शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:47 IST

शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ....

ठळक मुद्दे‘ऊर्जाटेक’वर वाटखेड ग्रामपंचायत मेहरबान : धुरामुळे पिके खराब होतात, शेतीचा पोत बिघडतो, आरोग्य धोक्यात

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ही वाटखेड येथील नागरिकांची विनंती ग्रामपंचायतीने ठोकरली. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांपर्यंत प्रकरण पोहोचूनही परवानगी रद्द केली नाही. अखेर या गावातील आठ नागरिकांनी आत्मदहनाची नोटीस प्रशासनाला दिली आहे.वाटखेड ग्रामपंचायतीने ऊर्जाटेक कंपनीच्या गिट्टीक्रशरला गतवर्षी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. भविष्यातील धोके लक्षात घेता गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने एनओसी रद्द केली होती. त्यानंतरचे दोन-तीन प्रयत्नही अयशस्वी झाले. यावर्षी ऊर्जाटेक कंपनीने पुन्हा जिल्हाधिकारीºयाकडे अर्ज केला. १५ आॅगस्ट रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत प्रस्ताव पारित झाला. त्याविरूद्ध शेतकºयांनी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.२६ जानेवारी २०१६ ला झालेल्या ग्रामसभेतही ठराव पारित करण्यात आला होता. चौकशीत कोरम पूर्ण नसल्याने ग्रामसभा अवैध ठरली होती आणि जिल्हाधिकाºयांनी एनओसी रद्द केली होती. ८८० मतदार असलेल्या वाटखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत १५ आॅगस्ट १७ ला १५२ सदस्य हजर होते. ४२ समर्थन, ११ विरोधात तर, १९९ तटस्थ राहिले होते. गिट्टीक्रशरला प्रचंड विरोध असतानाही एनओसी देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नामुळे नागरिकांत रोष आहे.पीडित शेतकºयांनी नोंदविल्या तीव्र भावनाआमच्या शेतातील कापूस गिट्टीक्रशरच्या धुरामुळे आणि ये-जा करणाºया वाहनांच्या धुरामुळे दरवर्षी काळा पडतो. पºहाटी फुलावर येत नाही. तुर-सोयाबीनचा दाणा काळवंडतो, उत्पादन कमी होते. शेतमालाची प्रत बिघडल्याने नुकसान होत आहे.- शांताबाई बावनेसन ११ ते १५ या चार वर्षाच्या काळात या गिट्टीक्रशरमुळे शेतकºयांचे बरेच नुकसान झाले आहे. त्याची प्रथम भरपाई देण्यात यावी. यापूर्वी शेतकºयांचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याच अटीवर ग्रामपंचायतीने एनओसी दिली होती.- श्रावण वाकडेगिट्टीक्रशरकडून दोनही बाजूस जाणारा मार्ग पक्का बांधून दिल्यास नुकसान होणार नाही.- माधव बावनेसरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.गिट्टीअभावी कालव्याची कामे बंदबेंबळा कालव्याच्या बांधकामाकरिता नागपूरच्या ऊर्जाटेक कंपनीने हा गिट्टीक्रशर उभारला आहे. चार वर्षे त्यामुळे उत्पादन करता आले. दोन वर्षापासून एनओसी न मिळाल्याने प्रकल्प बंद आहे व बेंबळा प्रकल्पाला गिट्टी चुरी पुरविता न आल्याने कॅनलची कामेही थांबली आहे, असे ऊर्जाटेकचे व्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.सरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.