शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवशाही बसमध्ये पोलिसांना नो एन्ट्री; तपासकामापायी आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:08 IST

एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत.

ठळक मुद्देवॉरंट चालत नाही निमआराम बसही बंदगुन्ह्यांच्या तपासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाने आरामदायी, वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या असल्या तरी या शिवशाहीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच वांधे केले आहेत. कारण या बसमध्ये पोलिसांना दिला जाणारा वॉरंट चालत नाही. या बस आल्यामुळे महामंडळाने लांबपल्ल्याच्या निमआराम बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे तपासाला जाताना पोलिसांची आर्थिक कोंडी होत आहे.पोलिसांना वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासानिमित्ता अनेकदा जिल्ह्याबाहेर, कधी राज्याच्या टोकावर तर वेळप्रसंगी दुसऱ्या राज्यातसुद्धा जावे लागते. अशा वेळी पोलिसांना रेल्वे किंवा एसटी प्रवासासाठी खात्याकडून वॉरंट दिला जातो. या वॉरंटचे पैसे शासन चुकविते. बहुतांश सीआयडी, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासासाठी नेहमीच पुणे, मुंबई व अन्य शहरात दूरवर जावे लागते. सीआयडीच्या यंत्रणेला तर कायमच एकतर उच्च न्यायालयात किंवा पुणे मुख्यालयात येरझारा माराव्या लागतात. त्यासाठी पोलिसांचा सहसा रेल्वेने जाण्याचा कल असतो. मात्र ऐनवेळी रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याने पोलिसांना एसटी बसवर अवलंबून रहावे लागते.

कागदपत्रांचे गठ्ठे अन् लांबचा प्रवासत्यातही सोबत तपासाच्या कागदपत्रांचे गठ्ठे व लांबचा प्रवास असल्याने पोलिसांचा आरामदायी बसने जाण्याकडे कल असतो. शिवशाही बसेस आल्याने पोलिसांना हायसे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात शिवशाहीमध्ये कोणत्याही पासेसला परवानगी नसल्याने पोलिसांचा हिरमोड झाला. शिवशाहीमुळे महामंडळाने यापूर्वी चालविल्या जाणाऱ्या निमआराम बसेसची संख्या घटविली. अनेक ठिकाणी त्या बंदही झाल्या. त्यामुळे पोलिसांवर आता ‘रुटीन’ बसमध्ये जाण्याची वेळ आली आहे. त्याचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होतो आहे. बाहेरगावी तपासाला जाण्याचे टाळणे, फोनवरूनच खानापूर्ती करणे असे प्रकार वाढले आहेत. त्यातूनच अनेक प्रकरणात तपासाची गती मंदावली आहे. दूरवर तपास कामी जाणाऱ्या पोलिसांसाठी तरी शिवशाहीत ‘पोलीस वॉरंट’ची मुभा द्यावी, अशी एकमुखी मागणी पुढे आली आहे.

इंधनासाठी ‘व्यावसायिकांची’ मदतपोलीस दलात मोठे अधिकारी सोबत असतील तर वाहनाची व्यवस्था होते. परंतु प्रत्येक वेळी वाहन मिळेलच याची शाश्वती नसते. अनेकदा सलोख्याच्या संबंधावर वाहन मिळाले तरी त्यात इंधन कोठून टाकायचे असा प्रश्न पडतो. अशा वेळी ‘व्यावसायिकांची’ मदत घेण्याशिवाय पोलिसांकडे पर्यायही नसतो. शिपाई-जमादार असतील तर त्यांना एसटीने जाण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. हे चित्र राज्यात सर्वदूर सारखेच आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाही