शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
5
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
6
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
7
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
8
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
9
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
10
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
11
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
12
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
13
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
14
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
15
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
16
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
17
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
18
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
19
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
20
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट

करंजखेड, आमणी ग्रामपंचायतीकडून अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:28 IST

महागाव : तालुक्यातील आमणी (खुर्द) गटग्रामपंचायतीच्या हद्दीत डंपिंग ग्राउंड तयार करण्यास आमणी आणि करंजखेड ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. ...

महागाव :

तालुक्यातील आमणी (खुर्द) गटग्रामपंचायतीच्या हद्दीत डंपिंग ग्राउंड तयार करण्यास आमणी आणि करंजखेड ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे येथील डंपिंग ग्राउंडचे गेल्या सहा वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.

आमणी, जनुना आणि करंजखेड या तिन्ही गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने डंपिंग ग्राउंड कदापि होऊ देणार नाही, असा निर्धार या गावातील नागरिकांनी केला आहे. याबाबत पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप ठाकरे यांच्या नेतृत्वात भरोस चव्हाण, ज्ञानेश्वर इंगोले आदींनी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

साधारणतः ६ वर्षांपूर्वी येथे नगरपंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून शहरातील कचरा कुठे विसर्जित करावा, या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले आहे.

आमणी गट ग्रामपंचायतीअंतर्गत शेत सर्वे नं. १७ मध्ये १ हेक्टर ९ आर. क्षेत्रातील जागा डंपिंग ग्राउंडसाठी अर्जित करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहे. दोन्ही ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी तहसीलने पत्रव्यवहार केला. मात्र, आमणी, जनुना गटग्रामपंचायत व करंजखेड ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

जनुना व करंजखेड गावाचा विस्तार होणार असल्याने भविष्यात गावठाणासाठी ही जागा महत्त्वाची आहे. डंपिंग ग्राउंडपासून दोन्ही गावे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे घाणीचा नागरिकांना प्रचंड त्रास होऊन आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

या जागेपासून काही अंतरावर राजोबा देवस्थान, शिव मंदिर, दत्त मंदिर आहे. तेथे नेहमी धार्मिक कार्यक्रम होतात. डंपिंग ग्राउंडमुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचू शकते. या जागेवर मोठा तलाव आहे. घन कचऱ्याची घाण या तलावात झिरपली तर पाणी अशुद्ध होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित जागेवर डंपिंग ग्राउंड होऊ देणार नाही, असा ठराव दोन्ही ग्रामपंचायतींनी घेतला आहे. ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण निर्माण झाला आहे.

बॉक्स

घनकचरा व्यवस्थापनाचे राजकारण

येथून जवळच असलेल्या एका शेतात मागील काही वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन केले जात आहे. एका शेतकऱ्याने वाट अडविल्याने गेल्या १२ दिवसांपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. यात मोठा भ्रष्टाचार करता यावा, यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नवीन जागी घनकचरा व्यवस्थापन व्हावे, यासाठी संबंधितांचा आटापिटा सुरू आहे.