आहे. येथील युवा शेतकरी स्रेहल पोकळे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. कष्टाने जपलेल्या पिकांवर महागडी फवारणी केली; पण कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची सर्रास विक्री केली जाते. यामुळे शेतकरी फसतात. बोंडअळी, पाने कातरणारी अळी, लाल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी भरपाईची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :cottonकापूस