शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वणीत फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 22:26 IST

शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देगुजरी ठेकेदाराची कमाई : रस्ते अरूंद झाल्याने वाहनचालकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरामध्ये काही मुख्य रस्त्याच्या कडेला पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवर पादचाºयांना पाय ठेवण्याचीही मुभा राहिली नाही. व्यावसायिकांनीच या फुटपाथवर ताबा मिळविला असून पालिकेने जणू हे फुटपाथ व्यावायीकांसाठीच बांधले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वणी शहरातील बहुतांश रस्ते ५० वर्षापूर्वीच्या लोकसंख्येच्या अनुमानाने तयार करण्यात आले होते. गेल्या ५० वर्षात लोकसंख्या कितीतरी पटीने वाढली. मात्र रस्ते तेवढच आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरही अतिक्रमणाची स्पर्धा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पादचाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याने या वर्दळीतून पादचाºयांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला फुटपाथची निर्मिती करण्यात आली. मात्र आता एकही फुटपाथ पादचाºयांना वापरण्यासाठी मोकळा राहिला नाही. अनेक फुटपाथवर किरकोळ दुकाने उभी करण्यात आली आहे. यापलिकडेही व्यावसायीक फुटपाथच्या पलिकडे रस्त्यावर दुकानातील वस्तू मांडतात. त्यामुळे रस्तेही अरूंद झाले आहेत. रस्त्यावरून जाणाºया एखाद्या व्यक्तीची सायकल किंवा दुचाकी जर फुटपाथवरील वस्तूला लागली, तर संबंधित दुकानदार सायकल किंवा दुचाकीचालकांशी वादावादी करण्यासही मागेपुढे पाहत नाही.त्यामुळे फुटपाथ व्यावसायीकांसाठी की जनतेसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र नगरपालिका याप्रकरणी ‘नरो वा, कुंजरो वा’ ची भूमिका घेत आहे. फुटपाथ जनतेसाठी खुले करून देण्याची तसदी पालिका प्रशासनामध्ये राहिली नाही. एवढेच नव्हे तर या व्यावसायीकांकडून गुजरी ठेकेदार दररोज वसुली करून त्यांना संरक्षण देत आहेत. मात्र या वसुलीची पावतीसुद्धा व्यावसायीकांना दिली जात नाही. यामुळेच शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा होण्याच्या घटना दिवसातून अनेकदा घडत असतात. शहरात काही रस्त्यांवर एकमार्गी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र एकमार्गी वाहतूक असणारे रस्तेही अतिक्रमणाने वेढले आहेत.या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याची तसदी वाहतूक पोलिससुद्धा घेताना दिसत नाही. फुटपाथवरील दुकाने त्यासमोर दुकानदारांचे सामान व त्यासमोर ग्राहकांच्या दुचाकी उभ्या असल्याने रस्ता शिल्लक राहत नाही. येथील गांधी चौक हा शहराचा आत्मा समजला जातो. मात्र या चौकात सर्वाधिक अतिक्रमण झाले आहेत. रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या रस्त्यावर एकमार्गी रस्ता असतानाही चारचाकी वाहने काढताना कसरत करावी लागते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण