शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:35 IST

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली. एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला.

ठळक मुद्दे‘एसपीं’ची माहिती : विनयभंग, दरोडा, जनावरे-वाहन चोरीत मात्र वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत ४३२ ने घट झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत दिली.एसपी राज कुमार यांनी गुन्ह्यांच्या ३० ते ३२ प्रकारांचा वर्षभरातील लेखाजोखा मांडला. २०१७ मध्ये जिल्ह्यात पाच हजार ३७६ गुन्हे नोंदविले गेले होते.परंतु यावर्षी हा आकडा ४३२ ने कमी होऊन ४९४४ पर्यंत खाली आला आहे. याच आधारावर जिल्ह्यात गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, जबरी संभोग, जबरी चोरी, घरफोड्या, सायकल चोरी, ट्रक चोरी, कार-जीप चोरी, अन्य चोऱ्या, शेती अवजारे, खिसेकापू, दुखापत, दंगा, अफरातफर, अनधिकृत गृहप्रवेश, अपक्रिया, हुंडाबळी या सारख्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची आकडेवारी सादर करण्यात आली. तर दरोडा, दरोड्याची तयारी, इलेक्ट्रीक वायर चोरी, जनावर चोरी, वाहन चोरी, वाहनांचे सुटे भाग, फसवणूक, पळवून नेणे, शासकीय कर्मचाºयांवर हल्ला, विनयभंग, नवविवाहितांची आत्महत्या, इतर आत्महत्या, विवाहितांचा विविध कारणावरून शारीरिक व मानसिक छळ या गुन्हे प्रकारात मात्र किंचित वाढ झाली असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.पत्रपरिषदेला यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी उपस्थित होते.चार पोलिसांचा मृत्यूगेल्या वर्षभरात नेर येथे दोन तर लोहारा व मुकुटबन येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर मारेगाव ठाण्यातील एका सहायक फौजदाराच्या खुनाची घटना घडली.२५ रिव्हॉल्वर जप्तगेल्या वर्षभरात पोलिसांनी अग्नीशस्त्राचे ११ गुन्हे नोंदविले आहे. त्यात २४ जणांंना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे २५ अग्नीशस्त्रे, ४८ काडतूस जप्त करण्यात आले. शिवाय चाकू, गुप्ती, तलवार, जांबिया या सारख्या घातक शस्त्राचे ४१ गुन्हे नोंदवून ५६ जणांना अटक करण्यात आली. या शस्त्राची किंमत ४ लाख ५७ हजार ८७५ रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले.नववर्षासाठी तगडा बंदोबस्त३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत उत्साहात मात्र शांततेने व नियमात राहून करावे, असे आवाहन एम. राज कुमार यांनी केले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा २४ तास वॉच राहील. लहान मुलांना पालकांनी वाहने देऊ नये, प्रत्येकाने रहदारीचे नियम पाळावे. ३१ डिसेंबरसाठी जिल्हाभर ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून वाहनांची, वाहनधारकांची तपासणी केली जाणार असल्याचे एसपींनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसYavatmalयवतमाळ