शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

By admin | Updated: October 17, 2015 00:31 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन ...

शिक्षण विभागाचा निर्णय : शासनाच्या आदेशावर वेगवेगळे मतप्रवाहयवतमाळ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी काढले. पुस्तक भेट देण्यामागे वाचनसंस्कृती वाढीस लागावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, अशा प्रकारचा हेतू यातून शासनाचा दिसून येतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारी कार्यालये, अकृषी विद्यापिठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये अशा ठिकाणी नियमितपणे मान्यवर व्यक्ती, अधिकारी आणि इतर सबंधित कामकाजाच्या निमित्ताने येत असतात. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांचे सर्वसाधारणपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा १५ आॅक्टोंबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा शाळा-महाविद्यालयांसह इतर अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी पहिला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकूणच वाचन संस्कृती व वाचन प्रेरणा वाढीस लागावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारे कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था येथे येणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा समारंभाप्रसंगी त्यांचे स्वागत पु्ष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके देऊन करण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाबाबत शैक्षणिक वर्तुळातच वेगवेगळे मत व्यक्त होत आहे. अनेकजणांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. केवळ पुस्तक भेट देऊन शासनाचा वाचन संस्कृतीस हातभार लावण्याचा हेतू साध्य होईल का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. शिवाय पुस्तक भेट देण्यासाठी आर्थिक तदतुदही करावी लागणार आहे. पुष्प भेट देण्यासाठी फारशी आर्थिक तरतूद करावी लागत नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत फुले उपलब्ध होतात. शिवाय मान्यवरांना दिलेले पुस्तक त्यांच्याकडून वाचले जाईलच, याची खात्री कोण देणार. अनेकजण केवळ कपाटात ठेवण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. नंतर मात्र ती पुस्तके धूळ खात पडतात. त्यांचा कोणालाही उपयोग होत नाही. भेट देण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. तरच या निर्णयाचा हेतू साध्य होऊ शकेल. शाळा-महाविद्यालयांनी आलेल्या पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यापेक्षा आलेल्या पाहुण्यांनीच जर शाळेसाठी एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. कारण यामुळे संबंधित शाळेचे वाचनालय अधिक प्रगल्भ आणि समु्रद्ध होईल. अशा शाळेतील परिपूर्ण प्रगल्भ वाचनालयातील पुस्तकांचा फायदा त्या शाळेत सद्यस्थितीत आणि भविष्यात शिकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आपोआप मिळेल आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा किंबहुना ती वाढविण्याचा शासनाचा हेतू यशस्वी होईल, यात कोणतीही शंका नसल्याचा एक मतप्रवाह दिसून येतो. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाच्या या निर्णयापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात शाळांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तके व वृक्ष देऊन करण्यात येत आहे, तसे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेशच असल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाल्या. तसेच शासनाच्या या निर्णयाने आणखी जोमाने वाचन संस्कृती राबविण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शासनाचा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु यामध्ये केवळ पाहुण्यांनी शाळेकडून पुस्तक न घेता शाळेसाठीही नवनवीन वेगवेगळी पुस्तके घेऊन जावीत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसते, या माध्यमातून ते त्यांना मिळेल आणि ग्रामीण शाळांमधील वाचनालये समृद्ध बनतील, अशी प्रतिक्रिया माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम सुरू केला असून, तो यशस्वी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)