शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

आता ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन होणार आॅनलाईन

By admin | Updated: March 16, 2015 01:50 IST

राज्यात सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे.

यवतमाळ : राज्यात सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांचे नामांकन आॅनलाईन भरण्याचा प्रयोग यवतमाळसह १० जिल्ह्यात करण्याचे प्रस्तावित आहेत. या बाबत निवडणूक आयोगाकडून यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. हा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी गावालगतच्या परिसरातून महासंग्राम केंद्राचा आधार घेण्यात येणार आहे. त्यासाठी महासंग्राम केंद्र हे आॅनलाईन असणे, तेथे वीजपुरवठ्याची सोय असणे यासह इतर जुजबी सोयी-सुविधा करून द्याव्यात, अशी मागणीही जिल्हा प्रशासनाकडून आयोगाकडे करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात जिल्हास्तरावरच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हा नवीनच प्रयोग पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राबविला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एप्रिलमध्ये ६०० ग्रामपंचायतींची निवडणूक होवू घातली आहे. त्या अनुषंगाने पडताळणी केली जाणार आहे. ग्रामीण भागातील उमेदवाराला अतिशय सोप्या भाषेत व सुटसुटीत असा उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. जेणेकरून हा उमेदवार स्वत:च महासंग्राम केंद्रात जाऊन नामांकन भरू शकेल, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. केवळ एका पानाचा उमेदवारी अर्ज राहणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायतींचे नामांकन आॅनलाईन भरण्यास कोणत्या अडचणी येतात, याचाही आढावा घेतला जात आहे. अद्याप तरी या बाबत ठोस निर्णय झालेला नाही. मात्र ही प्रक्रिया राबविण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणींची शक्यता पडताळली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)