शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वणीत फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:26 IST

शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देगुजरी ठेकेदाराची कमाई : रस्ते अरूंद झाल्याने वाहनचालकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वणी शहरातील बहुतांश रस्ते ५० वर्षापूर्वीच्या लोकसंख्येच्या अनुमानाने तयार करण्यात आले होते. गेल्या ५० वर्षात लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. मात्र रस्ते तेवढच आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरही अतिक्रमणाची स्पर्धा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पादचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने या वर्दळीतून पादचाºयांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला फुटपाथची निर्मिती करण्यात आली. मात्र आता एकही फुटपाथ पादचाºयांना वापरण्यासाठी मोकळा राहिला नाही. अनेक फुटपाथवर किरकोळ दुकाने उभी करण्यात आली आहे. यापलिकडेही व्यावसायीक फुटपाथच्या पलिकडे रस्त्यावर दुकानातील वस्तू मांडतात. त्यामुळे रस्तेही अरूंद झाले आहेत. रस्त्यावरून जाणाºया एखाद्या व्यक्तीची सायकल किंवा दुचाकी जर फुटपाथवरील वस्तूला लागली, तर संबंधित दुकानदार सायकल किंवा दुचाकीचालकांशी वादावादी करण्यासही मागेपुढे पाहत नाही.त्यामुळे फुटपाथ व्यावसायीकांसाठी की जनतेसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र नगरपालिका याप्रकरणी ‘नरो वा, कुंजरो वा’ ची भूमिका घेत आहे. फुटपाथ जनतेसाठी खुले करून देण्याची तसदी पालिका प्रशासनामध्ये राहिली नाही. एवढेच नव्हे तर या व्यावसायीकांकडून गुजरी ठेकेदार दररोज वसुली करून त्यांना संरक्षण देत आहेत. मात्र या वसुलीची पावतीसुद्धा व्यावसायीकांना दिली जात नाही. यामुळेच शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना दिवसातून अनेकदा घडत असतात. शहरात काही रस्त्यांवर एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र एकमार्गी वाहतूक असणारे रस्तेही अतिक्रमणाने वेढले आहेत.या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची तसदी वाहतूक पोलिससुद्धा घेताना दिसत नाही. फुटपाथवरील दुकाने त्यासमोर दुकानदारांचे सामान व त्यासमोर ग्राहकांच्या दुचाकी उभ्या असल्याने रस्ता शिल्लक राहत नाही. येथील गांधी चौक हा शहराचा आत्मा समजला जातो. मात्र या चौकात सर्वाधिक अतिक्रमण झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावर एकमार्गी रस्ता असतानाही चारचाकी वाहने काढताना कसरत करावी लागते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण