शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कुणालाही पाठीशी घालणार नाही

By admin | Updated: July 3, 2016 02:26 IST

यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे.

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : वायपीएसचे प्रकरण, तिसऱ्या दिवशीही रोष यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या छेडखानीची घडलेली घटना निंदनीयच असून जनतेचा रोष व त्या अनुषंगाने होणारे आंदोलन सहाजिकच आहे. परंतु त्याला शांततेचा मार्ग हवा, असे स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही यवतमाळकर जनतेला दिली. वायपीएसच्या दोन शिक्षकांवर विद्यार्थिनींच्या छेडखानीचा आरोप आहे. या प्रकरणात या शिक्षकांना अटक करण्यात आली. त्यांना संस्थेतून काढूनही टाकण्यात आले. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पालक, राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिकांचा रोष शनिवारी तिसऱ्या दिवशीही कायम होता. हे आंदोलक सकाळी दारव्हा नाक्यावर एकत्र आले. तेथून त्यांनी आपला मोर्चा संस्था सचिवांच्या घराकडे वळविला. बराच वेळ हे आंदोलक तेथे होते. त्यांनी घोषणाही दिल्या. काही वेळानंतर यवतमाळचे आमदार मदन येरावार तेथे पोहोचले. त्यांनी लाऊड स्पीकरवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हॉईस रेकॉर्डरवरील संदेश आंदोलक पालकांना ऐकविला. मुख्यमंत्री या संदेशात म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल, आवश्यकता भासल्यास चांगल्यात चांगला वकील त्यासाठी नेमला जाईल. सर्व पालकांच्यावतीने एक संयुक्त समिती स्थापन केली जावी, ही समिती चौकशी अधिकाऱ्यांना आपल्या सूचना सादर करतील, या सूचनांची दखल घेतली जाईल, असे ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार मदन येरावार यांनीही पालकांना शांततेचे आवाहन केले. येरावार म्हणाले, छेडखानीचे हे प्रकरण आपण विधानसभेत मांडू, यातील दोषींवर निश्चित कारवाई होईल, कोणतीही संस्था, पदाधिकाऱ्यांची गय होणार नाही, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल. पालकांनी तक्रारी कराव्या, त्यांना न्यायालयात जावे लागणार नाही, असे आवाहनही यावेळी येरावार यांनी केले. छेडखानीच्या या प्रकरणामुळे सर्वच पालकांच्या मनामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेविषयी भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात अन्य शाळांमध्येही असा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी प्रकरणे रोखण्यासाठी सखोल चौकशी करून ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही मदन येरावार यांनी दिली. शनिवारी आंदोलकांनी प्रवासी निवारे, आॅटोरिक्षा स्टँडवर दगडफेक करून तोडफोड केली. शनिवारी सकाळी प्राचार्य जेकब दास यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सायंकाळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या उपस्थितीत पालकांची बैठक झाली. या बैठकीत पालकांनी आपल्या विविध मागण्या ठेवल्या. त्याच्या अंमलबजावणीची ग्वाही मान्यवरांनी दिली. यावेळी उपरोक्त मान्यवरांनी पालक, नागरिक व राजकीय नेते-पदाधिकाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. (शहर वार्ताहर)