शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शाळांमध्ये आता मान्यवरांचे स्वागत होईल पुस्तक देऊन

By admin | Updated: October 17, 2015 00:31 IST

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन ...

शिक्षण विभागाचा निर्णय : शासनाच्या आदेशावर वेगवेगळे मतप्रवाहयवतमाळ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागातील शाळांमध्ये मान्यवरांच्या भेटीप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्याऐवजी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे, असे आदेश महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरुवारी काढले. पुस्तक भेट देण्यामागे वाचनसंस्कृती वाढीस लागावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, अशा प्रकारचा हेतू यातून शासनाचा दिसून येतो. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारी कार्यालये, अकृषी विद्यापिठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये अशा ठिकाणी नियमितपणे मान्यवर व्यक्ती, अधिकारी आणि इतर सबंधित कामकाजाच्या निमित्ताने येत असतात. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकारी यांचे सर्वसाधारणपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या अनुषंगाने त्यांचा १५ आॅक्टोंबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा शाळा-महाविद्यालयांसह इतर अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी पहिला वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर एकूणच वाचन संस्कृती व वाचन प्रेरणा वाढीस लागावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारे कार्यालये, अकृषी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था येथे येणाऱ्या मान्यवर व्यक्ती आणि अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा समारंभाप्रसंगी त्यांचे स्वागत पु्ष्पगुच्छ देऊन करण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके देऊन करण्यात येणार आहे. शासनाच्या या आदेशाबाबत शैक्षणिक वर्तुळातच वेगवेगळे मत व्यक्त होत आहे. अनेकजणांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे तर अनेकांनी यावर वेगळे मत व्यक्त केले आहे. केवळ पुस्तक भेट देऊन शासनाचा वाचन संस्कृतीस हातभार लावण्याचा हेतू साध्य होईल का, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. शिवाय पुस्तक भेट देण्यासाठी आर्थिक तदतुदही करावी लागणार आहे. पुष्प भेट देण्यासाठी फारशी आर्थिक तरतूद करावी लागत नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत फुले उपलब्ध होतात. शिवाय मान्यवरांना दिलेले पुस्तक त्यांच्याकडून वाचले जाईलच, याची खात्री कोण देणार. अनेकजण केवळ कपाटात ठेवण्यासाठी पुस्तके घेऊन जातात. नंतर मात्र ती पुस्तके धूळ खात पडतात. त्यांचा कोणालाही उपयोग होत नाही. भेट देण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन होणे गरजेचे आहे. तरच या निर्णयाचा हेतू साध्य होऊ शकेल. शाळा-महाविद्यालयांनी आलेल्या पाहुण्यांना पुस्तके भेट देण्यापेक्षा आलेल्या पाहुण्यांनीच जर शाळेसाठी एखादे चांगले पुस्तक भेट दिले तर ते अधिक परिणामकारक ठरू शकेल. कारण यामुळे संबंधित शाळेचे वाचनालय अधिक प्रगल्भ आणि समु्रद्ध होईल. अशा शाळेतील परिपूर्ण प्रगल्भ वाचनालयातील पुस्तकांचा फायदा त्या शाळेत सद्यस्थितीत आणि भविष्यात शिकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आपोआप मिळेल आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा किंबहुना ती वाढविण्याचा शासनाचा हेतू यशस्वी होईल, यात कोणतीही शंका नसल्याचा एक मतप्रवाह दिसून येतो. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शासनाच्या या निर्णयापूर्वीच यवतमाळ जिल्ह्यात शाळांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तके व वृक्ष देऊन करण्यात येत आहे, तसे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेशच असल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाल्या. तसेच शासनाच्या या निर्णयाने आणखी जोमाने वाचन संस्कृती राबविण्यास मदत होणार असल्याचेही त्या म्हणाल्या.वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शासनाचा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु यामध्ये केवळ पाहुण्यांनी शाळेकडून पुस्तक न घेता शाळेसाठीही नवनवीन वेगवेगळी पुस्तके घेऊन जावीत, असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी फारसे साहित्य उपलब्ध नसते, या माध्यमातून ते त्यांना मिळेल आणि ग्रामीण शाळांमधील वाचनालये समृद्ध बनतील, अशी प्रतिक्रिया माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. वाचन संस्कृतीला समृद्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने हा उपक्रम सुरू केला असून, तो यशस्वी करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)