शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
2
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
3
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
4
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
5
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
6
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
7
New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
8
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
9
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
11
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
12
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
13
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
14
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
15
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
16
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
17
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने
18
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
19
पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली महत्त्वाची माहिती
20
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:47 IST

शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ....

ठळक मुद्दे‘ऊर्जाटेक’वर वाटखेड ग्रामपंचायत मेहरबान : धुरामुळे पिके खराब होतात, शेतीचा पोत बिघडतो, आरोग्य धोक्यात

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ही वाटखेड येथील नागरिकांची विनंती ग्रामपंचायतीने ठोकरली. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांपर्यंत प्रकरण पोहोचूनही परवानगी रद्द केली नाही. अखेर या गावातील आठ नागरिकांनी आत्मदहनाची नोटीस प्रशासनाला दिली आहे.वाटखेड ग्रामपंचायतीने ऊर्जाटेक कंपनीच्या गिट्टीक्रशरला गतवर्षी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. भविष्यातील धोके लक्षात घेता गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने एनओसी रद्द केली होती. त्यानंतरचे दोन-तीन प्रयत्नही अयशस्वी झाले. यावर्षी ऊर्जाटेक कंपनीने पुन्हा जिल्हाधिकारीºयाकडे अर्ज केला. १५ आॅगस्ट रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत प्रस्ताव पारित झाला. त्याविरूद्ध शेतकºयांनी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.२६ जानेवारी २०१६ ला झालेल्या ग्रामसभेतही ठराव पारित करण्यात आला होता. चौकशीत कोरम पूर्ण नसल्याने ग्रामसभा अवैध ठरली होती आणि जिल्हाधिकाºयांनी एनओसी रद्द केली होती. ८८० मतदार असलेल्या वाटखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत १५ आॅगस्ट १७ ला १५२ सदस्य हजर होते. ४२ समर्थन, ११ विरोधात तर, १९९ तटस्थ राहिले होते. गिट्टीक्रशरला प्रचंड विरोध असतानाही एनओसी देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नामुळे नागरिकांत रोष आहे.पीडित शेतकºयांनी नोंदविल्या तीव्र भावनाआमच्या शेतातील कापूस गिट्टीक्रशरच्या धुरामुळे आणि ये-जा करणाºया वाहनांच्या धुरामुळे दरवर्षी काळा पडतो. पºहाटी फुलावर येत नाही. तुर-सोयाबीनचा दाणा काळवंडतो, उत्पादन कमी होते. शेतमालाची प्रत बिघडल्याने नुकसान होत आहे.- शांताबाई बावनेसन ११ ते १५ या चार वर्षाच्या काळात या गिट्टीक्रशरमुळे शेतकºयांचे बरेच नुकसान झाले आहे. त्याची प्रथम भरपाई देण्यात यावी. यापूर्वी शेतकºयांचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याच अटीवर ग्रामपंचायतीने एनओसी दिली होती.- श्रावण वाकडेगिट्टीक्रशरकडून दोनही बाजूस जाणारा मार्ग पक्का बांधून दिल्यास नुकसान होणार नाही.- माधव बावनेसरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.गिट्टीअभावी कालव्याची कामे बंदबेंबळा कालव्याच्या बांधकामाकरिता नागपूरच्या ऊर्जाटेक कंपनीने हा गिट्टीक्रशर उभारला आहे. चार वर्षे त्यामुळे उत्पादन करता आले. दोन वर्षापासून एनओसी न मिळाल्याने प्रकल्प बंद आहे व बेंबळा प्रकल्पाला गिट्टी चुरी पुरविता न आल्याने कॅनलची कामेही थांबली आहे, असे ऊर्जाटेकचे व्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.सरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.