शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६० वर्षांपासून रस्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:55 IST

शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गौळपेंड गावासाठी ‘शकुंतला’ ठरली शाप

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही. वाहतुकीची सर्व साधने या पुलाजवळच खोळंबतात. गावात जायला गाडी बैलाशिवाय पर्याय नसतो. हा मन:स्ताप गेल्या सहा दशकांपासून नागरिक सहन करीत आहे.दारव्हा तालुक्यातील गौळपेंड हे ८०० लोकवस्तीचे पुनर्वसित गाव. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील शेलोडीच्या उत्तरेस १९५९ मध्ये गाव वसले. या गावाच्या वेशीवरूनच यवतमाळ-मूर्तीजापूर शकुंतला धावते. गावाजवळच्या नाल्यावर ब्रिटीशांनी त्या काळी पूल बांधला. आता या पुलाखालचा नालाच गावकऱ्यांसाठी रस्ता झाला आहे. सुरुवातीला वाहतुकीची साधने तेवढी नव्हती. त्यामुळे या पुलाखालून गावाचे सर्व व्यवहार होत होते. परंतु आधुनिकीकरणाचे वारे वाहताना वेगवान आणि मोठी वाहने आली. परंतु यापैकी कोणतेही मोठे वाहन गौळपेंडमध्ये जाऊच शकत नाही. शकुंतलेचा हा पूल इतका छोटा आहे की बैलगाडी आणि छोटी चारचाकी वाहनेच जाऊ शकतात. सध्या शेतीचे यांत्रिकीकरण होत आहे. प्रत्येक जण बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करतात. परंतु गावात ही वाहने पोहोचतच नाही. गावातील शेतमाल विकायचा असेल तर पुलाच्या दुसºया बाजूपर्यंत बैलगाडीने अथवा डोक्यावरच माल न्यावा लागतो.बोदेगाव साखर कारखाना सुरू असताना या गावात उसाची लागवड झाली. परंतु ट्रक गावापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे बैलगाडीतूनच ऊस न्यावा लागला. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.लग्न असो वा इतर कोणताही प्रसंग वाहन आले की, पुलाजवळच थांबते. पुलापासून पायदळ येण्याशिवाय पर्याय नसतो. जणू या पुलाने वाहनांना प्रवेश बंदीच केली आहे. पावसाळ्यात तर या पुलाखालून धो-धो पाणी वाहते. दुचाकी चालविणेही कठीण होते. विद्यार्थ्यांना शाळेत जातानाही मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. हा पूल जणू यातना देत आहे.रेल्वेच्या नियमांपुढे सर्वच हतबलरेल्वेचे नियम अतिशय कडक आहे. या पुलाच्या आसपास कोणतेही काम केल्यास रेल्वे ते काढून टाकते. यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत यश आले नाही. संपूर्ण गावात डांबरीकरण, काँक्रीटीकरण झाले. परंतु या पुलाखाली व आजूबाजूचा परिसर मात्र आहे तसाच आहे.

टॅग्स :railwayरेल्वे