शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

तब्बल ६० वर्षांपासून रस्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 21:55 IST

शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गौळपेंड गावासाठी ‘शकुंतला’ ठरली शाप

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही. वाहतुकीची सर्व साधने या पुलाजवळच खोळंबतात. गावात जायला गाडी बैलाशिवाय पर्याय नसतो. हा मन:स्ताप गेल्या सहा दशकांपासून नागरिक सहन करीत आहे.दारव्हा तालुक्यातील गौळपेंड हे ८०० लोकवस्तीचे पुनर्वसित गाव. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील शेलोडीच्या उत्तरेस १९५९ मध्ये गाव वसले. या गावाच्या वेशीवरूनच यवतमाळ-मूर्तीजापूर शकुंतला धावते. गावाजवळच्या नाल्यावर ब्रिटीशांनी त्या काळी पूल बांधला. आता या पुलाखालचा नालाच गावकऱ्यांसाठी रस्ता झाला आहे. सुरुवातीला वाहतुकीची साधने तेवढी नव्हती. त्यामुळे या पुलाखालून गावाचे सर्व व्यवहार होत होते. परंतु आधुनिकीकरणाचे वारे वाहताना वेगवान आणि मोठी वाहने आली. परंतु यापैकी कोणतेही मोठे वाहन गौळपेंडमध्ये जाऊच शकत नाही. शकुंतलेचा हा पूल इतका छोटा आहे की बैलगाडी आणि छोटी चारचाकी वाहनेच जाऊ शकतात. सध्या शेतीचे यांत्रिकीकरण होत आहे. प्रत्येक जण बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करतात. परंतु गावात ही वाहने पोहोचतच नाही. गावातील शेतमाल विकायचा असेल तर पुलाच्या दुसºया बाजूपर्यंत बैलगाडीने अथवा डोक्यावरच माल न्यावा लागतो.बोदेगाव साखर कारखाना सुरू असताना या गावात उसाची लागवड झाली. परंतु ट्रक गावापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे बैलगाडीतूनच ऊस न्यावा लागला. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.लग्न असो वा इतर कोणताही प्रसंग वाहन आले की, पुलाजवळच थांबते. पुलापासून पायदळ येण्याशिवाय पर्याय नसतो. जणू या पुलाने वाहनांना प्रवेश बंदीच केली आहे. पावसाळ्यात तर या पुलाखालून धो-धो पाणी वाहते. दुचाकी चालविणेही कठीण होते. विद्यार्थ्यांना शाळेत जातानाही मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. हा पूल जणू यातना देत आहे.रेल्वेच्या नियमांपुढे सर्वच हतबलरेल्वेचे नियम अतिशय कडक आहे. या पुलाच्या आसपास कोणतेही काम केल्यास रेल्वे ते काढून टाकते. यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत यश आले नाही. संपूर्ण गावात डांबरीकरण, काँक्रीटीकरण झाले. परंतु या पुलाखाली व आजूबाजूचा परिसर मात्र आहे तसाच आहे.

टॅग्स :railwayरेल्वे