शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता धान्य वितरण आॅनलाईन

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्याचा निर्णय घेतला.

पॉसचा अंगठा : २०५० दुकानांत अंमलबजावणी, सहा लाखांवर कार्डधारकयवतमाळ : स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता स्वस्त धान्याचे वितरण आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. मे महिन्यापासून या आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातील सहा लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप केले जाणार आहे.यवतमाळ जिल्हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांतून मोठ्या प्रमाणात धान्याची उचल केली जाते. आता शेतकऱ्यांनाही स्वस्त धान्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात अन्नपूर्णा आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाही स्वस्त धान्य वितरित केले जाते. जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या तब्बल सहा लाख ३६ हजारांच्या घरात पोहोचली आहे. यातील पाच लाख ३५ हजार कुटुंबांचे राशन कार्ड आता आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे. सहा लाख ३६ हजार शिधापत्रिकाधारकांच्या राशन कार्डवर चार ते १० सदस्यांची नोंद आहे. आत्तार्यंत कुणीही या कार्डवर धान्याची उचल करीत होते. मात्र आता शिधापत्रिकेत नाव असलेले कुटुंब प्रमुख अथवा नाव असलेल्या इतर सदस्यांच धान्य खरेदी करता येणार आहे. त्याकरिताच ही पॉस मशीन बसविण्यात येणार आहे. या मशीनवर धान्य खरेदी करणाऱ्याला अंगठा लावणे बंधनकारक आहे. त्यांनी अंगठा लावताच त्यावर आधार कार्डचा नंबर येणार आहे. त्यानंतरच धान्य वितरित केले जाणार आहे. या मशिनमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव आणि किती धान्य कोटा आला, ग्राहकांची संख्या किती आणि उचल किती झाली, याची संपूर्ण माहिती समाविष्ट राहणार आहे. महिन्याचे वाटप संपल्यानंतर नवीन धान्य घेण्यापूर्वी ही मशीन तालुक्यातील पॉस केंद्राला कनेक्ट करावी लागणार आहे. त्यानंतरच दुसऱ्या महिन्याचे धान्य दुकानदाराला उचलता येणार आहे.या मशीनमध्ये अद्ययावत माहिती समाविष्ट राहणार असल्याने धान्य शिल्लक राहिल्याचा अलर्ट मशिनने दिल्यास तितके धान्य पुढीलवेळी कमी मिळणार आहे. गर्व्हमेंट रिसिप्ट अकाउंट सिस्टिमद्वारे दुकानदाराला धान्याच्या खरेदीचे चालान फाडावे लागणार आहे.(शहर वार्ताहर)जिल्हा मुख्यालयातून नियंत्रणया संपूर्ण आॅनलाईन प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात १६ पॉस केंद्र उघडण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील दुकानदारांना संबंधित तालुक्यातील केंद्रावर या मशीनचा डाटा फिड करावा लागणार आहे. ही संपूर्ण प्रकिया जिल्हा मुख्यालयातून नियंत्रित होणार आहे. यामुळे दुकानदारांनी शिल्लक धान्य न दाखविल्यास मशिनच तशी सूचना केंद्राला देणार आहे. यामुळे स्वस्त धान्यातील धान्य चोरी आणि काळाबाजाराला लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.