शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:35 IST

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला.

ठळक मुद्दे‘एसपीं’ची माहिती : विनयभंग, दरोडा, जनावरे-वाहन चोरीत मात्र वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली.एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. २०१७ मध्ये जिल्ह्यात पाच हजार ३७६ गुन्हे नोंदविले गेले होते.परंतु यावर्षी हा आकडा ४३२ ने कमी होऊन ४९४४ पर्यंत खाली आला आहे. याच आधारावर जिल्ह्यात गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, जबरी संभोग, जबरी चोरी, घरफोड्या, सायकल चोरी, ट्रक चोरी, कार-जीप चोरी, अन्य चोऱ्या, शेती अवजारे, खिसेकापू, दुखापत, दंगा, अफरातफर, अनधिकृत गृहप्रवेश, अपक्रिया, हुंडाबळी या सारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली. तर दरोडा, दरोड्याची तयारी, इलेक्ट्रीक वायर चोरी, जनावर चोरी, वाहन चोरी, वाहनांचे सुटे भाग, फसवणूक, पळवून नेणे, शासकीय कर्मचाºयांवर हल्ला, विनयभंग, नवविवाहितांची आत्महत्या, इतर आत्महत्या, विवाहितांचा विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ या गुन्हे प्रकारात मात्र किंचित वाढ झाली असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी उपस्थित होते.चार पोलिसांचा मृत्यूगेल्या वर्षभरात नेर येथे दोन तर लोहारा व मुकुटबन येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर मारेगाव ठाण्यातील एका सहायक फौजदाराच्या खुनाची घटना घडली.२५ रिव्हॉल्वर जप्तगेल्या वर्षभरात पोलिसांनी अग्नीशस्त्राचे ११ गुन्हे नोंदविले आहे. त्यात २४ जणांंना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे २५ अग्नीशस्त्रे, ४८ काडतूस जप्त करण्यात आले. शिवाय चाकू, गुप्ती, तलवार, जांबिया या सारख्या घातक शस्त्राचे ४१ गुन्हे नोंदवून ५६ जणांना अटक करण्यात आली. या शस्त्राची किंमत ४ लाख ५७ हजार ८७५ रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.नववर्षासाठी तगडा बंदोबस्त३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत उत्साहात मात्र शांततेने व नियमात राहून करावे, असे आवाहन एम. राज कुमार यांनी केले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा २४ तास वॉच राहील. लहान मुलांना पालकांनी वाहने देऊ नये, प्रत्येकाने रहदारीचे नियम पाळावे. ३१ डिसेंबरसाठी जिल्हाभर ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहनांची, वाहनधारकांची तपासणी केली जाणार असल्याचे एसपींनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ