शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जिंकविले नव्हे हरविले

By admin | Updated: May 22, 2014 01:28 IST

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली असली तरी प्रत्यक्षात मतदारांनी शिवसेनेला जिंकविले नव्हे तर काँग्रेसला हरविले,

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत मोदी लाट दिसून आली असली तरी प्रत्यक्षात मतदारांनी शिवसेनेला जिंकविले नव्हे तर काँग्रेसला हरविले, असेच वेिषण केले जात आहे. त्यात बर्‍याचअंशी तथ्यांशही आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी निवडून आल्या. काँग्रेसचे उमेदवार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पराभूत झाले. या निवडणूक निकालाचे राजकीय पटलावर वेगवेगळ्या पैलूने आता वेिषण केले जात आहे. त्यातूनच मतदारांनी शिवसेनेला विजयी केले नसून काँग्रेसला पराभूत केल्याचा ठोस निष्कर्ष पुढे आला आहे. भावना गवळी गेल्या तीन टर्मपासून खासदार आहेत. परंतु त्यांच्याबाबत मतदारांमध्येच नव्हे तर शिवसेनेच्या गटांमध्येही नाराजी दिसून आली. भावना गवळींनी दहा वर्षात ठोस काय केले, असा प्रश्न निवडणूक काळात ठिकठिकाणी उपस्थित केला जात होता. या प्रश्नात वास्तवही दडले आहे. भावना गवळींनी खासदार म्हणून शासनाकडून मिळणार्‍या निधीच्या खर्चा व्यतिरिक्त जिल्ह्यासाठी ठोस काहीही केले नाही, हे उघड आहे. पक्ष संघटनेतही आंदोलनातील नेतृत्वाव्यतिरिक्त त्यांचे योगदान नाही. त्यामुळेच त्यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी कायम होती. या पेक्षाही गंभीर अवस्था काँग्रेसची पहायला मिळाली.

केंद्रात व राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. घोटाळे, भ्रष्टाचार, महागाई, शासन स्तरावर रखडलेली कामे, लोकप्रतिनिधींकडून जनसमस्यांकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध बाबींनी जनता त्रस्त झाली होती. ग्रामपंचायत सदस्यापासून मंत्र्यांपर्यंत कुणाकडूनच न्याय मिळत नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांवर जनतेत प्रचंड रोष दिसून आला. मतदारच नव्हे तर नेत्यांच्या कार्यप्रणालीवर कार्यकर्तेही नाराज होते. अखेर मतदार व कार्यकर्त्यांमधील हा रोष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधून प्रकटला आणि काँग्रेसचे पानीपत झाले. मतदारांचा दोनही पक्षाच्या उमेदवारावर रोष होता. तिसरा सक्षम पर्याय नव्हता. गेली दहा वर्ष महागाईने छळणार्‍या काँग्रेसला यावेळी धडा शिकवायचाच अशा मानसिकतेत नागरिक मतदान केंद्रांवर गेले. त्यांनी धडाही शिकविला. मात्र त्यांचा या धडा शिकविण्याच्या नादात शिवसेनेचा विजय झाला. शिवसेनेने गेली पाच वर्ष खूप चांगले काम केले, म्हणून खूष होऊन मतदारांनी त्यांना मते दिलेली नाहीत हे उघड आहे. काँग्रेसला पराभूत करायचे होते, म्हणून नाईलाजाने सेना निवडून आली असा निष्कर्ष आहे. हीच स्थिती चंद्रपूर मतदारसंघातही दिसून आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात मतदारांनी ही चीड व्यक्त केली. त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही संख्या बरीच आहे. कारण गेल्या पाच वर्षात केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने सामान्य कार्यकर्त्यांना काहीच दिले नाही. मंडळ, महामंडळ, विविध समित्या, कार्यकारी अधिकार्‍यांची पदे भरली गेली नाही. आमदारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणार्‍या कार्यकर्त्यांनाच कोसोदूर ठेवले गेले. पदाचा लाभ तर दूर सन्मानही न मिळाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून व्यक्त केलेला संताप समजण्यासारखा आहे. या पराभवातून काँग्रेस आमदारांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. यातून धडा न घेतल्यास आणि मतदार व कार्यकर्त्यांच्या रोषामागील नेमक्या कारणांचा शोध घेता न आल्यास या आमदारांचे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काहीच खरे नाही, एवढे निश्‍चित. (जिल्हा प्रतिनिधी)